शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचा ‘वन’बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 05:03 IST

न्यायालयाने हंटर चालविल्याशिवाय हातपाय हलवायचेच नाहीत ही अलिखित परंपराच जणू गेल्या काही वर्षांपासून आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत निर्माण झाली आहे की काय कुणास ठाऊक? कदाचित त्यामुळेच लोकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याकरिता उठसूट न्यायालयात धाव घ्यावी लागते.

न्यायालयाने हंटर चालविल्याशिवाय हातपाय हलवायचेच नाहीत ही अलिखित परंपराच जणू गेल्या काही वर्षांपासून आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत निर्माण झाली आहे की काय कुणास ठाऊक? कदाचित त्यामुळेच लोकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याकरिता उठसूट न्यायालयात धाव घ्यावी लागते. बरे आपले नोकरशाहसुद्धा कधीकधी एवढे निगरगट्ट होतात की न्यायालयाला त्यांचे कान पिळावे लागतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वनविभागाशी संबंधित दोन प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान नुकताच हा अनुभव आला. खामगाव वनप्रकल्पात रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या वृक्षारोपणात १३४ कोटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार वनविकास महामंडळाच्या एका लिपिकाने केली होती. एवढे गंभीर प्रकरण असताना त्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटली नसावी. उलट तक्रारकर्त्या लिपिकासच निलंबित करुन त्याचे वेतन रोखण्यात त्यांनी धन्यता मानली. न्यायालयीन सुनावणीतही अधिकाºयांनी असाच वेळकाढूपणा केल्याने अखेर ‘या बेजबाबदारपणाबद्दल दोषी अधिकाºयांना थेट कारागृहात पाठवायचे का, ’असा सवाल न्यायालयाला विचारावा लागला. दुसरे प्रकरण आहे ताडोबा राष्टÑीय व्याघ्र प्रकल्पात व्हीआयपींच्या नावावर निर्धारित संख्येपेक्षा जास्त पर्यकांना आत सोडण्याचे. उच्च न्यायालयाने यासंबंधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून येत्या आठ दिवसात व्हीआयपी प्रवेशाचे नवे निकष आणि नियम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. हे सारेच आपल्या भ्रष्ट व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारे आहे. शासनाच्या बहुतांश योजना या चांगल्या आणि समाजहिताच्याच असतात. पण त्यांची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नाही अथवा त्यात भ्रष्टाचार शिरतो आणि त्या कुचकामी ठरतात, हे अनेकदा अनुभवास येते. वृक्षारोपणाचेच बघा! ही मोहीम गेल्या ३० वर्षांपासून राबविण्यात येत आहे. पण या काळात किती वनाच्छादन वाढले? विद्यमान सरकारनेही ‘हरित महाराष्टÑ’ मोहिमेंतर्गत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवले असताना गेल्या ३ वर्षात झालेल्या वृक्षारोपणाच्या यशस्वीतेचे आकडे काही फारसे समाधानकारक नाहीत. यासंदर्भात जे मूल्यांकन करण्यात आले त्यानुसार १८१ पैकी फक्त ६० ठिकाणीच झाडे जगू शकली आहेत. त्यातही १८ ठिकाणी झाडे जगण्याचे प्रमाण ६६ टक्के आहे. उर्वरित ठिकाणी ते ४० टक्क्यांएवढेच आहे. ज्या १२ ठिकाणी सागवान लावण्यात आले होते ते पूर्णत: अपयशी ठरले असून बांबूचेही फक्त चार वृक्षारोपण टिकाव धरू शकले. शासनाचाच हा अहवाल असून या अपयशामागील कारणांचा शोध घेण्यासोबतच संबंधितांवर कारवाईची शिफारसही त्यात करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपणावर सरासरी १६.१७ लाख रुपये खर्च झाले आहेत,हे विशेष! जंगले विरळ होत चालली असताना वृक्षारोपणाद्वारे कृत्रिम वननिर्मिती हे फार मोठे आव्हान आहे आणि ते पेलण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावे लागतील. अन्यथा वृक्षारोपणाची ही चळवळ केवळ एका फार्स ठरेल.

टॅग्स :Courtन्यायालयforestजंगल