शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

काँग्रेसच्या "अच्छे दिना"च्या वाटेत "हमरीतुमरी"चे काटे!

By किरण अग्रवाल | Updated: October 22, 2023 21:47 IST

सारांशः पक्षांतर्गत मतभेद जाहीरपणे चव्हाट्यावर येण्यातून पक्षाचीच होते आहे शोभा...

- किरण अग्रवाल

काँग्रेसतर्फे अकोल्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येऊन गेल्याने पक्षासाठी आश्वासक ठरू पाहणाऱ्या वातावरणाला त्यातून गालबोट लागून गेले आहे. मतभेद कुठे नसतात, पण ते नको तिथे प्रदर्शित होतात तेव्हा नुकसानीस निमंत्रणच देऊन जाणारेच ठरतात.

काँग्रेस पक्षाच्या राजकीय नुकसानीसाठी विरोधकांची गरज नसतेच मुळी, स्वकीयच त्यासाठी पुरेसे असतात; हे जे काही बोलले जाते ते चुकीचे नसल्याचा प्रत्यय अकोलेकरांनी पुन्हा एकदा आणून दिला आहे. एकीकडे पक्षाचे नेते ''मोहब्बत की दुकान'' लावत असताना, दुसरीकडे स्थानिक नेते मात्र ''नफरत की दुकान'' चालू ठेवू पाहतात तेव्हा सामान्य कार्यकर्ते व पुन्हा या पक्षाकडे आकर्षित होऊ पाहणारे मतदारही संभ्रमित झाल्याखेरीज राहात नाहीत.

मोर्चे काढून किंवा आंदोलने करून काँग्रेसची प्रतिमा उंचावण्याएवढी शक्ती अकोल्यातील पदाधिकाऱ्यांत उरलेली नाही हे खरेच, त्याची कारणे येथल्या गटबाजीत दडलेली आहेत. दुसऱ्याकडे बोट दाखविताना उर्वरित चार बोटे आपल्याकडे वळलेली असतात याचा विचारच कुणाकडून केला जात नसल्याने ही दूरवस्था ओढवली आहे, पण त्यातून बोध घेताना कोणी दिसत नाही. चार दोन लोकांना सोबत घेऊन निवेदनबाजी करण्यात धन्यता मानणारी स्थानिक चमू पत्रकार परिषदेप्रसंगी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधिंसमोरही जेव्हा आपल्या अंतर्गत नाराजीचे प्रदर्शन घडविण्यात मागे पुढे पाहत नाही तेव्हा अशांना पक्षापेक्षा आपले स्वतःचे सवतेसुभे सांभाळणेच किती प्रिय वाटते हेच लक्षात यावे.

अकोल्यातील काँग्रेसला नेत्यांची व पक्ष संघटनात्मक मजबुतीची मोठी परंपरा राहिली आहे. कितीही राजकीय उलथापालथी झाल्या तरी अठरापगड जातीतील एकगठ्ठा मतदार पक्षाच्या पाठीशी राहात आला आहे. गाय वासरू निशाणी असतानापासून ते आताच्या पंजापर्यंत हा मतदार काँग्रेसचा फिक्स आहे, म्हणूनच तर इतिहासात असगर हुसैन व वसंत साठे यांच्यासारखे नेते या मतदारसंघातुन निवडून गेले आहेत. राज्यात विविध मातब्बर मंत्री अकोल्याने दिले आहेत, पण ही स्थिती आता लयास गेल्यानेच ''कमळ'' फुलले आहे. अर्थात अशातही अलीकडे राजकीय स्थिती झपाट्याने बदलू पहात आहे, पण विरोधकांच्या बेफिकीरीचे प्रदर्शन मांडण्याऐवजी स्थानिक काँग्रेस नेत्यांचीच अरेरावी समोर येत आहे आणि त्यावर विरोधकांनी फोकस करण्यापूर्वी स्वकीयांनाच गावभर दवंडी पिटण्यात आनंद होतो म्हटल्यावर कमजोरीत कमजोरी वाढणे स्वाभाविक आहे.

महत्वाचे म्हणजे, साधे कुणी कुठे उभे राहून फोटो काढायचा यावरून झालेला वाद थेट पिस्तूल काढले गेल्याच्या आरोपापर्यंत जाऊन पोहोचतो तेव्हा त्यातून स्थानिक नेतृत्वाचे ''निर्नायकी''पणही अधोरेखित होऊन जाते. कुणी कुणाचे ऐकणाराच येथे नाही. सारेच नेते आहेत. पॅराशुट नेत्यांच्या पक्षातील घुसखोरीचा मुद्दा यानिमित्ताने चर्चेत आणला गेला, पण ते कुठे नाही? उलट याबाबत भाजपाला मार्क द्यायला हवेत, की एवढे मित्रपक्ष सोबत घेतल्याने मूळ पक्षाच्या कार्यकर्त्यांची अडचण होऊन बसली आणि संधीही नाकारली जातेय, पण ते निष्ठा व शिस्तीचे किमान जाहीरपणे उल्लंघन करताना दिसत नाहीत. काँग्रेसमध्ये मात्र हाती काही नसतांना हमरीतुमरी होते आहे. रिकाम्या ताटाचाच खणखणाट जास्त असतो तसे हे झाले.

बरे ''पॅराशुट'', म्हणजे बाहेरून येऊन सुगीचे दिवस अनुभवणाऱ्या प्रवृत्तीबद्दल बोलायचे तर हमरीतुमरी करणारेच काय, अगदी जिल्हा नेतृत्वाकडेही त्यासंदर्भाने बघता यावे. ''असे'' नेतृत्व व्यासपीठावर व निष्ठावान, जुने मात्र अंग चोरून समोर सतरंजीवर बसलेले दिसतात. पक्ष मोडकळीस आला आहे तो त्याचमुळे. मोजक्या, मर्यादितांची निवेदनबाजी करतांना साधे पक्षाच्या फ्रंटल शाखा प्रमुखांना सोबत घेण्याची तसदी घेतली जात नाही म्हटल्यावर पक्ष विस्तारणार कसा? नानाभाऊ पटोले किंवा अन्य कोणी वरिष्ठ नेते आले की गौर मांडल्यागत एका रांगेत बसलेले दिसणारे स्थानिक नेते वरिष्ठांची पाठ फिरताच एकमेकांच्या दाराकडेही ढुंकून पाहत नाहीत, ही वास्तविकता आहे.

सारांशात, काँग्रेसला ''अच्छे दिन'' येऊ घातल्याची प्रक्रिया गतिमान होऊ पाहत असताना स्थानिक पातळीवरील स्वकीयांकडूनच परस्परांचे फुगे फोडण्याचे प्रकार थांबत नसल्याने ते पक्षासाठीच नुकसानदायी ठरले तर आश्चर्य वाटू नये. मदन भरगड यांनी असे का केले व डॉ. अभय पाटील यांनी खरेच तसे काही केले का, हा एवढ्यापुरता मुद्दा नाहीच, मुद्दा आहे तो स्थानिक नेत्यांना पक्ष वाढविण्यात सारस्य नसेल तर किमान तो खुंटविण्याचे पातक तरी ते टाळू शकतील का, एवढाच!

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण