शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

राष्ट्रवाद ही कपोलकल्पित संकल्पना, जाणून घ्या काय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 06:23 IST

राष्ट्रीय आणि प्रादेशिक ओळख ही कल्पनानिर्मिती आहे. हिंदुत्व आणि काश्मिरियत या दोन्हींचा शोध लावण्यात आलेला आहे.

गुरचरण दास

जम्मू-काश्मीरचा राजकीय दर्जा बदलण्यात आल्याने काश्मिरी जनता दुखावली आहे. तेथील जनतेत संताप, भय आणि परकीयपणाची आणि आत्मसन्मान गमावल्याची भावना बळावली आहे. कायदेशीर मार्गाने किंवा इतिहासाच्या दृष्टिकोनातून अनेकांनी काश्मिरी जनतेच्या या व्यथेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; परंतु गरज आहे ती राष्ट्रीय ओळखीसंदर्भातील तात्त्विक समंजसपणाची.

राष्ट्रीय आणि प्रादेशिक ओळख ही कल्पनानिर्मिती आहे. हिंदुत्व आणि काश्मिरियत या दोन्हींचा शोध लावण्यात आलेला आहे. यातून संताप काही प्रमाणात शांत करण्यास मदत होईल. याबाबत विशेषत: काश्मिरी जनता आणि भारतीयांची प्रशंसा करायला हवी. अनुच्छेद ३७० मधील बव्हंशी तरतुदी ज्या पद्धतीने सरकारने रद्द केल्या, ते दुर्दैवी आहे. काश्मिरी जनतेची संमती कशा प्रकारे मिळवायला हवी होती, यावरील गुणदोषावरील विवेचन नाही; परंतु काश्मिरी जनतेला राहण्यासाठी भारत हेच अपेक्षित स्थान असल्याची जाणीव झाल्यानंतर काळाच्या ओघात त्यांच्या संतापाची भावना दूर होईल. देशात राहण्याची इच्छा प्रबळ होणे, हीच खरी जनतेची संमती होय.याचा अर्थ असा की, फक्त काश्मिरी लोकांसाठीच नव्हे, तर सर्व भारतीयांसाठी भारत हे राहण्यासाठी इच्छित स्थान बनले पाहिजे. तेव्हा राहण्यासाठी भारत देश कसे इच्छित स्थान होईल? हा प्रश्न आहे. विविध ओळख असलेला भारत हे केंद्रीय संघराज्य आहे. काही वर्षांपूर्वी निम्मे राज्य गमावलेल्या आंध्रच्या जनतेच्या दु:खापेक्षा काश्मिरी जनतेचे दु:ख वेगळे आहे, असे काही म्हणत असतील. काहींचा असा युक्तिवाद आहे की, काश्मीर हे सीमावर्ती राज्य असून, विशिष्ट इतिहासाने ते अद्वितीय आहे; परंतु पंजाबसारख्या अन्य सीमावर्ती राज्यांतील जनतेला फाळणीच्या वेळी आपली घरेदारे गमवावी लागली. त्यांचे दु:खही हृदयविदारक आहे. नंतर पंजाबचे विभाजन करून हरियाणा आणि हिमाचल प्रदेशची निर्मिती करण्यात आली. पंजाब आणि आंध्रमधील जनतेने असा बदल करण्यास सांगितला होता का?काही उदारमतवाद्यांचे म्हणणे आहे की, सार्वमत, स्वयंनिर्णय हाच संमतीचा एकमेव योग्य मार्ग आहे. तेव्हा काश्मिरी जनतेलाही स्वयंनिर्णय या तत्त्वाच्या आधारे बाहेर पडण्याचा पर्याय द्यायला हवा. हे खरे असेल, तर आपल्यावर आंध्र प्रदेशात स्वयंनिर्णय घेण्याचे बंधन नाही का? १९४७ आधीचा विचार केल्यास ब्रिटिश गेल्यानंतर भारताचा ४० टक्के भाग बळकावणाऱ्या ५६५ संस्थानांतील जनतेसाठी या तत्त्वाचा अवलंब करायला नको होता का? काश्मीर हे त्यापैकी एक संस्थान होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते भारत ३ हजार जातींचा देश आहे. मग तेथे ३,००० सार्वमत घ्यायला हवे होते का? राजेशाहीत ब्रिटिश आणि भारतीयांकडून शासन करण्यासाठी एकही पर्याय दिला गेला नाही. ब्रिटिशांनी जाऊ नये, अशी पुरेशा संख्येने भारतीयांची इच्छा असती, तर भारत या नावाने स्वतंत्र राष्टÑ निर्माण होऊ शकले नसते. जसे की ब्रिटनने ब्रेक्झिटनंतर शोधलेला सार्वमत हा एक मार्ग होऊ शकतो. समान वंश, भाषा व सामायिक संस्कृतीवर आधारित राष्टÑ-राज्याच्या संकल्पनेचा शोध अलीकडील काळातील आहे. ही संकल्पना वेस्टफालियाच्या करारात (१६४८) जन्माला आली असली तरी १९ व्या शतकापर्यंत ती प्रसृत झाली नव्हती. १८१५ मध्ये नेपोलियनचा पाडाव होईपर्यंत युरोपात बहुतांश राजे-महाराजे होते. त्यानंतर युरोपियनांनी जाणीवपूर्वक राष्टÑ-राज्याची संकल्पना साकारली. या ठिकाणी नैसर्गिक एकत्रितपणाची भावना साहजिकच नसली तरी त्यांच्या नेत्यांनी ती तयार केली व इतिहासाच्या शालेय पाठ्यपुस्तकांमधून लोकांपर्यंत पोहोचवली. हिंदू राष्टÑवादीही आज हेच करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

धोकादायक राष्टÑवादामुळे उद्भवलेल्या पहिल्या जागतिक युद्धाच्या भीषण अनुभवानंतर जगाने १९२० मध्ये नैतिक विचारांवर आधारलेली राष्टÑीय स्वयंनिर्णयाची संकल्पना आणली. आपला भारत हे राष्टÑ असल्याचे सिद्ध करण्यावर आपला स्वातंत्र्य मिळवण्याचा दावा अवलंबून आहे, हे स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनाही जाणवले होते. ही भावना अत्यंत महत्त्वाची होती. कारण ब्रिटिश राजवटीत अनेक वसाहतवाद्यांना वाटत होते की, भारत ही एक भौगोलिक अभिव्यक्ती आहे. (हे विन्स्टन चर्चिलचे शब्द आहेत.) अशा प्रकारे महात्मा गांधी हे आमचे प्रमुख उद्गाते बनले. या सर्व प्रकरणाचा धुरळा बसल्यानंतर काश्मीर उदास मनाने भारतात मिसळून गेल्याचा मुद्दा गौण होईल. सर्वसामान्य काश्मिरींच्या डोळ्यांना भारताचे कसे स्वरूप दिसते, यावर या एकत्रीकरणाचे यश अवलंबून आहे. येथे भारतीय सरकारची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. उत्तम शासन, कायद्यासमोर सर्व समान असल्याची खात्री देणे, लोकांना त्यांचे नियम बदलण्याची संधी देणे, शिक्षण व आरोग्याच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांना भरभराट साधण्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून द्यावे लागेल. यामुळेच तेथील प्रत्येक जण भारतात राहण्यास पसंती देईल. जगात देशांचा शोध लावला जातो आणि राष्टÑवाद कपोलकल्पित आहे, हीच खरी मान्यता आहे.
(लेखक आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत