शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

काँग्रेसचा निवडणूक जनसंघर्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 00:21 IST

‘महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कांसाठी’ या घोषवाक्यासह महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे.

- वसंत भोसले‘महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कांसाठी’ या घोषवाक्यासह महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. तिचा प्रारंभ कोल्हापुरातून ३१ आॅगस्टला झाला. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रेचा शनिवारी पुण्यात ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद व राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर कडाडून टीका करण्यात आली.आगामी वर्ष हे सार्वत्रिक निवडणुकांचे आहे. प्रथम लोकसभा, त्यानंतर चारच महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होईल. त्याच्या तयारीसाठीच ही यात्रा आखण्यात आल्याचे जाहीरपणेच प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करून, पुन्हा एकदा सर्व कॉँग्रेसजनांना एकत्र करण्याचे पाऊल ते टाकत आहेत.वास्तविक, महाराष्ट्राची राजकीय वीण पाहिली तर सर्वांत मोठा पक्ष म्हणून कॉँग्रेसला जनाधार आहे. तो पूर्वीही होता आणि सन २०१४ ची निवडणूक होईपर्यंत कायम राहिला होता. त्यानंतर मात्र पक्ष संघटनेच्या पातळीवर दुर्लक्ष झाल्याने कार्यकर्ते हवालदिल झाले होते. अनेक नेते निष्क्रिय राहिले होते. अनेकांचे गट-तट हेव्या-दाव्याने भांडत राहिले होते. त्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी गट-तट बाजूला सारून सर्वांना एकत्र करण्याची मोहीमच या यात्रेनिमित्त सुरू केली आहे, असे चित्र दिसते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील यात्रेच्या निमित्ताने झालेले कार्यक्रम त्याचे द्योतकच आहे. कोल्हापुरात आवाडे-आवळे गट एकत्र आले. सोलापुरात अशोक चव्हाण यांनी एमआयएमला लक्ष्य केले.केवळ नेत्यांच्या गटबाजीने कोल्हापूर, सांगली, सोलापूर व पुण्यासह अनेक जिल्ह्यांत भाजपा सत्तेवर आला. पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे निष्क्रियता आली होती. ती घालवण्यासाठी पक्षाने महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसच्या प्रभारीपदाची जबाबदारी ज्येष्ठ नेते खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोपविली. यात्रेला पश्चिम महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील भाजपाचा कारभार कोणत्याही पातळीवर उजवा नाही, जनतेत असंतोष नसला तरी नाराजी निश्चित आहे. भाजपाला पर्याय देण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यायला हवा आहे, तो सध्या घेताना दिसत आहे.राज्यपातळीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण, माजी मंत्री जयवंतराव आवळे आणि प्रकाश आवाडे, नगरचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आणि सतेज पाटील यासारख्या जोड्या एकत्र काम करू पाहत आहेत, त्या कार्यकर्त्यांना ऊर्मी देणाऱ्या आहेत. रत्नागिरी, रायगड, जळगाव, परभणी आदी काही जिल्ह्यांत काँग्रेसची ताकद नगण्य आहे. या सर्व पातळीवर अशोक चव्हाण यांनी लक्ष घातल्याने, त्यांना खर्गे यांची साथ मिळाल्याने एक प्रभावी विरोधी पक्ष उभा राहू शकतो, शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घ्यावी लागणार आहे. ती भूमिका अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेत स्पष्टपणे मांडल्याने दिशा तरी स्पष्ट झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमधील संभ्रम तरी दूर व्हायला ही जनसंघर्ष यात्रा मदतकारक ठरणारी असेल.

(लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक)

टॅग्स :congressकाँग्रेस