शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

Corona Vaccination: १०० कोटी लसींची मात्रा पूर्ण झाल्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 05:25 IST

लसीकरण क्षेत्रात भारताने केलेली कामगिरी लक्षणीय आहे. शंभर कोटी डोसच्या लसीकरणाचा टप्पा गाठताना देशाने इतर देशांनाही मदत केली आहे.

- डॉ. शशांक जोशी, सदस्य, कोरोना टास्क फोर्सवैश्विक पातळीवर लसीकरणाचा विचार करता, अन्य आजारांप्रमाणेच आता आपण कोरोना लसीकरणाबाबतही आत्मनिर्भर होऊन सुयश मिळविले आहे. यात दोन घटकांचा मोठा वाटा आहे. लसीच्या उत्पादन कंपन्या आणि लसीकरण मोहीम राबविण्यासाठी मनुष्यबळ तसेच अन्य यंत्रणांचे यात मोलाचे योगदान आहे. देशाची लोकसंख्या १३५ कोटी आहे, त्यानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या अखेरच्या टप्प्यात २०० कोटी लसी देण्यात येणार आहेत.देशात १६ जानेवारीला लसीचा पहिला डोस दिला गेला. त्यानंतर २७८ दिवसांनी शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा देशाने पार केला आहे. १०० कोटी डोस देणारा भारत हा जगातला दुसरा देश आहे. चीनने हा टप्पा जून महिन्यात पूर्ण केला होता. या वर्षाच्या शेवटापर्यंत लसीकरण पूर्ण करायचं असेल तर दिवसाला किमान १.२ कोटी लोकांना लस मिळायला हवी. ४५ पेक्षा अधिक वयाच्या सात कोटी लोकांना अजूनही लस मिळालेली नाही. लसीबाबत असलेली उदासीनता आणि तळागाळातल्या प्रत्येकाला लस मिळणे हे भविष्यातील मोठे आव्हान असणार आहे.

लसीकरणाचा वेग देशात सुरुवातीला अतिशय कमी होता. देशात ९६ कोटी लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. लसीच्या वितरणातील अडचणी, उत्पादनातील अडचणी, कोविडची दुसरी लाट यामुळे लसीकरणाची गती काहीशी मंदावली. देशातील पूर्ण लोकसंख्येचे  लसीकरण होण्यासाठी आणखी ९० कोटी डोसची गरज आहे. केंद्र सरकारचे उद्दिष्ट लक्षात घेतले, तर त्यासाठी आता फक्त दोन ते तीन महिनेच शिल्लक आहेत.  कोणत्याही विषाणूविरोधात जागतिक स्तरावर रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे जाऊ द्यावी लागतात. मात्र, रोगप्रतिबंधक लसीकरणातील स्थिर वाढ, नव्या लसींसाठी सातत्याने संशोधन आणि कृतिशील उपाययोजनांमुळे सकारात्मक भविष्याचे आश्वासनच मिळाले आहे. कोणतीही लसनिर्मिती करीत असताना चाचणी आणि संशोधनासाठी सामान्यतः काही वर्षे लागतात. कोविड-१९ च्या साथरोगामुळे सुरक्षित आणि प्रभावशाली लसनिर्मितीसाठी जागतिक स्तरावर अभूतपूर्व प्रयत्न करण्यात आले.
लसीकरण क्षेत्रात देशाने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. यापूर्वीही १९२०पासून म्हणजे गेल्या १०० वर्षांपासून भारताला लस बनवण्याचा अनुभव आहे. जगातील विविध आजारांवरील ७० टक्के लसी भारतात बनतात. भारतीय औषध कंपन्या जगातील विविध आजारांवरील ५० टक्के लसींची मागणी पूर्ण करतात. जगभरातल्या १५० देशांत भारताने बनवलेल्या लसी जातात. भारताने युरोप व अमेरिकेसारख्या विकसित देशांनाही कमी किमतीत विविध आजारांवरील लसी पुरवलेल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने आतापर्यंत विविध देशांतील आजार बरा करण्यासाठी भारताने बनवलेल्या लसी वापरलेल्या आहेत. भारत कमीत कमी ४० ते ५० पट स्वस्तात औषधं व लसी इतर देशांना देतो.
कोविडमुक्त भविष्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू असताना साथरोगावर जागतिक उपचार होणे अत्यावश्यक बनले आहेत. सध्या औषध व लसींच्या बाबतीत विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. शिवाय, लवकरच प्रतिबंधक गोळ्यांही चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात असल्याने ही दिलासादायक बाब आहे. याखेरीज, आता करोनाबाधित रुग्णांवर ‘अँटीबॉडी कॉकटेल’ उपचार पद्धती प्रभावी ठरत आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. कोरोनानंतर शासनाचा आरोग्यसेवा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. परिणामी, आरोग्याच्या अर्थसंकल्पापासून ते पायाभूत सेवा सुविधांपर्यंत यंत्रणा गांभीर्याने विचार करू लागली आहे. आपण आता प्रत्येक आजाराविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखत असून व्यवस्थापन व नियंत्रणावर बारकाईने लक्ष देत आहोत. भविष्यात आरोग्यसेवा क्षेत्राच्या दृष्टीने शासनाची यंत्रणा अद्ययावत आणि सक्षम असेल यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शब्दांकन : स्नेहा मोरे 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या