शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चुंबनाचा विश्वविक्रम करणारं जोडपं विभक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 07:59 IST

हे जेाडपं जगप्रसिद्ध झालं त्याचीही एक अनोखी कहाणी आहे. 

या जगात ध्येय‘वेड्या’ लोकांची काही कमी नाही. काेणत्या वेळी, कोण, कशासाठी, काय करेल, याचा खरोखरच काहीही भरवसा नाही. आता थायलंडच्या या जोडप्याचंच बघा. एक्काचाई आणि लक्साना टिरानाराट असं या दाम्पत्याचं नाव. दोघांचंही एकमेकांवर अपार प्रेम. सगळेजण त्यांच्याकडे पाहून प्रेमाच्या आणाभाका घ्यायचे इतकं त्यांचं गाढ प्रेम. हे जेाडपं जगप्रसिद्ध झालं त्याचीही एक अनोखी कहाणी आहे. 

एकमेकांवर प्रेम असणं, जवळीक असणं ही गोष्ट समजू शकते, पण या जोडप्यानं काय करावं? दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. या जोडप्यानं एका अनोख्या स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा होतीच तशी एकदम हटके. जे जोडपं जास्तीत जास्त वेळ चुंबन घेईल  त्यांना भलं मोठं बक्षीस जाहीर झालं होतं. केवळ पैशासाठी नाही, पण आपण हे नाजूक आव्हान पेलू शकतो का या उत्सुकतेपोटी एक्काचाई आणि लक्साना यांनी मोठ्या हौसेनं या स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा त्यांनी जिंकलीही. २०१३मध्ये झालेल्या या स्पर्धेत त्यांनी सलग ५८ तास ३५ मिनिटे एकमेकांचं चुंबन घेतलं. या स्पर्धेची एक प्रमुख अट होती.. कारण काही का असेना, पण तुम्ही तुमची चुंबनभेट सोडली, तर स्पर्धेतलं तुमचं आव्हान, अस्तित्व संपेल!  

एक्काचाई आणि लक्साना यांच्याप्रमाणे आणखीही अनेक प्रेमवीरांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांचंही एकमेकांवर निरतिशय प्रेम होतं. ही स्पर्धा आपणच जिंकू असं अनेक जोडप्यांना वाटत होतं, पण बऱ्याच जणांना हे नाजूक आव्हान काही पेलता आलं नाही. अगदी मनापासून प्रयत्न करुनही या जोडप्यांनी अखेर हार मानली आणि ते परस्परांपासून दूर झाले, तसे स्पर्धेतूनही लगेच बाहेर फेकले गेले.  एक्काचाई आणि लक्साना मात्र त्याला अपवाद ठरले. सर्वांत दीर्घ चुंबनाचा जागतिक विक्रम त्यांनी केला. त्यांचा हा अनोखा विक्रम गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही नोंदवला गेला! त्यावेळी ही स्पर्धा खूपच गाजली होती आणि ‘एकमेकांवर गाढ प्रेम असलेलं जोडपं’ म्हणून त्यांचं नाव जगभरात गाजलं होतं. आजही त्यांचं नाव त्याचसाठी घेतलं जातं. 

...पण ही कहाणी इथेच संपलेली नाही. या कहाणीत नुकताच आता एक वेगळा ट्विस्ट आला आहे. चुंबनाचा विश्वविक्रम करुन प्रेमाच्या दुनियेत आपलं नाव कोरण्यात यशस्वी ठरलेल्या या जोडप्यानं आता घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. 

२०११मध्ये झालेल्या अशाच एका चुंबन स्पर्धेतही या जोडप्यानं भाग घेतला होता. ती स्पर्धाही त्यांनीच जिंकली होती. २०१३ला मात्र त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडून विश्वविक्रम केला होता. या बक्षिसाच्या रकमेतून ते मालामाल झाले होते. लाखो रुपयांच्या हिऱ्यांच्या दोन अंगठ्याही त्यांनी स्पर्धेत जिंकल्या होत्या. आता मात्र ही सारी ‘प्रेमकहाणी’ संपुष्टात आली आहे. 

त्या दोघांना परस्परांपासून वेगळं करण्यामागे काय कारण आहे? हे दोघे म्हणतात,  ‘आमच्या विभक्त होण्यामागे आवर्जून सांगावं असं एकच एक, फारसं मोठं कारण नाही, पण काळाच्या ओघात शरीर-मनानं आम्ही एकमेकांपासून दूर होत गेलो.’ अर्थात, एक्काचाई आणि लक्साना टिरानाराट हे दोघं आता विभक्त झाले असले, तरी मुलांचं पालनपोषण मात्र ते सोबतीनंच करणार आहेत.. 

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी