शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आहिस्ता चल जिंदगी, कुछ दर्द मिटाना बाकी है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 05:41 IST

रोज आजार आणि मृत्यूची वाट पाहणे हे कसले जगणे, प्रभू? हृदय विदीर्ण करणारी आपल्यांच्या आपलेपणाची ही कठोर परीक्षा का?

- अश्वनी कुमार, माजी केंद्रीय कायदा मंत्रीशब्दांत मांडणे अतिकठीण अशा  अपार वेदनांना शब्दरूप देण्याचा  प्रयत्न करीन म्हणतो. कारण व्यक्त होणे, सांगणे हाच शेवटी हृदयविदारक दु:ख हलके करण्याचा इलाज असतो. दीर्घकाळ मनात  असलेल्या दुःखाची किनार अधिकच गडद होऊ नये यासाठी ते आज मी देशवासीयांसमोर मांडू इच्छितो. तसे पाहता आपला इतिहास म्हणजे माणसाने मानवतेवर केलेल्या अगणित जुलमांची कहाणीच आहे. परंतु आज आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत तिच्यासारखे कोणतेच पान या इतिहासात दिसत नाही. राम राज्याची कल्पना जेथे मांडली गेली अशा भारतात आज दिसत असलेल्या परिस्थितीचे वर्णन कसे करावे हे मला कळत नाही. महामारीच्या प्रकोपातून वाचलेल्या भाग्यवंतांनी जरा आपल्या आजूबाजूला पाहावे, असे मला आग्रहाने सांगावेसे वाटते. काय दिसते सभोवती?

आपल्या तरुण मुलाला खांदा देण्याची वेळ वयस्कर बापावर येते आहे. लहानग्या मुलांना नजरेआड होताना आया व्याकूळ होत आहेत... ही वेळ, हे प्रभो, तू का आणलीस? असहाय हतबल वृद्ध त्यांच्या जीवनाच्या अंतिम चरणात आप्तांच्या प्रेमापासून, सेवेपासून वंचित का होत आहेत? मरणाच्या दारात पोहोचलेल्या नातवंडांना इस्पितळात घेऊन जायची वेळ, हे प्रभो, तू आजी आजोबांवर का आणलीस?  आपल्या मातेचे शव एकट्याने स्मशानात नेण्याची वेळ एखाद्या मुलावर का यावी? पित्याचे पार्थिव शरीर स्मशानात जागा न मिळाल्याने दोन दिवस घरात का ठेवावे लागावे? अंत्येष्टीविना पाण्यात सोडलेल्या शवांच्या पापांचे ओझे गंगामाईला का डोईवर घ्यावे लागले? हजारो कर्मचारी कर्तव्य बजावताना विनाइलाज कोरोनाचे शिकार का झाले? अनाथ असहाय मुलांना ही शिक्षा का प्रभू? हृदय विदीर्ण करणारी आपल्यांच्या आपलेपणाची ही कठोर परीक्षा का?
- इतके सगळे झाल्यावर तरी आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जायला तयार आहोत का? सर्व पात्र नागरिकांना तिसरी लाट येण्याआधी लस मिळेल का?  मुलांना कोरोनाने ग्रासले तर तोंड द्यायला देश सज्ज आहे का? देशात १८ वर्षांच्या खाली १६.५ कोटी मुले आहेत. पाच टक्के मुलांना इस्पितळात भरती करण्याची गरज भासली तर १.६५ लाख अतीव दक्षता सुविधेच्या खाटा लागतील. आज देशात केवळ दोन हजार अशा खाटा आहेत. देशात डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उणीव भासत असताना देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड द्यायला तयार आहे का? अहंकार आणि वर्चस्वाच्या लढाईने आपल्या नेत्यांना आंधळे केले आहे.  पण, तरीही हे कठीण प्रश्न विचारलेच पाहिजेत. कोरोनाविरुद्ध आरपारची लढाई जनतेच्या सहयोगातून सरकारच लढू शकते. सकारात्मक सूचनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य निर्णय घेतले तरच या परीक्षेत सरकार यशस्वी होईल. लोकांचे दबलेले दु:ख आणि मूक आक्रंदनात सरकार उलथवण्याची ताकद  असते, हे पंतप्रधान विसरू कसे शकतात? या प्रश्नातच उत्तर आहे. सरकार संवेदनशील आणि राष्ट्र सक्षम नाही, असेच वर्तमान स्थिती सांगते. हृदयाला पाझर फोडणारी राष्ट्रीय पीडा गल्ली-बोळांत ऐकू येते आहे. रोगराई आणि मृत्यूच्या सावलीत जगण्याचा अर्थ कवी गुलजार  नेमका पकडतात, तो हा असा...आहिस्ता चल जिंदगीअभी कुछ कर्ज चुकाना बाकी है, कुछ दर्द मिटाना बाकी है!शेवटी पुरुषार्थ आणि धैर्य विजयी होते हे मला ठाऊक आहे. परंतु या महासंकट काळात केवळ आशावादी राहणे पुरेसे नाही. या विध्वंसक काळात ईश्वराची कृपा आणि करुणाच संकटातून सोडवील. राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या ‘रश्मी रथी’ या कवितेतील ओळी उद्धृत करून हा लेख संपवतो.“हे दयानिधे, रथ रोको अब क्यों प्रलय की तैयारी है? यह बिना शस्त्र का युद्ध है, जो महाभारत से भी भारी है राघव-माधव-मृत्युंजयपिघलो, यह अर्ज हमारी है... (लेखातील विचार व्यक्तिगत)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या