शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

सुसंस्कृतता, संपन्नतेला का दृष्ट लागली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 12:30 AM

भुसावळ शांत झालेले नाही, महिन्यातून दोन-तीन निर्घृण खून होत आहेत.

मिलिंद कुलकर्णीभुसावळ शहर हे संमिश्र संस्कृतीचे प्रतिक म्हणून अनेक वर्षांपासून ओळखले जाते. रेल्वेचे विभागीय कार्यालय, आयुध निर्माणी कारखाना, दीपनगरचे औष्णिक विद्युत केंद्र यामुळे देशभरातील विविध भाषिक, प्रांतिक नागरिक याठिकाणी आले आणि पुढे स्थायिक झाले. शहराजवळून वाहणारी तापी नदी, कॉन्हेंट स्कूलपासून तर नवोदय, केंद्रीय विद्यालय आणि सैनिकी विद्यालयापर्यंत शैक्षणिक आलेख चढता राहिला आहे. हिंदी, सिंधी भाषिकांसाठी स्वतंत्र शाळा आहेत. विठ्ठल मंदिर, जामा मशीद, मराठी ते कॅथालिक चर्च, पारशी बांधवांची अग्यारी अशी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे हे शहराचे वैशिष्टय आहे. अजिंठा लेणी चित्रबध्द करणाऱ्या रॉबर्ट गिलची समाधी याठिकाणी आहे. सौंदर्यवतीची स्मृती अजून भुसावळकर जागवतात. सांस्कृतिकदृष्टया संपन्न असे हे शहर आहे. अलिकडे मनुदेवी पायी वारी असो की, मॅरेथॉन स्पर्धा असो भुसावळकरांमधील सळसळता उत्साह वाखाणण्यासारखा आहे.अशा सुसंस्कृत, संपन्न शहराला का दृष्ट लागली, असे विचारावेसे वाटते. गुन्हेगारीने कळस गाठला आहे. २०-२१ वर्षांची तरुण मुले जीवावर उदार होत सराईत गुन्हेगारासारखी मुडदे पाडू लागले आहेत. भरदिवसा, भररस्त्यावर हे प्रकार घडत असल्याने सामान्य नागरिकाचा जीव धोक्यात आला आहे. डोळ्यासमोर या घटना घडत असताना कोणीही रोखण्यासाठी पुढे धजावण्याची हिंमत करीत नाही, याचे कारण या गावगुंडांची दहशत प्रचंड आहे. त्यांच्या मागे राजकीय आणि खाकीचा आशीर्वाद आहे, याची कल्पना सामान्यांना असल्याने कोणाचा जीव वाचविण्याचा प्रयत्नदेखील होताना दिसत नाही.रेल्वे स्टेशन म्हटले म्हणजे, गुन्हेगारी आपसूक आलीच, त्याबद्दल दुमत नाही. काही टोळ्या कुप्रसिध्द आहेत. पोलीस आणि रेल्वे पोलीस त्यांचा बंदोबस्त करीत असतात. पण गेल्या काही वर्षांत राजकीय पाठिंब्यामुळे गुन्हेगारीचे स्वरुप आमुलाग्र बदलले. एकेका नेत्याकडे २०-२५ गुंडांची टोळी आहे. घरे रिकामी करणे, व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करणे, रेती, रॉकेल, औष्णिक वीज केंद्राची राख, गावठी दारु, सट्टा, केबल अशा व्यवसायांमध्ये पंटरमंडळी स्थिरावली. सत्तेतील गॉडफादरने मग त्यांना सन्मान, प्रतिष्ठा देण्यासाठी राजकारणात आणले. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांमध्ये गावगुंड शिरले. व्हाईट कॉलर म्हणून वावरु लागले. विश्वस्थ संस्था, धर्मदाय संस्था स्थापन करुन कुणी मंदीर उभारले, कुणी उत्सव साजरे करु लागले. सामान्यांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी जे काही करता येईल, त्याचा खटाटोप केला गेला. राजामहाराजांना लाजवेल अशा पध्दतीने वाढदिवस साजरे होऊ लागले. चित्रपटाप्रमाणे आलिशान गाड्या उधळल्या जात असतात. सत्तेत राहण्यासाठी राज्यात ज्या कोणत्या पक्षाची सत्ता येईल, त्याच्याशी जुळवून घेण्याची हातोटी या मंडळींना आणि त्यांच्या गॉडफादर असलेल्या नेत्यांना जमू लागली. जिल्हा नेते, राज्य स्तरीय नेतेदेखील या स्थानिक नेत्यांचे उपद्रवमूल्य, आर्थिक ताकद लक्षात घेऊन सांभाळू लागले. त्यातून धाडस वाढले आणि गुन्हेगारीने डोके वर काढले. त्यातून क्रौर्याची परिसीमा गाठणारे कृत्य होऊ लागले.सहा महिन्यांपूर्वी एका हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या पाठीमागून येऊन गुंड तरुणाने गळा चिरला आणि विजयश्री मिळविल्यासारखा सुरा नाचवत तो बाहेर पडला. कॅमेºयात कैद झालेला हा क्षण हृदयाचा थरकाप उडविणारा असा होता. त्यानंतर रवींद्र खरात व त्याच्या कुटुंबियांना गोळ्यांनी टिपण्यात आले. पाठलाग करुन झालेल्या खुनाच्या मालिकेनंतरही भुसावळ शांत झालेले नाही. महिन्यातून दोन-तीन निर्घृण खून होत आहेत.सत्ताबदल झाला, पण खुनाचे सत्र काही थांबत नाही. सत्ताधाऱ्यांनी कठोर होऊन कारवाई करायला हवी. पोलीस दलाने याठिकाणी आयपीएस पोलीस अधिकारी नियुक्त करायला हवा. चाळीसगाव येथे अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आहे, ते तातडीने भुसावळ येथे हलविण्यात यावे. दुर्देवाने कोणत्याही जिल्हा नेत्याला, पालकमंत्र्याला या मागणीचे गांभीर्य लक्षात येत नाही. दीपक जोग यांच्यासारखा पोलीस अधिकारी परीविक्षाधीन काळात भुसावळात कार्यरत असताना गुंडगिरीचा बिमोड झाला होता. गावगुंडांनी भुसावळ सोडून पलायन केले होते. तो दरारा, धाडस नंतरच्या मोजक्या अधिकाºयांचा अपवाद वगळता कोणालाही जमले नाही, हेदेखील तितकेच खरे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव