शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवाद ही कपोलकल्पित संकल्पना, जाणून घ्या काय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 06:23 IST

राष्ट्रीय आणि प्रादेशिक ओळख ही कल्पनानिर्मिती आहे. हिंदुत्व आणि काश्मिरियत या दोन्हींचा शोध लावण्यात आलेला आहे.

गुरचरण दास

जम्मू-काश्मीरचा राजकीय दर्जा बदलण्यात आल्याने काश्मिरी जनता दुखावली आहे. तेथील जनतेत संताप, भय आणि परकीयपणाची आणि आत्मसन्मान गमावल्याची भावना बळावली आहे. कायदेशीर मार्गाने किंवा इतिहासाच्या दृष्टिकोनातून अनेकांनी काश्मिरी जनतेच्या या व्यथेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; परंतु गरज आहे ती राष्ट्रीय ओळखीसंदर्भातील तात्त्विक समंजसपणाची.

राष्ट्रीय आणि प्रादेशिक ओळख ही कल्पनानिर्मिती आहे. हिंदुत्व आणि काश्मिरियत या दोन्हींचा शोध लावण्यात आलेला आहे. यातून संताप काही प्रमाणात शांत करण्यास मदत होईल. याबाबत विशेषत: काश्मिरी जनता आणि भारतीयांची प्रशंसा करायला हवी. अनुच्छेद ३७० मधील बव्हंशी तरतुदी ज्या पद्धतीने सरकारने रद्द केल्या, ते दुर्दैवी आहे. काश्मिरी जनतेची संमती कशा प्रकारे मिळवायला हवी होती, यावरील गुणदोषावरील विवेचन नाही; परंतु काश्मिरी जनतेला राहण्यासाठी भारत हेच अपेक्षित स्थान असल्याची जाणीव झाल्यानंतर काळाच्या ओघात त्यांच्या संतापाची भावना दूर होईल. देशात राहण्याची इच्छा प्रबळ होणे, हीच खरी जनतेची संमती होय.याचा अर्थ असा की, फक्त काश्मिरी लोकांसाठीच नव्हे, तर सर्व भारतीयांसाठी भारत हे राहण्यासाठी इच्छित स्थान बनले पाहिजे. तेव्हा राहण्यासाठी भारत देश कसे इच्छित स्थान होईल? हा प्रश्न आहे. विविध ओळख असलेला भारत हे केंद्रीय संघराज्य आहे. काही वर्षांपूर्वी निम्मे राज्य गमावलेल्या आंध्रच्या जनतेच्या दु:खापेक्षा काश्मिरी जनतेचे दु:ख वेगळे आहे, असे काही म्हणत असतील. काहींचा असा युक्तिवाद आहे की, काश्मीर हे सीमावर्ती राज्य असून, विशिष्ट इतिहासाने ते अद्वितीय आहे; परंतु पंजाबसारख्या अन्य सीमावर्ती राज्यांतील जनतेला फाळणीच्या वेळी आपली घरेदारे गमवावी लागली. त्यांचे दु:खही हृदयविदारक आहे. नंतर पंजाबचे विभाजन करून हरियाणा आणि हिमाचल प्रदेशची निर्मिती करण्यात आली. पंजाब आणि आंध्रमधील जनतेने असा बदल करण्यास सांगितला होता का?काही उदारमतवाद्यांचे म्हणणे आहे की, सार्वमत, स्वयंनिर्णय हाच संमतीचा एकमेव योग्य मार्ग आहे. तेव्हा काश्मिरी जनतेलाही स्वयंनिर्णय या तत्त्वाच्या आधारे बाहेर पडण्याचा पर्याय द्यायला हवा. हे खरे असेल, तर आपल्यावर आंध्र प्रदेशात स्वयंनिर्णय घेण्याचे बंधन नाही का? १९४७ आधीचा विचार केल्यास ब्रिटिश गेल्यानंतर भारताचा ४० टक्के भाग बळकावणाऱ्या ५६५ संस्थानांतील जनतेसाठी या तत्त्वाचा अवलंब करायला नको होता का? काश्मीर हे त्यापैकी एक संस्थान होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते भारत ३ हजार जातींचा देश आहे. मग तेथे ३,००० सार्वमत घ्यायला हवे होते का? राजेशाहीत ब्रिटिश आणि भारतीयांकडून शासन करण्यासाठी एकही पर्याय दिला गेला नाही. ब्रिटिशांनी जाऊ नये, अशी पुरेशा संख्येने भारतीयांची इच्छा असती, तर भारत या नावाने स्वतंत्र राष्टÑ निर्माण होऊ शकले नसते. जसे की ब्रिटनने ब्रेक्झिटनंतर शोधलेला सार्वमत हा एक मार्ग होऊ शकतो. समान वंश, भाषा व सामायिक संस्कृतीवर आधारित राष्टÑ-राज्याच्या संकल्पनेचा शोध अलीकडील काळातील आहे. ही संकल्पना वेस्टफालियाच्या करारात (१६४८) जन्माला आली असली तरी १९ व्या शतकापर्यंत ती प्रसृत झाली नव्हती. १८१५ मध्ये नेपोलियनचा पाडाव होईपर्यंत युरोपात बहुतांश राजे-महाराजे होते. त्यानंतर युरोपियनांनी जाणीवपूर्वक राष्टÑ-राज्याची संकल्पना साकारली. या ठिकाणी नैसर्गिक एकत्रितपणाची भावना साहजिकच नसली तरी त्यांच्या नेत्यांनी ती तयार केली व इतिहासाच्या शालेय पाठ्यपुस्तकांमधून लोकांपर्यंत पोहोचवली. हिंदू राष्टÑवादीही आज हेच करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

धोकादायक राष्टÑवादामुळे उद्भवलेल्या पहिल्या जागतिक युद्धाच्या भीषण अनुभवानंतर जगाने १९२० मध्ये नैतिक विचारांवर आधारलेली राष्टÑीय स्वयंनिर्णयाची संकल्पना आणली. आपला भारत हे राष्टÑ असल्याचे सिद्ध करण्यावर आपला स्वातंत्र्य मिळवण्याचा दावा अवलंबून आहे, हे स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनाही जाणवले होते. ही भावना अत्यंत महत्त्वाची होती. कारण ब्रिटिश राजवटीत अनेक वसाहतवाद्यांना वाटत होते की, भारत ही एक भौगोलिक अभिव्यक्ती आहे. (हे विन्स्टन चर्चिलचे शब्द आहेत.) अशा प्रकारे महात्मा गांधी हे आमचे प्रमुख उद्गाते बनले. या सर्व प्रकरणाचा धुरळा बसल्यानंतर काश्मीर उदास मनाने भारतात मिसळून गेल्याचा मुद्दा गौण होईल. सर्वसामान्य काश्मिरींच्या डोळ्यांना भारताचे कसे स्वरूप दिसते, यावर या एकत्रीकरणाचे यश अवलंबून आहे. येथे भारतीय सरकारची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. उत्तम शासन, कायद्यासमोर सर्व समान असल्याची खात्री देणे, लोकांना त्यांचे नियम बदलण्याची संधी देणे, शिक्षण व आरोग्याच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांना भरभराट साधण्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून द्यावे लागेल. यामुळेच तेथील प्रत्येक जण भारतात राहण्यास पसंती देईल. जगात देशांचा शोध लावला जातो आणि राष्टÑवाद कपोलकल्पित आहे, हीच खरी मान्यता आहे.
(लेखक आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत