शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

काँग्रेसचा निवडणूक जनसंघर्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 00:21 IST

‘महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कांसाठी’ या घोषवाक्यासह महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे.

- वसंत भोसले‘महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कांसाठी’ या घोषवाक्यासह महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. तिचा प्रारंभ कोल्हापुरातून ३१ आॅगस्टला झाला. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रेचा शनिवारी पुण्यात ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद व राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर कडाडून टीका करण्यात आली.आगामी वर्ष हे सार्वत्रिक निवडणुकांचे आहे. प्रथम लोकसभा, त्यानंतर चारच महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होईल. त्याच्या तयारीसाठीच ही यात्रा आखण्यात आल्याचे जाहीरपणेच प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करून, पुन्हा एकदा सर्व कॉँग्रेसजनांना एकत्र करण्याचे पाऊल ते टाकत आहेत.वास्तविक, महाराष्ट्राची राजकीय वीण पाहिली तर सर्वांत मोठा पक्ष म्हणून कॉँग्रेसला जनाधार आहे. तो पूर्वीही होता आणि सन २०१४ ची निवडणूक होईपर्यंत कायम राहिला होता. त्यानंतर मात्र पक्ष संघटनेच्या पातळीवर दुर्लक्ष झाल्याने कार्यकर्ते हवालदिल झाले होते. अनेक नेते निष्क्रिय राहिले होते. अनेकांचे गट-तट हेव्या-दाव्याने भांडत राहिले होते. त्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी गट-तट बाजूला सारून सर्वांना एकत्र करण्याची मोहीमच या यात्रेनिमित्त सुरू केली आहे, असे चित्र दिसते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील यात्रेच्या निमित्ताने झालेले कार्यक्रम त्याचे द्योतकच आहे. कोल्हापुरात आवाडे-आवळे गट एकत्र आले. सोलापुरात अशोक चव्हाण यांनी एमआयएमला लक्ष्य केले.केवळ नेत्यांच्या गटबाजीने कोल्हापूर, सांगली, सोलापूर व पुण्यासह अनेक जिल्ह्यांत भाजपा सत्तेवर आला. पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे निष्क्रियता आली होती. ती घालवण्यासाठी पक्षाने महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसच्या प्रभारीपदाची जबाबदारी ज्येष्ठ नेते खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोपविली. यात्रेला पश्चिम महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील भाजपाचा कारभार कोणत्याही पातळीवर उजवा नाही, जनतेत असंतोष नसला तरी नाराजी निश्चित आहे. भाजपाला पर्याय देण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यायला हवा आहे, तो सध्या घेताना दिसत आहे.राज्यपातळीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण, माजी मंत्री जयवंतराव आवळे आणि प्रकाश आवाडे, नगरचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आणि सतेज पाटील यासारख्या जोड्या एकत्र काम करू पाहत आहेत, त्या कार्यकर्त्यांना ऊर्मी देणाऱ्या आहेत. रत्नागिरी, रायगड, जळगाव, परभणी आदी काही जिल्ह्यांत काँग्रेसची ताकद नगण्य आहे. या सर्व पातळीवर अशोक चव्हाण यांनी लक्ष घातल्याने, त्यांना खर्गे यांची साथ मिळाल्याने एक प्रभावी विरोधी पक्ष उभा राहू शकतो, शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घ्यावी लागणार आहे. ती भूमिका अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेत स्पष्टपणे मांडल्याने दिशा तरी स्पष्ट झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमधील संभ्रम तरी दूर व्हायला ही जनसंघर्ष यात्रा मदतकारक ठरणारी असेल.

(लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक)

टॅग्स :congressकाँग्रेस