शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एस ४00 चा करार आणि स्वायत्तता धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 07:34 IST

दृष्टिकोन

चिंतामणी भिडे।

‘स्ट्रॅटेजिक आॅटॉनॉमी’, म्हणजेच धोरण स्वायत्ततेला भारताने कायम महत्त्व दिले आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात सुरुवातीपासूनच हा कळीचा मुद्दा राहिला आहे. अलिप्ततावादी चळवळीच्या धोरणामागेही हेच उद्दिष्ट होते आणि सोव्हिएत युनियनच्या ºहासानंतर अलिप्ततावादी चळवळ कालबाह्य ठरत जाण्याच्या सुमारास तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरिसंह राव यांनी स्वीकारलेल्या ‘लुक ईस्ट पॉलिसी’मागील एक उद्दिष्ट भारताची धोरण स्वायत्ततेची क्षमता टिकवून ठेवणे हेच होते.

रावांच्या काळापासून गेल्या तीन दशकांत आणि विशेषत: भारत-अमेरिका संबंधांच्या गेल्या दोन दशकांच्या काळात जागतिक पातळीवर अनेक बदल झाले असले आणि अनेक नवे हितसंबंध निर्माण होत असले, तरी भारताने आपली ही क्षमता टिकवून ठेवण्यात यश मिळविले. याचे एक प्रमुख कारण या काळात भारताने केलेली आर्थिक प्रगती आणि जागतिक व्यापारात भारताला आलेले महत्त्व हेदेखील आहेच, परंतु अलीकडच्या दोन घटनांमुळे भारताचे हे धोरण स्वातंत्र्य धोक्यात येते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. या दोन्ही घटना किंवा दोन्ही मुद्दे भारताच्या परराष्ट्र धोरणाइतक्याच राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहेत.त्यापैकी पहिली आहे तेलखरेदी. भारत इराणकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करतो, परंतु अमेरिकेने कॅट्सा कायदा केल्यामुळे ही तेल खरेदी धोक्यात आली आहे. अमेरिकेने ‘काउंटरिंग अमेरिकाज अ‍ॅडव्हर्सरीज थ्रू सँक्शन्स अ‍ॅक्ट’ (कॅट्सा) हा कायदा करून अमेरिकेच्या हितसंबंधांना बाधा आणणाऱ्या देशांवर आणि त्या देशांशी व्यवहार करणाºया देशांवर आर्थिक निर्बंध घालण्याची तरतूद केली आहे. इराणबरोबरच्या अण्वस्त्र करारातून माघार घेतल्यानंतर, अमेरिकेने इराणवर निर्बंध लादलेत आणि इराणशी कोणी व्यापार करू नये, असा दम अन्य देशांना दिला आहे. त्यामुळे भारताची तेलखरेदी धोक्यात आली आहे.भारत-रशिया संबंध, भारताची धोरण स्वायत्तता आणि पश्चिम आशियातील समीकरणे या दृष्टीने तर ही अत्यंत सकारात्मक घडामोड आहेच, त्याचबरोबर भारत-अमेरिका संबंध वाढविण्यासाठी भारत आपल्या हितसंबंधांचा आणि धोरण स्वायत्ततेचा बळी देणार नाही, हा महत्त्वाचा संदेश या निमित्ताने अमेरिकाला मिळणार आहे. भारताने आता ‘कॅट्सा’ निर्बंधातून सवलत मिळण्यासाठी अमेरिकेवर दबाव आणला पाहिजे. चीननेही रशियाकडून एस ४00 क्षेपणास्त्र रोधक यंत्रणा खरेदी केल्यामुळे अमेरिकेने अलीकडेच चीनवर निर्बंध लादले आहेत. चीनला रोखण्यासाठी भारताला सोबत घेण्याचे हरेक प्रयत्न अमेरिका करत आहे. त्यामुळे आर्थिक निर्बंधांतून भारताला अमेरिकेने सवलत दिल्यास चीनलादेखील एक वेगळा संदेश जाईल. भारताला ‘कॅटसा’ कायद्यातून सवलत देण्याबाबत ट्रम्प प्रशासन अनुकूल आहे, पण अमेरिकी काँग्रेसकडून ही सवलत मिळविणे, तितकी सहजसाध्य बाब नाही. त्यामुळेच भारताला आपल्या डिप्लोमसीचा कस लावावा लागेल. तूर्तास तरी रशिया या आपल्या जुन्या मित्राची योग्य बूज राखल्याबद्दल आणि भारताचे धोरण स्वातंत्र्य अबाधित ठेवल्याबद्दल मोदी सरकार अभिनंदनास पात्र आहे.(लेखक आंतरराष्ट्रीय विषयक अभ्यासक आहेत) 

टॅग्स :russiaरशियाIndiaभारत