शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

कोडगी व्यवस्था!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:59 IST

शेतकरी आत्महत्या हा विषय तसा तर गत तीन दशकांपासून विदर्भाच्या पाचवीलाच पूजलेला आहे; पण गत बुधवारी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सोयजना येथील ज्ञानेश्वर मिसाळ या शेतक-याने केलेली आत्महत्या, हा आमच्या एकंदरच व्यवस्थेच्या कोडगेपणाचा, निर्ढावलेपणाचा उत्तम नमुना म्हणता येईल.

शेतकरी आत्महत्या हा विषय तसा तर गत तीन दशकांपासून विदर्भाच्या पाचवीलाच पूजलेला आहे; पण गत बुधवारी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सोयजना येथील ज्ञानेश्वर मिसाळ या शेतक-याने केलेली आत्महत्या, हा आमच्या एकंदरच व्यवस्थेच्या कोडगेपणाचा, निर्ढावलेपणाचा उत्तम नमुना म्हणता येईल. ज्ञानेश्वर मिसाळ हे मानोरा तालुक्यात प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखल्या जात असत; मात्र गत काही वर्षात निसर्गाने लागोपाठ दिलेल्या तडाख्यांमुळे ते हतबल झाले होते. गेले वर्ष वाईट गेले, यावर्षी तरी निसर्ग साथ देईल, या आशेपोटी ते शेतीत खर्च करीत गेले आणि कर्जाचा डोंगर वाढतच गेला. बँकांव्यतिरिक्त खासगी वित्त कंपन्या व सावकारांचेही कर्ज झाले. त्याची परतफेड कशी करायची ही विवंचना त्यांना खात होती. आता मायबाप सरकारच काही तरी तोडगा काढेल, ही आशा मनाशी बाळगून त्यांनी मुंबई गाठली. तिथे मंत्रालयात समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या भेटी घेतल्या. त्यांना सगळी आपबिती कथन केली आणि आपल्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. दुर्दैवाने त्यानंतरही काहीही हालचाल न झाल्याने, अखेर मिसाळ यांनी आत्महत्या केली. मिसाळ यांच्या आत्महत्येने आपल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आत्महत्येचा इशारा देणाºया प्रत्येक व्यक्तीच्या समस्यांचे समाधान सरकार करू शकत नाही, हे अगदी मान्य; मात्र किमान त्या व्यक्तीला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी तर प्रयत्न केल्या जाऊ शकतात ना? मिसाळ यांच्यासोबत मंत्रीद्वयांना भेटण्यासाठी गेलेले आत्माराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, असा कोणताही प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. याला व्यवस्थेचा कोडगेपणा व निर्ढावलेपणा नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? सरकार या व्यवस्थेकडून सर्वप्रथम अपेक्षा असते ती संवेदनशीलतेची! राज्यकर्त्यांच्याच संवेदना बोथट झाल्या, तर जनतेने अपेक्षा तरी कुणाकडून करायची? ज्यांचे नाव घेऊन हे सरकार सत्तेत आले, कृषी कर्जमाफी योजनेला ज्यांचे नाव देण्यात आले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किंचितसा तरी आदर्श या बाबतीत सत्ताधाºयांनी स्वत:समोर ठेवायला नको? कुठे शेतकºयाला अजिबात त्रास होता कामा नये, असे स्वत:च्या सैन्याला बजावणारा तो थोर राजा अन् कुठे अडचणीत सापडल्याने मदतीची आस बाळगून आलेल्या शेतकºयाला साधा दिलासाही न देऊ शकणारे आजचे राज्यकर्ते? राज्यकर्त्यांनी हा कोडगेपणा सोडला नाही, तर एक दिवस जनता या व्यवस्थेचेच विसर्जन करून टाकेल!

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र