शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नालस्ती की प्रशस्ती

By admin | Updated: November 25, 2015 23:05 IST

नेमके कोणत्या नजरेतून याकडे बघायचे, यावर ही बाब भारतातील आणि केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील आणि खरे तर अरबेतर देशांमधील मुस्लिमांची नालस्ती करणारी आहे

नेमके कोणत्या नजरेतून याकडे बघायचे, यावर ही बाब भारतातील आणि केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील आणि खरे तर अरबेतर देशांमधील मुस्लिमांची नालस्ती करणारी आहे की त्यांना प्रशस्ती बहाल करणारी आहे, याचा निवाडा होऊ शकतो. सध्या जगभर हैदोस घालीत असलेल्या इस्लामीक स्टेट आॅफ इराक अ‍ॅन्ड सिरीया (इसीस) या अत्यंत जहाल दहशतवादी संघटनेची सध्या जगभर ‘सैन्यभरती’ सुरु आहे. भारतात आणि खुद्द महाराष्ट्रातदेखील अशा काही भरती ठिकाणांचा छडा लावला गेला आहे. केवळ भारताचा विचार करायचा तर मुस्लिमांमधील साक्षरतेचे अल्प प्रमाण लक्षात घेता या समाजातील तरुणांना ‘गुमराह’ करणे म्हणजे बहकविणे तुलनेने बरेच सोपे असल्याने काही तरुणांचा इसीससारख्या संघटनांकडे ओढा असल्याच्या बातम्याही अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. पण त्यांना अशा संघटनांमध्ये अत्यंत तुच्छ वागणूक दिली जात असल्याचा एक अहवाल तपासी यंत्रणांनी पाहणीअंती तयार केला आहे. आशिया खंडातील तसेच नायजेरीया आणि सुदानसारख्या देशांमधील मुस्लीम तरुण अरबी तरुणांसारखे कडवे नसतात आणि त्यामुळे त्यांना केवळ ‘हरकामे’ म्हणून राबवून घेतले जाते, असा हा अहवाल म्हणतो. केवळ तितकेच नव्हे तर या तरुणांना पायदळात वापरले जाते आणि कोणतेही संवेदनशील (?) काम म्हणे दिले जात नाही. आत्मघातकी सैनिक म्हणून त्यांचा वापर करतानाही त्यांना तशी पूर्वकल्पना दिली जात नाही. म्हणजे धर्मासाठी आपण कुर्बानीला तयार आहोत यासारखी जी भावना एरवी आत्मघातकी पथके बोलून दाखवीत असतात तसा काहीही प्रकार यांच्याबाबतीत नसतो. परिणामी त्यांना घातपाताच्या कामगिरीवर पाठविले जाते. तिथून विशिष्ट क्रमांकावर फोन करायला सांगितले जाते आणि फोन लागताच होणाऱ्या भीषण स्फोटात त्यांच्या शरीरीच्या चिंधड्या होऊन जातात. इसीसला आशियातील म्हणजे भारत, पाकिस्तान आणि बांगला देशातील मुस्लिम तरुण बेभरवशाचे किंवा बिनकडवे वाटत असतील तर या देशातील आणि विशेषत: भारतातील सर्वसाधारण वातावरणाचाच तो परिणाम मानावा लागेल आणि ही बाब नक्कीच स्वागतार्ह म्हणावी लागेल. आता प्रश्न इतकाच की इसीससारख्या संघटना आपल्याला काय आणि कशी किंमत देतात याचा या देशातील मुस्लीम तरुणांमध्ये जितका परिणामकारक प्रचार आणि प्रसार होईल तितका दहशतवादी संघटनांना मिळणाऱ्या मानवी रसदीवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकेल व काही प्रमाणात का होईना त्यांना पायबंद बसेल.