शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

Coronavirus : बास झाली आता धार्मिक कट्टरता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 00:43 IST

coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात या प्रश्नाचे गांभीर्य लोकांसमोर परखडपणे मांडले. या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी नागरिकांनी काय करायला हवे, हेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले.

- पवन के. वर्मा(राजकीय विश्लेषक)ज्यावेळी कोरोना महामारीसारखे संकट जगावर उद्भवते तेव्हा ते संकट लोकांना वेगळ्या तºहेने वागायला भाग पाडते. ‘काही बदल करण्याची गरज नाही,’ या भावनेने जुन्या पद्धतीप्रमाणे लोकांनी चालत राहणे हे आत्मघातकीपणाचे ठरू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात या प्रश्नाचे गांभीर्य लोकांसमोर परखडपणे मांडले. या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी नागरिकांनी काय करायला हवे, हेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले. या प्रयत्नांचा मुख्य गाभा सामाजिक अंतर राखणे हा आहे. व्यवहारात त्याचा अर्थ होतो की लोकांनी मोठ्या समूहात एकत्र येणे किंवा डझनभर लोकांनी एकत्र बसणे हे सध्यातरी टाळायला हवे.

याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. त्यासाठी शाळा, कॉलेजेस, मॉल्स, चित्रपटगृहे आणि काही प्रमाणात सरकारी कार्यालयेसुद्धा बंद करण्यात आली आहेत. बिगर सरकारी संस्थादेखील लोकांनी एकत्र येणे टाळण्यावर भर देत आहेत. त्याला अपवाद फक्त मुस्लिम मौलवींचा आहे. शुक्रवारचा नमाज मशिदीतच व्हायला हवा अशी त्यांची आग्रही भूमिका आहे. दुसरा अपवाद दिल्लीतील शाहीनबाग येथे रस्त्यावर धरणे आंदोलन करणाऱ्या महिलांचा आहे.

मी असे म्हटल्यावर उदारमतवादी विचारांचे लोक मी केवळ मुस्लिम समाजाला टार्गेट केले, असा आरोप करण्याची शक्यता आहे. पण तसे म्हणणे म्हणजे सत्याचा विपर्यास करण्यासारखे आहे. मी जरी हिंदू असलो आणि हिंदू असण्याचा मला अभिमान जरी असला तरी मी सर्व धर्मांच्या आणि संप्रदायांच्या विचारांचा आदर करीत असतो; पण सर्व धर्मांविषयी आदर बाळगणे म्हणजे मी म्हणतो तेच खरे, असा माझा अट्टाहास नाही. त्यामुळे अयोध्या येथे रामनवमीस होणारा मेळा रद्द करण्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नकार देताच मी त्यावर टीकाही केली होती. आता त्यांनीच तो मेळा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने मला हायसे झाले. योगी आदित्यनाथ यांच्यासारखा कडवा हिंदू अनेक वर्षांपासून लोकांमध्ये लोकप्रिय असलेला रामनवमीचा मेळा कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी जर रद्द करतो, तर शाहीनबाग येथे आंदोलन करणाऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घ्यायला काय हरकत आहे? सध्याचे कोरोना विषाणूचे संकट दूर झाल्यावर आपले निषेध आंदोलन त्या महिला पुन्हा सुरू करू शकतात!

तसेच मुस्लिम मौलवींनीसुद्धा आपल्या धार्मिक बांधवांना शुक्रवारचा नमाज मशिदीत एकत्रितपणे करण्याऐवजी प्रत्येकाने आपापल्या घरातच नमाजाचे पठण करावे, असे का सांगू नये? भारतातील महत्त्वाची हिंदू देवालये ज्यात तिरुपती बालाजी, सिद्धिविनायक मंदिर, पुरीचे मंदिर यांचा समावेश होतो, त्यांनी देवालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक तेथे हजारो भाविक दररोज दर्शनासाठी जमा होत असताना श्रद्धाळू लोकांसाठी धार्मिक श्रद्धा आणि रीतिरिवाज महत्त्वाचे असतात, याची मला जाणीव आहे; पण कधी कधी राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय संकटाच्या वेळी या श्रद्धाळू लोकांनीही लोकांच्या हितासाठी शहाणपणा दाखवून निर्णय घेण्याची गरज असते. स्वत:च्या धार्मिक पद्धती बदलण्याची लोकांची तयारी नसते, अशावेळी त्या त्या धर्माच्या नेत्यांनी पुढे होऊन विद्यमान परिस्थितीत जो निर्णय योग्य असेल तो घेण्यास लोकांना भाग पाडले पाहिजे.

सी.ए.ए. आणि एन.आर.सी.च्या विरोधासाठी दिल्लीच्या शाहीनबाग येथे आंदोलन करणाºयांना तो अधिकार नक्कीच आहे. घटनेनेच त्यांनी हमी दिली आहे. या आंदोलनाला विकृत वळण देण्याचा जो प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे तो चुकीचा आहे. त्या ठिकाणी आंदोलन करणाºया ज्येष्ठ महिलांचा निर्धार निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. त्यांचे आंदोलन करणे राष्ट्रविरोधी अजिबात नाही. दिल्लीच्या कडक थंडीतही त्यांच्या निर्धाराला बाधा पोहचली नव्हती, पण अशा आंदोलनात जेव्हा मोठ्या संख्येने समाज एकत्र येतो तेव्हा कोरोना विषाणूविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यासमोर धोका निर्माण होतो. कारण त्यांच्या एकत्र येण्याने हा रोग पसरण्याचा धोका जास्त असतो. तेव्हा त्या धोक्याकडे आंदोलनकर्त्यांनी लक्ष द्यायला हवे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हुकूम काढून पन्नासपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. त्या हुकमाचे पालन व्हायला हवे. जामिया मिलिया येथे आंदोलन करणाºयांनी त्या आंदोलनाचे पालन केले आहे. शाहीनबाग येथील आंदोलनकर्त्यांनीही त्यांचे अनुकरण करायला हवे.

सध्याचा काळ धार्मिक ध्रुवीकरणाचा असून सध्याच्या सरकारचे त्यातील योगदान लक्षणीय आहे. पण प्रत्येक गोष्टीकडे धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षतेला विरोध या भूमिकेतून पाहण्याची गरज नाही. धर्मनिरपेक्षतेवर ज्यांना विश्वास आहे त्यांनी ‘मानवतेच्या दृष्टिकोनातून अल्पसंख्याकांनी वागायला हवे,’ हे सांगण्याचे धाडस दाखवायला हवे. राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, ‘मानवनिर्मित धार्मिक, वांशिक आणि प्रादेशिक भेदभावांना न जुमानता कोरोना विषाणू हा हल्ला करीत असतो. सध्या उपस्थित झालेल्या या संकटाच्या वेळी आपण सर्वजण केवळ मानव आहोत, याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी.’ कारण ‘मानवता परमो धर्म:’ हीच प्रत्येक धर्माची शिकवण आहे. हा मूलभूत धडा सामुदायिक होण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या