शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

नालस्ती की प्रशस्ती

By admin | Updated: November 25, 2015 23:05 IST

नेमके कोणत्या नजरेतून याकडे बघायचे, यावर ही बाब भारतातील आणि केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील आणि खरे तर अरबेतर देशांमधील मुस्लिमांची नालस्ती करणारी आहे

नेमके कोणत्या नजरेतून याकडे बघायचे, यावर ही बाब भारतातील आणि केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील आणि खरे तर अरबेतर देशांमधील मुस्लिमांची नालस्ती करणारी आहे की त्यांना प्रशस्ती बहाल करणारी आहे, याचा निवाडा होऊ शकतो. सध्या जगभर हैदोस घालीत असलेल्या इस्लामीक स्टेट आॅफ इराक अ‍ॅन्ड सिरीया (इसीस) या अत्यंत जहाल दहशतवादी संघटनेची सध्या जगभर ‘सैन्यभरती’ सुरु आहे. भारतात आणि खुद्द महाराष्ट्रातदेखील अशा काही भरती ठिकाणांचा छडा लावला गेला आहे. केवळ भारताचा विचार करायचा तर मुस्लिमांमधील साक्षरतेचे अल्प प्रमाण लक्षात घेता या समाजातील तरुणांना ‘गुमराह’ करणे म्हणजे बहकविणे तुलनेने बरेच सोपे असल्याने काही तरुणांचा इसीससारख्या संघटनांकडे ओढा असल्याच्या बातम्याही अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. पण त्यांना अशा संघटनांमध्ये अत्यंत तुच्छ वागणूक दिली जात असल्याचा एक अहवाल तपासी यंत्रणांनी पाहणीअंती तयार केला आहे. आशिया खंडातील तसेच नायजेरीया आणि सुदानसारख्या देशांमधील मुस्लीम तरुण अरबी तरुणांसारखे कडवे नसतात आणि त्यामुळे त्यांना केवळ ‘हरकामे’ म्हणून राबवून घेतले जाते, असा हा अहवाल म्हणतो. केवळ तितकेच नव्हे तर या तरुणांना पायदळात वापरले जाते आणि कोणतेही संवेदनशील (?) काम म्हणे दिले जात नाही. आत्मघातकी सैनिक म्हणून त्यांचा वापर करतानाही त्यांना तशी पूर्वकल्पना दिली जात नाही. म्हणजे धर्मासाठी आपण कुर्बानीला तयार आहोत यासारखी जी भावना एरवी आत्मघातकी पथके बोलून दाखवीत असतात तसा काहीही प्रकार यांच्याबाबतीत नसतो. परिणामी त्यांना घातपाताच्या कामगिरीवर पाठविले जाते. तिथून विशिष्ट क्रमांकावर फोन करायला सांगितले जाते आणि फोन लागताच होणाऱ्या भीषण स्फोटात त्यांच्या शरीरीच्या चिंधड्या होऊन जातात. इसीसला आशियातील म्हणजे भारत, पाकिस्तान आणि बांगला देशातील मुस्लिम तरुण बेभरवशाचे किंवा बिनकडवे वाटत असतील तर या देशातील आणि विशेषत: भारतातील सर्वसाधारण वातावरणाचाच तो परिणाम मानावा लागेल आणि ही बाब नक्कीच स्वागतार्ह म्हणावी लागेल. आता प्रश्न इतकाच की इसीससारख्या संघटना आपल्याला काय आणि कशी किंमत देतात याचा या देशातील मुस्लीम तरुणांमध्ये जितका परिणामकारक प्रचार आणि प्रसार होईल तितका दहशतवादी संघटनांना मिळणाऱ्या मानवी रसदीवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकेल व काही प्रमाणात का होईना त्यांना पायबंद बसेल.