शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोरोना असो वा नसो,  मैदानात प्रेक्षक असोत वा नसोत, क्रिकेटकडे येणारा पैशांचा ओघ कायम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 05:32 IST

BCCI : कोरोनाच्या सावटातही बीसीसीआयने खेळाडूंना सप्टेंबर २०२१पर्यंत करारबद्ध करताना त्यांची रक्कम ‘जैसे थे’ ठेवलेली आहे. त्यात कसलीही काटछाट केलेली नाही.

भारताच्या क्रीडाविश्वाचा विचार केला, तर क्रिकेटसारखे सुदृढ अर्थकारण इतर कोणत्याही खेळाचे नाही. अफाट लोकप्रियता आहे, त्यामुळे या खेळात पैसासुद्धा आहे; पण ही लोकप्रियता नुसती टिकवूनच ठेवायची नाही तर ती वाढत राहावी यासाठीची जी उच्च कोटीची व्यावसायिकता लागते ती व्यावसायिकता आणि ती दृष्टी या देशात फक्त क्रिकेटची धुरा वाहणारांकडेच आहे. म्हणून कोरोना असो वा नसो,  मैदानात प्रेक्षक असोत वा नसोत, क्रिकेटकडे येणारा पैशांचा ओघ कायम आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने- बीसीसीआयने अलीकडेच २८ क्रिकेटपटूंशी केलेला वार्षिक करार.

कोरोनाच्या सावटातही बीसीसीआयने खेळाडूंना सप्टेंबर २०२१पर्यंत करारबद्ध करताना त्यांची रक्कम ‘जैसे थे’ ठेवलेली आहे. त्यात कसलीही काटछाट केलेली नाही. ठरल्याप्रमाणे मंडळाची जी सर्वोच्च श्रेणी आहे ‘ए प्लस’,  त्यातील क्रिकेटपटूंना वार्षिक सात कोटी रुपये,  ‘ए’ श्रेणीतील खेळाडूंना पाच कोटी रुपये,  ‘बी’  श्रेणीसाठी तीन कोटी रुपये आणि ‘सी’ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक प्रत्येकी एक कोटी रुपये मिळणार आहेत.  याखेरीज प्रत्येक कसोटीसाठी १५ लाख रुपये, वन डे सामन्यासाठी ६ लाख रुपये आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ३ लाख रुपये सामना शुल्क म्हणून मिळतात ते वेगळे. जाहिराती व प्रायोजकत्वातून येणारा पैसा वेगळा. साहजिकच क्रिकेटपटू बनला म्हणजे पैसाच पैसा हा जो लोकांचा समज झालाय तो चुकीचा नाही; पण फारच थोड्या म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या आणि कडव्या स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवणारांच्याच हाती हे घबाड लागते. १३० कोटींच्या वरील लोकसंख्येच्या देशात असे खेळाडू फक्त २५ ते ३० असतात आणि त्यांची जागा घेण्यासाठी  २५ ते ३० हजार खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात.

या २५ ते ३० खेळाडूंमध्ये यंदा ज्यांनी स्थान मिळविले, त्यात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराहसारखे ‘ए प्लस’ श्रेणीतील नेहमीचे चेहरे तर आहेतच; पण शुभमन गिल, अक्षर पटेल व मोहम्मद सिराजसारखे नवे चेहरेसुद्धा आहेत. हार्दिक पांड्या व शार्दूल ठाकूर यांना वरच्या श्रेणीचे बक्षीस मिळाले आहे. दुखापतींमुळे कामगिरीत सातत्य राखू न शकलेला भुवनेश्वर कुमार आणि कामगिरी घसरलेले युझवेंद्र चहल व कुलदीप यादव यांची श्रेणी घसरली आहे. मनीष पांडे व केदार जाधव हे तर बादच झाले आहेत. थोडक्यात काय तर बीसीसीआयचे हे वार्षिक करार म्हणजे क्रिकेटपटूच्या कामगिरीचा आरसा आहे. चांगली कामगिरी केली  तर बढती,  नाही तर खालची श्रेणी किंवा थेट बाद. काही खेळाडूंकडे दुर्लक्ष वा अन्याय झाल्याची ओरड होण्यास नेहमीच जागा असते तशी ती या करारांसंदर्भातही होते आहे.

यंदा टी. नटराजन, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन अशा उमद्या आणि चुणूक दाखविलेल्या खेळाडूंना करार मिळायला हवा होता अशी चर्चा आहे; पण जे करारबद्ध खेळाडू आहेत त्यांच्यापैकी कुणी योग्यतेचा नाही असे मात्र नाही. मात्र, नटराजन, यादव व किशन यांना करार मिळवायचा असेल  तर सातत्यपूर्ण कामगिरी दाखवावी लागणार, हे निश्चित. या करारांचा दुसरा फायदा असा की नावाजलेला खेळाडू असो की नवोदीत, जो कामगिरी दाखवील त्याला त्याच्या कामगिरीनुसार श्रेणी मिळेल.  कुणी मोठा, कुणी छोटा असा भेद नाही. शिवाय करारबद्ध खेळाडूंच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मंडळ उचलत असते.

युवराज सिंगच्या कर्करोगावरील उपचार असोत, की मोहम्मद शमीच्या पायाच्या दुखापतीवरील उपचार, त्यांना याचा फायदा मिळाला. याच्या आधीसुद्धा खेळाडूंना अर्थसाहाय्य मिळतच होते; पण आता ती प्रक्रिया अधिक सूत्रबद्ध झाली आहे. अर्थात नवोदित खेळाडूला संघात स्थान मिळणे, त्याने सातत्य दाखवणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण देशात इतके गुणवंत खेळाडू  आहेत, की एकाची जागा घेण्यासाठी दुसरा हजरच असतो. काही सामने जरी एखाद्या खेळाडूची कामगिरी वाईट झाली, तर तो कायमचाच संघाबाहेर जाऊन ‘माजी खेळाडू’ होऊ शकतो; पण स्पर्धेच्या जगात याला पर्याय नाही. करारांमध्ये ‘ए प्लस’ श्रेणी हाच एक मतभेदाचा विषय आहे.

महेंद्रसिंह धोनी व विराट कोहलीच्या सूचनेवरून ही श्रेणी आली आणि त्यात सातत्याने अत्युच्च दर्जाची कामगिरी करणाऱ्यांनाच स्थान देण्याचे ठरले; परंतु कुणी खेळाडू म्हणून नाही; पण कर्णधार म्हणून यशस्वी ठरत असेल तर त्याचे काय? कामगिरी झाली नाही म्हणून अवमूल्यन की कर्णधार म्हणून त्याच्या यशाचा विचार होणार, हे निश्चित नाही. हा एक मुद्दा सोडला तर सातत्याने चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी हीच पद्धत योग्य आहे आणि सातत्य राखाल तर करार मिळवाल हा त्याचा गुरुमंत्र आहे.

टॅग्स :BCCIबीसीसीआय