शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
4
ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
5
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
6
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
8
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
9
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
10
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
11
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
12
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
13
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
14
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
15
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
16
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
17
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
18
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
19
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
20
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

कोडगी व्यवस्था!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:59 IST

शेतकरी आत्महत्या हा विषय तसा तर गत तीन दशकांपासून विदर्भाच्या पाचवीलाच पूजलेला आहे; पण गत बुधवारी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सोयजना येथील ज्ञानेश्वर मिसाळ या शेतक-याने केलेली आत्महत्या, हा आमच्या एकंदरच व्यवस्थेच्या कोडगेपणाचा, निर्ढावलेपणाचा उत्तम नमुना म्हणता येईल.

शेतकरी आत्महत्या हा विषय तसा तर गत तीन दशकांपासून विदर्भाच्या पाचवीलाच पूजलेला आहे; पण गत बुधवारी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सोयजना येथील ज्ञानेश्वर मिसाळ या शेतक-याने केलेली आत्महत्या, हा आमच्या एकंदरच व्यवस्थेच्या कोडगेपणाचा, निर्ढावलेपणाचा उत्तम नमुना म्हणता येईल. ज्ञानेश्वर मिसाळ हे मानोरा तालुक्यात प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखल्या जात असत; मात्र गत काही वर्षात निसर्गाने लागोपाठ दिलेल्या तडाख्यांमुळे ते हतबल झाले होते. गेले वर्ष वाईट गेले, यावर्षी तरी निसर्ग साथ देईल, या आशेपोटी ते शेतीत खर्च करीत गेले आणि कर्जाचा डोंगर वाढतच गेला. बँकांव्यतिरिक्त खासगी वित्त कंपन्या व सावकारांचेही कर्ज झाले. त्याची परतफेड कशी करायची ही विवंचना त्यांना खात होती. आता मायबाप सरकारच काही तरी तोडगा काढेल, ही आशा मनाशी बाळगून त्यांनी मुंबई गाठली. तिथे मंत्रालयात समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या भेटी घेतल्या. त्यांना सगळी आपबिती कथन केली आणि आपल्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. दुर्दैवाने त्यानंतरही काहीही हालचाल न झाल्याने, अखेर मिसाळ यांनी आत्महत्या केली. मिसाळ यांच्या आत्महत्येने आपल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आत्महत्येचा इशारा देणाºया प्रत्येक व्यक्तीच्या समस्यांचे समाधान सरकार करू शकत नाही, हे अगदी मान्य; मात्र किमान त्या व्यक्तीला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी तर प्रयत्न केल्या जाऊ शकतात ना? मिसाळ यांच्यासोबत मंत्रीद्वयांना भेटण्यासाठी गेलेले आत्माराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, असा कोणताही प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. याला व्यवस्थेचा कोडगेपणा व निर्ढावलेपणा नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? सरकार या व्यवस्थेकडून सर्वप्रथम अपेक्षा असते ती संवेदनशीलतेची! राज्यकर्त्यांच्याच संवेदना बोथट झाल्या, तर जनतेने अपेक्षा तरी कुणाकडून करायची? ज्यांचे नाव घेऊन हे सरकार सत्तेत आले, कृषी कर्जमाफी योजनेला ज्यांचे नाव देण्यात आले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किंचितसा तरी आदर्श या बाबतीत सत्ताधाºयांनी स्वत:समोर ठेवायला नको? कुठे शेतकºयाला अजिबात त्रास होता कामा नये, असे स्वत:च्या सैन्याला बजावणारा तो थोर राजा अन् कुठे अडचणीत सापडल्याने मदतीची आस बाळगून आलेल्या शेतकºयाला साधा दिलासाही न देऊ शकणारे आजचे राज्यकर्ते? राज्यकर्त्यांनी हा कोडगेपणा सोडला नाही, तर एक दिवस जनता या व्यवस्थेचेच विसर्जन करून टाकेल!

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र