शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
3
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
4
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
5
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
6
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
7
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
8
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
9
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
10
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
11
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
12
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
13
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
14
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
20
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास

गाय झाली ‘राजकीय प्राणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 7:04 AM

तीन वर्षांपूर्वी अख्ख्या भारतवंशात ‘चाय पे चर्चा’ला ऊत आला होता. केवळ टपऱ्यांवरच नव्हे तर कॉर्पोरेटमधेही कधी नव्हे त्या चाय पे चर्चा रंगू लागल्या होत्या.

तीन वर्षांपूर्वी अख्ख्या भारतवंशात ‘चाय पे चर्चा’ला ऊत आला होता. केवळ टपऱ्यांवरच नव्हे तर कॉर्पोरेटमधेही कधी नव्हे त्या चाय पे चर्चा रंगू लागल्या होत्या. अलीकडच्या वर्षात मात्र या ‘चाय’ची जागा ‘गाय’ने घेतली आहे, बरे का! देशात गाय हा एवढा कळीचा आणि देशभक्तीचा मुद्दा होईल, याचा विचारही बहुदा कुणी केला नसावा. दस्तुरखुद्द गार्इंनासुद्धा आपले ‘अच्छे दिन’ येणार हे कुठे माहिती होते? आश्चर्य म्हणजे, टीआरपीत जंगलचा राजा वाघोबालाही तिने मागे टाकले आहे म्हणे! अशात देशवासीयांचे हे असीम प्रेम बघून गाईचा ऊर भरून येणारच! नव्हे त्या चौखूर उधळणारच! आणि हे स्वाभाविकच म्हणायचे. कुठल्याही सुरक्षेची मागणी न करता स्वयंघोषित सुरक्षा फौज त्यांच्यासाठी तैनात होत असेल तर ही या गरीब कपिलांसाठी अभिमानाचीच बाब असणार ना! अर्थात तिच्या या सुरक्षा फौजेचा भावनांक इतका अतिरेकी आणि नकारात्मक आहे की गाईला माणूस बनविण्याच्या प्रयत्नात तीच पशू बनते आहे, ते अलाहिदा! एकंदरीत काय तर वाघ, सिंह या राष्ट्रीय प्राण्यांच्या तुलनेत गाईचे वाढते ‘वजन’ बघितल्यावर तिला ‘राजकीय प्राणी’ जाहीर करण्यास कुणाची काही हरकत नसावी. तसे एखाद्याला राजकीय कवचकुंडले प्राप्त झाली की त्याचा कसा उद्धार होतो आणि ती निघाली की बडेबडे असामी कसे जाळ्यात अडकतात याची कल्पना तुम्हा आम्हा सर्वांना आहेच. गायही काही ‘दूध’खुळी नाही. म्हणूनच कदाचित आधार कार्ड मिळणार ही आनंदवार्ता कळल्यावर एकदम ‘रिअ‍ॅक्ट’ न होण्याचेच तिने ठरविले. पण तिच्या या उदोउदोने वाघाचा मात्र प्रचंड जळफळाट होत असल्याचे कानी आले. वर्षानुवर्षे गणना आमची करायची आणि आधारकार्ड मात्र गार्इंना द्यायचे हे काही त्याला पटलेले नाही. भरीसभर म्हणजे हरियाणाचा लुवास येथील लाला लजपतराय पशुचिकित्सा व पशुविज्ञान विद्यापीठाने गार्इंसाठी हायटेक मसाज केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे समजले तेव्हा तर काही विचारायलाच नको. एका अर्थी ही मसाज केंद्रे सर्वांच्याच फायद्याची असणार आहेत. देशभरात अशी मसाज केंद्रे उघडली की गार्इंना रस्त्यांच्या मधे, चौकात आराम करण्याची गरजच भासणार नाही आणि वाहतुकीतील अडथळा आपसूकच दूर होईल. राज्याराज्यांमध्ये गो अभयारण्ये निर्माण करण्याचाही काही राजकीय नेत्यांचा मानस आहे. याशिवाय ‘घर तिथे गाय’ या योजनेचा घाट घातला जातोय. ही योजना अमलात आली तर भविष्यात प्रत्येक इमारतीत गार्इंसाठी राखीव जागा असेल. याला म्हणतात नशीब. गार्इंची तर मज्जाच मज्जा आहे बुवा! फक्त चिंता एकच वाटते, ती ही की पोस्ट-ट्रूथच्या या जमान्यात गाईवरील हे प्रेम आभासी ठरु नये म्हणजे झाले!