शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

Coronavirus: तणावातून मुक्ती हवीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 01:37 IST

माणूस मग तो गरीब असो वा श्रीमंत, त्याला करमणूक लागतेच. ती करमणूक तो चित्रपटांमधून मिळवतो, टीव्हीवरील मालिका आणि अन्य कार्यक्रमांमधून मिळवतो.

कोरोनाच्या संसगार्मुळे जगातील गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, आबालवृद्ध असा प्रत्येक जण सध्या अतिशय चिंतेत आहे. घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. घरात बसून काय करावे हे सुचेनासे झाले आहे. दिवसाचे दहा-बारा तास कसे घालवायचे हा मोठा प्रश्न आहे.

रोजगारासाठी बाहेरगावी गेलेले लाखो लोक आपण कधी आणि कसे घरी पोहोचणार या विवंचनेत आहेत. घरातील मंडळी त्यांची वाट पाहत आहेत. वृत्तपत्रेही काही दिवस बंद होती. त्यामुळे सोशल मीडियावरून पसरणाऱ्या बातम्या खºया की खोट्या हेही कळत नव्हते. आता काही ठिकाणी वृत्तपत्रे मिळू लागली आहेत, बातम्या नीट कळू लागल्या आहेत. वृत्तपत्र वाचनात किमान थोडाफार वेळ तरी जाऊ लागला आहे. अनेकांच्या दृष्टीने हा विरंगुळाच आहे.

माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा याखेरीज आयुष्यात करमणूकही लागते. शिवाय माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, असे अरिस्टॉटलने म्हटले आहे ते किती योग्य आहे हे आता सर्वांनाच जाणवू लागले आहे. त्याला सतत एकमेकांना भेटावेसे वाटते, गप्पा माराव्याशा वाटतात आणि मनोरंजनाशिवाय त्याचे आयुष्य शुष्क होते. मानसोपचार तज्ज्ञ सामान्यांच्या या स्थितीबद्दल चिंतीत आहेत. अशा एकाकी अवस्थेमुळे वा सतत तणाव व अस्वस्थ राहण्याने मानसिक आणि शारीरिक आजारांची शक्यता असते. या आजारांपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी व्यायाम हा एक उपाय आहे. घरात बसून आणि काही काम न केल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायाम हवाच; पण पुरेसा नाही.

माणूस मग तो गरीब असो वा श्रीमंत, त्याला करमणूक लागतेच. ती करमणूक तो चित्रपटांमधून मिळवतो, टीव्हीवरील मालिका आणि अन्य कार्यक्रमांमधून मिळवतो. त्याला क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, कबड्डी अशा खेळांमधूनही त्याचे मनोरंजन होते. अनेकांसाठी चार वर्षांनी येणारे आॅलिम्पिक ही मोठीच पर्वणी असते. नोकरदार वा व्यापार, उद्योगांमध्ये असणारे किंवा मोलमजुरी करणारे यांचा वेळ रोज कामात जातो. सुट्टीच्या दिवशी टीव्हीवरील कार्यक्रम, चित्रपट, खेळांचे सामने असे वेगळे काही त्याला हवेच असते. भारतातील लाखो वा काही कोटी लोक गेले दहा-पंधरा दिवस घरी आहेत. एवढी मोठी सुट्टी असूनही कुटुंबीयांसमवेत त्यांना बाहेरगावी फिरायला जाणे तर सोडाच, पण चित्रपट पाहायला जाणेही शक्य नाही. एकही नवा चित्रपट प्रदर्शित होऊ शकलेला नाही, चित्रपटांचे चित्रीकरण बंद आहे. तीच स्थिती टीव्ही मालिकांची. त्यामुळे जुन्याच रटाळ मालिका पुन्हा पुन्हा दाखविल्या जात आहेत. अशा काळात जुन्या विनोदी आणि लोकांचा तणाव दूर करतील अशा मालिका वा चित्रपट दाखवल्यास तणाव काहीसा कमी होईल.

केंद्र सरकारने रामायण, महाभारत आणि चाणक्य या एकेकाळी गाजलेल्या मालिका पुन्हा दाखवा, असे दूरदर्शनला सांगितले; पण नव्या पिढीला त्या आवडतील का, हा विचार केल्याचे दिसत नाही. कोरोना संसर्गाच्या शक्यतेने आयपीएल सामने पुढे ढकलले आहेत, आॅलिम्पिकही आता होणार नाही आणि विम्बल्डनही पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे टीव्हीवर क्रीडाविषयी शुकशुकाटच आहे. परीक्षा पूर्ण न होताच शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. आठवीपर्यंतची मुले पुढील वर्गात आपोआप जातील; पण या सुट्टीत काय करायचे हा त्यांच्या आणि पालकांपुढील प्रश्न आहे. खेळायला बाहेर जाता येत नाही. त्यामुळे अनेक मुलांना मोबाईल गेमची सवय वा व्यसन लागायची भीती आहे. ते होता कामा नये. अन्यथा कोरोनातून बाहेर पडल्यानंतर मुलांची ही सवय त्रासदायक ठरेल. त्यामुळे लहान मुलांसाठी मोगली वा तशा मालिका दाखवायला हव्यात. ये जो है जिंदगी, हम पांच, आदी मालिकाही लोक आनंदाने पाहतील; पण तसे घडताना दिसत नाही.

मुळात कोट्यवधी लोकांना घरांत बसणे भाग असताना त्यांचा तणावाविना वेळ कसा जाईल हे पाहणेही प्रशासनाची जबाबदारी आहे. तसे न झाल्यास तणाव आणि घरांत वाद वाढू शकतात, याचाही विचार व्हावा. चीनमध्ये तसे घडले आहे. भारतात ते घडणार नाही; पण सरकारी पातळीवरही याचा विचार व्हायला हवा. कोरोनाचा संसर्ग काही काळाने थांबेलच. त्यावेळी अनेक नव्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यात आर्थिक व रोजगाराचे प्रश्न असतीलच; पण सर्व भारतीयांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य ठणठणीत असणे गरजेचे असेल. मानसोपचार तज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे अगदी किरकोळ वाटणाºया या बाबींचाही विचार प्रत्येकाने करायला हवा.

कोरोनाचा संसर्ग काही काळाने थांबेलच. त्यावेळी अनेक नव्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यात आर्थिक व रोजगाराचे प्रश्न असतीलच; पण सर्व भारतीयांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य ठणठणीत असणे गरजेचे असेल याचाही विचार करायला हवा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस