शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आहिस्ता चल जिंदगी, कुछ दर्द मिटाना बाकी है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 05:41 IST

रोज आजार आणि मृत्यूची वाट पाहणे हे कसले जगणे, प्रभू? हृदय विदीर्ण करणारी आपल्यांच्या आपलेपणाची ही कठोर परीक्षा का?

- अश्वनी कुमार, माजी केंद्रीय कायदा मंत्रीशब्दांत मांडणे अतिकठीण अशा  अपार वेदनांना शब्दरूप देण्याचा  प्रयत्न करीन म्हणतो. कारण व्यक्त होणे, सांगणे हाच शेवटी हृदयविदारक दु:ख हलके करण्याचा इलाज असतो. दीर्घकाळ मनात  असलेल्या दुःखाची किनार अधिकच गडद होऊ नये यासाठी ते आज मी देशवासीयांसमोर मांडू इच्छितो. तसे पाहता आपला इतिहास म्हणजे माणसाने मानवतेवर केलेल्या अगणित जुलमांची कहाणीच आहे. परंतु आज आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत तिच्यासारखे कोणतेच पान या इतिहासात दिसत नाही. राम राज्याची कल्पना जेथे मांडली गेली अशा भारतात आज दिसत असलेल्या परिस्थितीचे वर्णन कसे करावे हे मला कळत नाही. महामारीच्या प्रकोपातून वाचलेल्या भाग्यवंतांनी जरा आपल्या आजूबाजूला पाहावे, असे मला आग्रहाने सांगावेसे वाटते. काय दिसते सभोवती?

आपल्या तरुण मुलाला खांदा देण्याची वेळ वयस्कर बापावर येते आहे. लहानग्या मुलांना नजरेआड होताना आया व्याकूळ होत आहेत... ही वेळ, हे प्रभो, तू का आणलीस? असहाय हतबल वृद्ध त्यांच्या जीवनाच्या अंतिम चरणात आप्तांच्या प्रेमापासून, सेवेपासून वंचित का होत आहेत? मरणाच्या दारात पोहोचलेल्या नातवंडांना इस्पितळात घेऊन जायची वेळ, हे प्रभो, तू आजी आजोबांवर का आणलीस?  आपल्या मातेचे शव एकट्याने स्मशानात नेण्याची वेळ एखाद्या मुलावर का यावी? पित्याचे पार्थिव शरीर स्मशानात जागा न मिळाल्याने दोन दिवस घरात का ठेवावे लागावे? अंत्येष्टीविना पाण्यात सोडलेल्या शवांच्या पापांचे ओझे गंगामाईला का डोईवर घ्यावे लागले? हजारो कर्मचारी कर्तव्य बजावताना विनाइलाज कोरोनाचे शिकार का झाले? अनाथ असहाय मुलांना ही शिक्षा का प्रभू? हृदय विदीर्ण करणारी आपल्यांच्या आपलेपणाची ही कठोर परीक्षा का?
- इतके सगळे झाल्यावर तरी आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जायला तयार आहोत का? सर्व पात्र नागरिकांना तिसरी लाट येण्याआधी लस मिळेल का?  मुलांना कोरोनाने ग्रासले तर तोंड द्यायला देश सज्ज आहे का? देशात १८ वर्षांच्या खाली १६.५ कोटी मुले आहेत. पाच टक्के मुलांना इस्पितळात भरती करण्याची गरज भासली तर १.६५ लाख अतीव दक्षता सुविधेच्या खाटा लागतील. आज देशात केवळ दोन हजार अशा खाटा आहेत. देशात डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उणीव भासत असताना देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड द्यायला तयार आहे का? अहंकार आणि वर्चस्वाच्या लढाईने आपल्या नेत्यांना आंधळे केले आहे.  पण, तरीही हे कठीण प्रश्न विचारलेच पाहिजेत. कोरोनाविरुद्ध आरपारची लढाई जनतेच्या सहयोगातून सरकारच लढू शकते. सकारात्मक सूचनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य निर्णय घेतले तरच या परीक्षेत सरकार यशस्वी होईल. लोकांचे दबलेले दु:ख आणि मूक आक्रंदनात सरकार उलथवण्याची ताकद  असते, हे पंतप्रधान विसरू कसे शकतात? या प्रश्नातच उत्तर आहे. सरकार संवेदनशील आणि राष्ट्र सक्षम नाही, असेच वर्तमान स्थिती सांगते. हृदयाला पाझर फोडणारी राष्ट्रीय पीडा गल्ली-बोळांत ऐकू येते आहे. रोगराई आणि मृत्यूच्या सावलीत जगण्याचा अर्थ कवी गुलजार  नेमका पकडतात, तो हा असा...आहिस्ता चल जिंदगीअभी कुछ कर्ज चुकाना बाकी है, कुछ दर्द मिटाना बाकी है!शेवटी पुरुषार्थ आणि धैर्य विजयी होते हे मला ठाऊक आहे. परंतु या महासंकट काळात केवळ आशावादी राहणे पुरेसे नाही. या विध्वंसक काळात ईश्वराची कृपा आणि करुणाच संकटातून सोडवील. राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या ‘रश्मी रथी’ या कवितेतील ओळी उद्धृत करून हा लेख संपवतो.“हे दयानिधे, रथ रोको अब क्यों प्रलय की तैयारी है? यह बिना शस्त्र का युद्ध है, जो महाभारत से भी भारी है राघव-माधव-मृत्युंजयपिघलो, यह अर्ज हमारी है... (लेखातील विचार व्यक्तिगत)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या