शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मानवतेला काळिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 01:09 IST

पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावात घडली. विहिरीत पोहले या क्षुल्लक कारणावरून मातंग समाजातील दोन तरुणांना नग्न करुन बेदम मारहाणीसह गावातून धिंड काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला.

पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावात घडली. विहिरीत पोहले या क्षुल्लक कारणावरून मातंग समाजातील दोन तरुणांना नग्न करुन बेदम मारहाणीसह गावातून धिंड काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अद्यापही जातीपातीचे विष, आर्थिक स्थिती, शेतजमीन, विहिरींची मालकी यासंबंधी वर्चस्वाची भावना किती खोलवर रुजलेली आहे, हे अधोरेखित होते. जग एकविसाव्या शतकात पोहोचले आहे; माहिती-तंत्रज्ञानाने क्रांती केली आहे, असे म्हणत असताना आमच्या मनातून जात, श्रेष्ठ-कनिष्ठतेचे भेद जात नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानणाऱ्या आणि संविधानानुसार चालणाºया या देशात अशा घटनांचे प्रमाण वाढणे सामाजिकदृष्ट्या निरोगी नसल्याचे लक्षण आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा मूलमंत्र जपून सरकार काम करीत असेल तर त्याचे परिणाम ग्रामीण भागात असे का दिसतात, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. समाजातील शोषित, पीडित, वंचित घटकांना विकासाची समान संधी मिळत असल्याचा दावा शासन आणि प्रशासन करीत असले तरी ग्रामीण महाराष्ट्रातील भयावह स्थितीचे दर्शन या घटनेने घडविले आहे. स्पृश्यास्पृश्यतेचा भेद मिटविण्यासाठी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांच्यासारख्या महात्म्यांनी प्रयत्न केले. देशाला समतेचा संदेश देण्यात महाराष्ट्र अग्रभागी असल्याचा अभिमान आम्ही बाळगत असताना अशा घटना ही काळाचे चक्र उलटे फिरविण्याचा काही शक्तींचा प्रयत्न असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. वाकडीसारख्या छोट्या गावात भयंकर प्रकार घडूनही तीन दिवस त्याची वाच्यता होऊ नये, यावरून त्याठिकाणी किती दहशतीत पीडित कुटुंब राहत असेल त्याची कल्पना येते. विहिरीत पोहण्यास मज्जाव केल्यानंतरही ते पोहल्याबद्दल जाब विचारताना त्यांना नग्न करून मारहाण केली जात असताना त्याचा व्हिडीओ बनविणे, त्यात या तरुणांना हीन लेखणारी उद्दाम भाषा वापरणे यावरून ही प्रवृत्ती किती बेमुर्वतखोर, आढ्यताखोर, वर्चस्ववादी आहे हे ठळकपणे जाणवते. मंत्री, शासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रियांमधून या घटनेविषयी संताप व्यक्त झाला. तो रास्त आहे. पण केवळ तेथे न थांबता अशी हिंमत समाजातील कुठलाही घटक करणार नाही, अशा पध्दतीने गावपातळीवर प्रशासकीय यंत्रणा मजबूत करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावnewsबातम्या