शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

चुंबनाचा विश्वविक्रम करणारं जोडपं विभक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 07:59 IST

हे जेाडपं जगप्रसिद्ध झालं त्याचीही एक अनोखी कहाणी आहे. 

या जगात ध्येय‘वेड्या’ लोकांची काही कमी नाही. काेणत्या वेळी, कोण, कशासाठी, काय करेल, याचा खरोखरच काहीही भरवसा नाही. आता थायलंडच्या या जोडप्याचंच बघा. एक्काचाई आणि लक्साना टिरानाराट असं या दाम्पत्याचं नाव. दोघांचंही एकमेकांवर अपार प्रेम. सगळेजण त्यांच्याकडे पाहून प्रेमाच्या आणाभाका घ्यायचे इतकं त्यांचं गाढ प्रेम. हे जेाडपं जगप्रसिद्ध झालं त्याचीही एक अनोखी कहाणी आहे. 

एकमेकांवर प्रेम असणं, जवळीक असणं ही गोष्ट समजू शकते, पण या जोडप्यानं काय करावं? दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. या जोडप्यानं एका अनोख्या स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा होतीच तशी एकदम हटके. जे जोडपं जास्तीत जास्त वेळ चुंबन घेईल  त्यांना भलं मोठं बक्षीस जाहीर झालं होतं. केवळ पैशासाठी नाही, पण आपण हे नाजूक आव्हान पेलू शकतो का या उत्सुकतेपोटी एक्काचाई आणि लक्साना यांनी मोठ्या हौसेनं या स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा त्यांनी जिंकलीही. २०१३मध्ये झालेल्या या स्पर्धेत त्यांनी सलग ५८ तास ३५ मिनिटे एकमेकांचं चुंबन घेतलं. या स्पर्धेची एक प्रमुख अट होती.. कारण काही का असेना, पण तुम्ही तुमची चुंबनभेट सोडली, तर स्पर्धेतलं तुमचं आव्हान, अस्तित्व संपेल!  

एक्काचाई आणि लक्साना यांच्याप्रमाणे आणखीही अनेक प्रेमवीरांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांचंही एकमेकांवर निरतिशय प्रेम होतं. ही स्पर्धा आपणच जिंकू असं अनेक जोडप्यांना वाटत होतं, पण बऱ्याच जणांना हे नाजूक आव्हान काही पेलता आलं नाही. अगदी मनापासून प्रयत्न करुनही या जोडप्यांनी अखेर हार मानली आणि ते परस्परांपासून दूर झाले, तसे स्पर्धेतूनही लगेच बाहेर फेकले गेले.  एक्काचाई आणि लक्साना मात्र त्याला अपवाद ठरले. सर्वांत दीर्घ चुंबनाचा जागतिक विक्रम त्यांनी केला. त्यांचा हा अनोखा विक्रम गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही नोंदवला गेला! त्यावेळी ही स्पर्धा खूपच गाजली होती आणि ‘एकमेकांवर गाढ प्रेम असलेलं जोडपं’ म्हणून त्यांचं नाव जगभरात गाजलं होतं. आजही त्यांचं नाव त्याचसाठी घेतलं जातं. 

...पण ही कहाणी इथेच संपलेली नाही. या कहाणीत नुकताच आता एक वेगळा ट्विस्ट आला आहे. चुंबनाचा विश्वविक्रम करुन प्रेमाच्या दुनियेत आपलं नाव कोरण्यात यशस्वी ठरलेल्या या जोडप्यानं आता घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. 

२०११मध्ये झालेल्या अशाच एका चुंबन स्पर्धेतही या जोडप्यानं भाग घेतला होता. ती स्पर्धाही त्यांनीच जिंकली होती. २०१३ला मात्र त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडून विश्वविक्रम केला होता. या बक्षिसाच्या रकमेतून ते मालामाल झाले होते. लाखो रुपयांच्या हिऱ्यांच्या दोन अंगठ्याही त्यांनी स्पर्धेत जिंकल्या होत्या. आता मात्र ही सारी ‘प्रेमकहाणी’ संपुष्टात आली आहे. 

त्या दोघांना परस्परांपासून वेगळं करण्यामागे काय कारण आहे? हे दोघे म्हणतात,  ‘आमच्या विभक्त होण्यामागे आवर्जून सांगावं असं एकच एक, फारसं मोठं कारण नाही, पण काळाच्या ओघात शरीर-मनानं आम्ही एकमेकांपासून दूर होत गेलो.’ अर्थात, एक्काचाई आणि लक्साना टिरानाराट हे दोघं आता विभक्त झाले असले, तरी मुलांचं पालनपोषण मात्र ते सोबतीनंच करणार आहेत.. 

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी