शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

नालस्ती की प्रशस्ती

By admin | Updated: November 25, 2015 23:05 IST

नेमके कोणत्या नजरेतून याकडे बघायचे, यावर ही बाब भारतातील आणि केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील आणि खरे तर अरबेतर देशांमधील मुस्लिमांची नालस्ती करणारी आहे

नेमके कोणत्या नजरेतून याकडे बघायचे, यावर ही बाब भारतातील आणि केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील आणि खरे तर अरबेतर देशांमधील मुस्लिमांची नालस्ती करणारी आहे की त्यांना प्रशस्ती बहाल करणारी आहे, याचा निवाडा होऊ शकतो. सध्या जगभर हैदोस घालीत असलेल्या इस्लामीक स्टेट आॅफ इराक अ‍ॅन्ड सिरीया (इसीस) या अत्यंत जहाल दहशतवादी संघटनेची सध्या जगभर ‘सैन्यभरती’ सुरु आहे. भारतात आणि खुद्द महाराष्ट्रातदेखील अशा काही भरती ठिकाणांचा छडा लावला गेला आहे. केवळ भारताचा विचार करायचा तर मुस्लिमांमधील साक्षरतेचे अल्प प्रमाण लक्षात घेता या समाजातील तरुणांना ‘गुमराह’ करणे म्हणजे बहकविणे तुलनेने बरेच सोपे असल्याने काही तरुणांचा इसीससारख्या संघटनांकडे ओढा असल्याच्या बातम्याही अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. पण त्यांना अशा संघटनांमध्ये अत्यंत तुच्छ वागणूक दिली जात असल्याचा एक अहवाल तपासी यंत्रणांनी पाहणीअंती तयार केला आहे. आशिया खंडातील तसेच नायजेरीया आणि सुदानसारख्या देशांमधील मुस्लीम तरुण अरबी तरुणांसारखे कडवे नसतात आणि त्यामुळे त्यांना केवळ ‘हरकामे’ म्हणून राबवून घेतले जाते, असा हा अहवाल म्हणतो. केवळ तितकेच नव्हे तर या तरुणांना पायदळात वापरले जाते आणि कोणतेही संवेदनशील (?) काम म्हणे दिले जात नाही. आत्मघातकी सैनिक म्हणून त्यांचा वापर करतानाही त्यांना तशी पूर्वकल्पना दिली जात नाही. म्हणजे धर्मासाठी आपण कुर्बानीला तयार आहोत यासारखी जी भावना एरवी आत्मघातकी पथके बोलून दाखवीत असतात तसा काहीही प्रकार यांच्याबाबतीत नसतो. परिणामी त्यांना घातपाताच्या कामगिरीवर पाठविले जाते. तिथून विशिष्ट क्रमांकावर फोन करायला सांगितले जाते आणि फोन लागताच होणाऱ्या भीषण स्फोटात त्यांच्या शरीरीच्या चिंधड्या होऊन जातात. इसीसला आशियातील म्हणजे भारत, पाकिस्तान आणि बांगला देशातील मुस्लिम तरुण बेभरवशाचे किंवा बिनकडवे वाटत असतील तर या देशातील आणि विशेषत: भारतातील सर्वसाधारण वातावरणाचाच तो परिणाम मानावा लागेल आणि ही बाब नक्कीच स्वागतार्ह म्हणावी लागेल. आता प्रश्न इतकाच की इसीससारख्या संघटना आपल्याला काय आणि कशी किंमत देतात याचा या देशातील मुस्लीम तरुणांमध्ये जितका परिणामकारक प्रचार आणि प्रसार होईल तितका दहशतवादी संघटनांना मिळणाऱ्या मानवी रसदीवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकेल व काही प्रमाणात का होईना त्यांना पायबंद बसेल.