शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

प्याला अर्धा भरला आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 5:23 AM

सुखावह जगण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवड केलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई, मुंबई व ठाणे या शहरांची निवड होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

सुखावह जगण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवड केलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई, मुंबई व ठाणे या शहरांची निवड होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. या शहरांच्या निवडीकरिता सर्वांत महत्त्वाचा निकष होता तो लोकसंख्येचा. प्रशासन, सामाजिक संस्था, आर्थिक आणि भौतिक पायाभूत सुविधा या चार निकषांवर ही क्रमवारी निश्चित केलेली आहे. गेली काही वर्षे गुजरातच्या आणि तेथील शहरांच्या विकासाच्या कहाण्या ऐकून महाराष्ट्रातील रहिवाशांना न्यूनगंड येऊ लागला होता. मात्र महाराष्ट्रातील शहरे यादीत अव्वल असताना गुजरातमधील एकाही शहराचा यादीत समावेश नाही हे आश्चर्यजनक आहे. आर्थिक विकास, रोजगार, गव्हर्नन्स, इज आॅफ डुर्इंग बिझनेस वगैरे निकषांवर महाराष्ट्रातील राज्यांनी सरस ठरणे अपेक्षित होते. महाराष्ट्राला श्रमाची व व्यापाराची, शिक्षणाची व सामाजिक चळवळींची उज्ज्वल परंपरा आहे. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, मलनि:सारण व्यवस्था अशा अनेक बाबींमध्येही पुणे, नवी मुंबई, मुंबई तसेच ठाणे या शहरांमधील स्थिती अन्य राज्यांतील शहरांपेक्षा खूप चांगली आहे. केंद्र सरकारने ही स्पर्धा घेताना ढोबळमानाने चार निकष निश्चित केले. त्यातील कोणत्या निकषांना-त्या अंतर्गत बाबींना किती महत्त्व देऊन गुण दिले हेही तितकेच महत्त्वाचे आहे. वानगीदाखल सांगायचे तर आर्थिक उलाढालीत मुंबई, नवी मुंबई ही शहरे स्पर्धेत आघाडी घेणे स्वाभाविक आहे. शैक्षणिक संस्थांचे जाळे हा निकष प्रधान असेल तर पुणे अव्वल ठरणे ही काळ्या दगडावरील रेघ असेल. याच स्पर्धेत घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, प्रदूषण या निकषांवर शहरांची निवड केली गेली असती,तर कदाचित याच शहरांच्या पदरी निराशा आली असती. कचरा वर्गीकरणाबाबत ही शहरे अजून बरीच मागे आहेत. कचराकोंडीमुळे लक्षावधी लोकांची घुसमट होत आहे. या सर्वच शहरांमध्ये रस्त्यांची दुरवस्था व वाहतूककोंडी या समस्या भीषण होत आहेत. मागील आठवड्यात मुंबई, ठाण्यात थोडेसे अंतर पार करण्याकरिता लोकांना तासन्तास कोंडीचा सामना करावा लागला. काही मोजके विभाग सोडले तर अनेक शहरांतील अनेक वस्त्यांमध्ये कचरा ही मोठी समस्या आहे. प्रदूषण ही तर या सर्वच शहरांची मोठी डोकेदुखी आहे. त्यातून श्वसनाचे, त्वचेचे व अन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे ‘सुखावह’तेचे निकष कोणते त्यावर कोणते शहर बाजी मारणार ते ठरणार आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर ‘अर्धा प्याला भरला आहे, असंदेखील म्हणता येतं. अर्धा प्याला सरला आहे, असंसुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की, भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा.’

टॅग्स :newsबातम्या