शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

भाष्य - चौटालांची तुरुंगक्रांती

By admin | Updated: May 30, 2017 00:29 IST

शिक्षणाने मानवी मनावर चांगले संस्कार घडतात. विचारांमध्ये प्रगल्भता येते. माणसाची मनोवृत्ती बदलण्याची शक्ती ज्ञानात आहे. माणसाला

शिक्षणाने मानवी मनावर चांगले संस्कार घडतात. विचारांमध्ये प्रगल्भता येते. माणसाची मनोवृत्ती बदलण्याची शक्ती ज्ञानात आहे. माणसाला चांगल्या-वाईटाची ओळख होते ती शिक्षणामुळेच. म्हणून प्रत्येकाने शिक्षण घेतलेच पाहिजे, असे अनेक विद्वानांनी सांगितले असले तरी शिक्षण न घेतल्याने काय अडते? असा विचार करणाराही एक वर्ग समाजात आहेच. त्याचे शिक्षणाशी काही देणेघेणे नाही. काही लोक असेही असतात ज्यांच्या डोक्यात फार उशिरा प्रकाश पडतो. आणि मग ते वेळकाळ न बघता पाटी-पेन्सिल हाती घेतात. शिक्षणाचे महत्त्व कुणाला आणि केव्हा पटेल हे सांगता येत नाही. आता हेच बघा ना ! हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना तुरुंगात गेल्यावरच शिक्षणाचे महत्त्व कळले. सहस्रचंद्रदर्शनानंतर त्यांनी बारावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाले. तेसुद्धा प्रथम श्रेणीत. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या चौटालांनी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओपन लर्निंगमधून बारावीचे शिक्षण घेतले. खास बात म्हणजे त्यांना ज्या घोटाळ्यात दहा वर्षांची शिक्षा झाली तोसुद्धा शिक्षण विभागाशी संबंधितच आहे. शिक्षक भरती प्रकरणात ते दोषी सिद्ध झाले होते. तुरुंगात गेल्यापासून चौटाला यांची शिक्षणाची ओढ फारच वाढली असल्याचे समजते. त्यामुळेच कारागृहातील हे दिवस सार्थकी लावण्याचे त्यांनी ठरविले आहे, असे म्हणतात. तुरुंगातील ग्रंथालयात ते नियमित जातात. पुस्तके वाचतात आणि तीही जगातील महान नेत्यांच्या जीवनावर आधारित. वयाच्या मावळतीला असताना शिक्षणाचे महत्त्व एवढ्या तीव्रतेने जाणवणे ही शिक्षण क्रांतीच म्हणायची. विशेष म्हणजे ते बारावीपर्यंत शिक्षण घेऊनच थांबणार नसून पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याचाही त्यांचा मानस आहे. अर्थात यामागे त्यांचा राजकीय हेतू असल्याचे नाकारता येत नाही. त्याचे कारण असे की, आता हरियाणा सरकारने पंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराच्या शिक्षणाची पात्रता निश्चित केली आहे आणि पुढील काळात विधानसभेसाठीही उमेदवार पदवीधर असावा, असा नियम करण्याचा तेथील सरकारचा विचार आहे. असे झाल्यास आपल्यावर निवडणुकीच्या राजकारणापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये यासाठीची ही तजवीज असू शकते. ते काहीही असो ! उशिरा का होईना हे शहाणपण त्यांना आले हे महत्त्वाचे. एरवी १९८९ साली त्यांचे वडील चौधरी देवीलाल उपपंतप्रधान असतानाही त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळले नव्हते. ते कळले असते तर कदाचित शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी तरी त्यांनी शिक्षक भरती घोटाळा केला नसता.