शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

कोरोना-विधवांना पुनर्विवाहाचा हक्क मिळावा, म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 08:46 IST

अकाली गेलेल्या नवऱ्यामागे आयुष्य कंठणे (विशेषतः ग्रामीण) तरुण स्त्रीसाठी सोपे नसते. कोरोना-विधवांच्या पुनर्विवाहाची चळवळ उभी करण्यामागे हाच उद्देश आहे!

- हेरंब कुलकर्णी(कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, महाराष्ट्र)

नुकताच नगर जिल्ह्यात राहुरी येथे एक तरुण व कोरोनाच्या साथीत पती गमावलेल्या विधवा महिलेचा विवाह संपन्न झाला. या महिलेला एक लहान मूल आहे. खरेतर, विधवाविवाहाला महाराष्ट्रात खूप मोठ्या सामाजिक चळवळीची परंपरा आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा फुले यांच्यापासून अनेक समाजसुधारकांनी  हा विषय पुढे नेला; पण सध्या मात्र प्रगत महाराष्ट्रात विधवा विवाहाचे प्रमाण मंदावले आहे. जातीची बंधने अधिक बळकट होत आहेत. दीड लाख शेतकरी आत्महत्या, त्यानंतर कोरोनाचा घाला, यामुळे विधवांचे प्रमाण वाढले आहे. दारूने मरणारे पुरुष, रस्ते अपघात व इतर आजारांत होणाऱ्या तरुणांच्या मृत्यूची संख्याही तितकीच लक्षणीय आहे. हा सारा तपशील बघता  विधवा विवाहाला पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळायला हवी.

 लग्न हेच स्त्रीचे एकमेव ईप्सित आहे का? स्त्री स्वतः आनंदाने जगू शकते, तिला पुरुषांच्या आधाराची गरज काय?- असे प्रश्न यावर विचारले जातात. लग्न ही व्यक्तिगत गोष्ट आहे. सहजीवनाची गरज वाटली तरच विवाह करावा हे अगदीच मान्य! परंतु  जीवनाची पुन्हा सुरुवात करताना जातीच्या परंपरा, रूढी आडव्या येत असतील, तर त्याला विरोधच केला पाहिजे. विधुर पुरुष कोणत्याही वयात लग्न करू शकतो; परंतु विधवेला जर मूल असेल, तर  आता कशाला संसार? असे म्हणून तिला लग्नापासून अडवले जाते. ग्रामीण भागात लग्न खूप कमी वयात झालेले असते व अगदी विसाव्या वर्षी तिला मूल झालेले असते, तरीही तिला तरुण वयात लग्नापासून रोखले जाते. या समजुती, परंपरा, जात वास्तव लक्षात घेता  विधवेने विवाह करावा की नाही?- हा तिचा निर्णय व्यक्तिगत राहत नाही, तर तो सामाजिक प्रश्न होतो.  

अनेकींच्या बाबतीत पुरुषासोबत घालवलेला कालावधी खूप कमी वर्षाचा व उरलेले आयुष्य  मोठे असते. मुले शिक्षणात व  नोकरीत रमली की, अवघ्या ४० ते ५० व्या वर्षी मानसिकदृष्ट्या ही स्त्री अगदी एकटी होऊन जाते. उरलेले भकास आयुष्य ती कशीतरी जगत राहते. अशा स्त्रियांच्या आयुष्यातील पोकळी भरून निघत नाही. 

ग्रामीण भागात लग्न हे काही प्रमाणात पुनर्वसनही ठरते.  ग्रामीण भागात एकट्या स्त्रीला  विखारी नजरा भोगाव्या लागतात. शारीरिक शोषण करण्याचे प्रयत्न होतात. पुनर्विवाह हे अशा स्त्रियांसाठी संरक्षण ठरते, हे वास्तव कटू असले तरी सत्य आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेची ही काळी बाजू असली तरी त्यासाठीही विधवा विवाह हा एक मार्ग ठरतो, हे लक्षात घ्यायला हवे. नव्या संसारात नवी संसाधने  असतील तर मुलांचे संगोपन व तिचा उदरनिर्वाह व्हायला मदत होते व तीही त्यात भर घालून तर संसार अधिक नेटाने पुढे नेऊ शकते. पती गेल्यावर त्या स्थितीमध्ये आयुष्याचे गणित मांडण्यापेक्षा नवी मांडणी करून पाहायला काय हरकत आहे?

 महाराष्ट्रातील ही चळवळ अधिक पुढे जाऊ शकते, याचे कारण  ग्रामीण भागात आज विवाह न झालेल्या तरुणांची संख्या खूप मोठी आहे. ते केवळ शेतकरी आहेत, नोकरी नाही म्हणून अविवाहित आहेत. सर्वच जातींमध्ये लग्न न झालेल्या जास्त वयाच्या तरुणांची संख्या मोठी आहे. अशावेळी विधवा विवाहाला गती दिली, तर अनेक तरुणांचे व या  विधवांचे सहजीवन सुरू होऊ शकते. असे तरुण जातीचाही विचार करत नाहीत. यातून आंतरजातीय विधवाविवाहाला गती  मिळू शकते. 

अर्थात, ‘मुलांसह विधवेशी लग्न’ असाच आग्रह धरायला हवा. कारण अनेक ठिकाणी मुलांना त्या महिलेच्या आई-वडिलांनी सांभाळावे, असा क्रूर आग्रह पुरुष धरतात. अशा विवाहांचे अजिबात समर्थन करता कामा नये व विधवा महिलांनीही या अटी स्वीकारू नयेत.‘कोरोनात एकल महिला पुनर्वसन समिती’ यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील १०० तालुक्यांत या महिलांसोबत काम करतो आहोत. या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणे, त्यांच्या व्यक्तिगत प्रश्नांची सोडवणूक करणे, शासनाशी सतत संवाद साधत धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पाडणे, या बाबी करत असताना आम्ही यातील महिलांना सहजीवन सुरू करायचे आहे, अशा महिलांसाठी आम्ही विवाह नोंदणी व्यासपीठ सुरू करतो आहोत. यातून या महिला आयुष्याची नवी सुरुवात करू शकतील.

टॅग्स :marriageलग्न