शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus:...तर बेरोजगार फौजेमध्ये असंतोष धुमसू लागू शकतो अन् त्याचा उद्रेक होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 07:11 IST

बेरोजगार झालेल्या साडेबारा कोटी मजूर आणि नोकरकपात किंवा पगार कपातीचा फटका बसलेला संघटित क्षेत्रातील नोकरवर्गाचा आर्थिक व्यवहारच थांबला तर आर्थिक दिवाळखोरीच निघणार आहे.

कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाऊनचा पर्याय निवडला. त्याला आता सहा आठवडे झाले. संपूर्ण देशाचे सर्व व्यवहार बंद करण्यात आल्याने आर्थिक परिणाम जाणवणार होते, याचा अंदाज होताच. महागाई वाढेल, बेरोजगारी वाढेल असाही अंदाज होता. ते सर्व काही घडते आहे. त्याचा सर्वाधिक मोठा फटका असंघटित क्षेत्रातील मजुरांचा रोजगार नाहीसा होण्यावर झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्था निरीक्षण केंद्राने सातत्याने निरीक्षण करून आपले निष्कर्ष जाहीर केलेत. त्यानुसार फेब्रुवारी ते एप्रिलअखेरपर्यंत केवळ दोन महिन्यांत देशात सरासरी वीस टक्के बेरोजगारी वाढीस लागली आहे आणि बारा कोटी पंधरा लाख नोकऱ्या संपुष्टात येऊन या बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. बांधकाम, रस्ते बांधणी, सेवाक्षेत्र, आदींमधील सर्वाधिक मजुरांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. परिणामी स्थलांतर करून आलेला हा मजुरांचा जथ्थाच्या जथ्था सैरवैर धावू लागला आहे. केंद्र सरकारने १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून अशा वर्गाला अन्नधान्याची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र, हा असंघटित क्षेत्रातील मजूर त्या-त्या शहरांत उपराच आहे. त्याच्याकडे रेशनकार्ड नाही. आधारपत्र नाही. परिणामी या पॅकेजचा लाभ त्याला कमीच मिळाला आहे.

कर्नाटक प्रांताने असंघटित आणि रोजगार गमावलेल्या मजुरांना सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. रोजगार गमावलेला मजूर आपापल्या गावाकडे निघून जात असल्याने ही घोषणा त्याच्या हाती लागणारच नाही. भारतीय अर्थव्यवस्था निरीक्षण केंद्राने गेल्या आठवड्याच्या अखेरीस जाहीर केलेल्या साप्ताहिक अहवालानुसार भारतात २७.११ टक्के बेरोजगारी वाढली आहे. महाराष्ट्रासारख्या प्रांतात हे प्रमाण २०.९ टक्के आहे. मात्र, मागास असलेल्या बिहारमध्ये ४६.६० टक्के, झारखंडमध्ये ४७.१० टक्के प्रमाण आहे. तमिळनाडू सुधारित राज्य म्हणतो; पण तेथे गरिबीचे प्रमाण अधिक आहे. त्या राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण ४९.८० टक्के आहे. म्हणजे रोजगार करणाऱ्यांपैकी निम्मी लोकसंख्या रोजगाराला मुकली आहे.

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या आणि अतिमागास प्रांतात बेरोजगारीचे प्रमाण २१.५० टक्के आहे. कदाचित या प्रांतातील मजूर इतर प्रांतात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाल्याचा परिणाम असू शकेल. फेब्रुवारीमध्ये भारतातील बेरोजगारीचे प्रमाण ७.८० टक्के होते. आर्थिक विकासाची गती मंदावते आहे. त्याचा हा परिणाम आहे, असे मानले जात होते. कारण ती गेल्या बारा महिन्यांतील सर्वाधिक होती. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांतच लॉकडाऊनमुळे त्यात १९.३१ टक्क्यांनी वाढ होऊन आता हे प्रमाण २७.११ टक्के झाले आहे. लॉकडाऊन लवकर उठला नाही, तर त्यात अधिकच भर पडेल. शिवाय संघटित क्षेत्रातील आस्थापने सुरू झाल्यानंतर रोजगार कपातीचे धोरण अवलंबले गेले तर शहरी बेरोजगारी वाढीस लागेल, असे दिसते. ते सध्या २९.२२ टक्के आहे. ग्रामीण भारतात हेच प्रमाण २६.१६ टक्के आहे. रब्बी हंगामाची कामे संपत आली आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत शेतातील रोजगार कमी होणार आहे. या दोन्हींचा फटका बेरोजगारी वाढीत होणार आहे. अनेक विख्यात अर्थतज्ज्ञांनी या परिस्थितीवर बोट ठेवून ठामपणे सांगितले आहे की, लोकांच्या हाती पैसा आला पाहिजे, जेणेकरून आर्थिक व्यवहार वाढीस लागतील. उत्पादन, व्यापार, दळणवळण, आदी वाढीस लागेल. यासाठी असंघटित क्षेत्रातील गरीब मजुरांना रोजगार गमवावा लागला असेल तर दरमहा सात हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान पैशाच्या रूपात देण्यात यावे.

बेरोजगार झालेल्या साडेबारा कोटी मजूरवर्ग आणि नोकरकपात किंवा पगार कपातीचा फटका बसलेला संघटित क्षेत्रातील नोकरवर्गाचा आर्थिक व्यवहारच थांबला तर आर्थिक दिवाळखोरीच निघणार आहे. उत्पादित झालेला माल विकत घेण्याची क्रयशक्तीच संपुष्टात आल्यास मंदीचा धोका मोठा आहे. बाजारात चलन आल्याशिवाय व्यवहार वाढणार नाही. ते व्यवहार वाढल्याशिवाय रोजगार वाढणार नाहीत. त्यावर तातडीने उपाय न झाल्यास बेरोजगार फौजेमध्ये असंतोष धुमसू लागू शकतो. त्याचा उद्रेक होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnemploymentबेरोजगारी