शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सार्वभौमत्वाशी कुठलीही तडजोड होणार नाही, याची काळजी घेण्याचे भान देशाच्या नेतृत्वाला राखावेच लागेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 07:17 IST

india-china row : चिनी सैन्याच्या माघारीच्या वेगामुळे तर भारतीय सैन्यही आश्चर्यचकित झाले, एवढ्या वेगाने तब्बल २०० चिनी रणगाडे माघारी गेले.

एखाद्या घडामोडीची प्रदीर्घ काळ प्रतीक्षा केल्यानंतर, एवढ्यात काही ‘ते' घडणार नाही, असे वाटते आणि मग अगदी अवचित ती गोष्ट प्रत्यक्षात घडते! भारत-चीन सीमेवर नुकतीच त्याची पुन्हा प्रचिती आली. पूर्व लडाखमध्ये पॅंगॉन्ग सरोवर भागात भारत आणि चीनचे सैन्य तब्बल नऊ महिने एकमेकांच्या डोळ्याला डोळा भिडवून उभे होते. वाटाघाटीच्या अनेक फेऱ्या झडल्या; परंतु तोडगा निघत नव्हता ! चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतासोबतच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्याच्या तुकड्या आणि चिलखती दलाची जमवाजमव केल्यामुळे उभा ठाकलेला पेचप्रसंग नजीकच्या भविष्यात सुटणार नाही, असे वाटू लागले होते; मात्र गत आठवड्यात अचानक माघारीबाबत उभय सैन्यादरम्यान एकमत झाल्याचे वृत्त झळकले. पाठोपाठ प्रत्यक्षात माघार सुरूही झाली.

चिनी सैन्याच्या माघारीच्या वेगामुळे तर भारतीय सैन्यही आश्चर्यचकित झाले, एवढ्या वेगाने तब्बल २०० चिनी रणगाडे माघारी गेले. नऊ महिन्यांच्या कालावधीत नाना तऱ्हेने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेल्या चीनच्या भूमिकेत अचानक झालेला बदल बुचकळ्यात टाकणारा आहे. त्यामुळेच भारत व चीनच्या सैन्यादरम्यान झालेल्या समझोत्यात काही काळेबेरे तर नाही ना, अशी शंका काही घटकांकडून उपस्थित केली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर नरेंद्र मोदी सरकारवर भारतीय भूमी चीनच्या स्वाधीन केल्याचाच थेट आरोप केला. त्यामुळेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना राज्यसभेत, भारताची एक इंचही भूमी कुणी बळकावलेली नाही आणि सरकार बळकावूही देणार नाही, अशी ग्वाही द्यावी लागली.

एवढेच नव्हे तर संरक्षण मंत्रालयानेदेखील एक निवेदन प्रसृत करून, राहुल गांधी यांनी केलेले आरोप खोडून काढले.  पॅंगॉन्ग सरोवराच्या उत्तरेस असलेल्या फिंगर चारपर्यंत भारतीय भूभाग असताना, भारतीय सैन्य फिंगर तीनच्या पुढे जाणार नाही असे मान्य करणे म्हणजे, भारतीय भूभाग चीनला दान करणेच होय, अशा आशयाचे टीकास्र राहुल गांधी यांनी डागले होते. त्यावर भारतीय भूभाग फिंगर आठपर्यंत आहे आणि भारत त्या भूमिकेवर ठाम आहे, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. पॅंगॉन्ग सरोवर भागात भारत आणि चीनदरम्यानच्या वादाचा खरा मुद्दा हाच आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेखा फिंगर आठपर्यंत आहे, असे भारताचे म्हणणे आहे, तर ती फिंगर तीनपर्यंत असल्याचे चीन म्हणतो.

ताज्या समझोत्यानुसार भारतीय सैन्य फिंगर तीनच्या पुढे जाणार नाही, तर चिनी सैन्य फिंगर आठच्या पूर्वेकडे थांबेल. याचा अर्थ राहुल गांधी यांच्या वक्तव्यात तपशिलाची चूक असली तरी, भारतीय भूभाग फिंगर आठपर्यंत असूनही भारतीय सैन्याला फिंगर तीनच्या पुढे गस्त घालता येणार नाही, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच! समझोता करायचाच होता, तर भारतीय सैन्य आपल्या दावारेषेच्या जेवढ्या मागे थांबेल, तेवढेच चिनी सैन्य त्यांच्या दावारेषेच्या मागे थांबेल, असा करायला हवा होता! तसा तो झालेला नाही. चिनी सैन्य वाटाघाटींच्या मेजावर कुठे तरी वरचढ ठरले, असा त्याचा अर्थ कुणी काढल्यास, त्यास चूक कसे ठरवता येईल? इथे आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. पॅंगॉन्ग सरोवराच्या उत्तरेस शिरजोरी करीत असलेला चीन, सरोवराच्या दक्षिणेस असलेल्या कैलास पर्वतरांगेतील काही शिखरांवर भारतीय सैन्याने पाय रोवल्यानंतरच वरमला होता; कारण त्यामुळे चिनी सैन्याचे तळ भारतीय सैन्याच्या माऱ्याच्या टप्प्यात आले होते. ताज्या समझोत्यानंतर भारतीय सैन्याला त्या शिखरांवरून माघार घ्यावी लागणार आहे.

वस्तुतः ती शिखरे भारताच्या हद्दीतच आहेत. त्यामुळे भारताने तेथून माघार घेण्याची खरे तर काही गरज नव्हती; मात्र चिनी सैन्य सरोवराच्या उत्तरेकडून माघारी फिरायला हवे असेल, तर भारतीय सैन्यालाही कैलास पर्वतरांगेतील शिखरे सोडून द्यावी लागतील, असा आग्रह चिनी सैन्याने धरला असला पाहिजे. वाटाघाटींच्या मेजावर दुराग्रही असून चालत नाही, हे खरे असले तरी, चीन हा विश्वासपात्र शेजारी नाही. हे त्या देशाने अनेकदा सिद्ध केले आहे. चीनच्या बाबतीत हा अनुभव केवळ भारतालाच नव्हे, तर त्या देशाच्या इतर शेजारी देशांनाही वारंवार आला आहे. दोन पावले पुढे यायचे आणि मग समझोत्याच्या नावाखाली एक पाऊल मागे जात, भूभाग बळकवायचा, ही चीनची जुनीच खोड आहे. त्यामुळे चीन सीमेवरील तणाव निवळू लागल्याचा आनंद मानताना, देशाच्या सार्वभौमत्वाशी कुठलीही तडजोड होणार नाही, याची काळजी घेण्याचे भान देशाच्या नेतृत्वाला राखावेच लागेल! 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव