शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

राज्याची उपराजधानी म्हणविणा-या शहरातील स्वच्छतेचा ‘कचरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:10 IST

आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी नागपूरला देशाची राजधानी करण्याचा सल्ला दिला आहे.

आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी नागपूरला देशाची राजधानी करण्याचा सल्ला दिला आहे. राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा सध्या सा-या देशात गाजतो आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री श्रींनी हे मत मांडले असणार. पण राज्याची उपराजधानी म्हणविणा-या या शहरातील स्वच्छतेचा जो कचरा झाला आहे त्याचे काय? देशातील हिरव्या गार शहरांमध्ये नागपूरचा समावेश होतो, हे अगदी खरे आहे. शिवाय हे देशातील मध्यवर्ती शहर असल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे. भविष्यात स्मार्ट सिटी म्हणून मिरविण्याचेही स्वप्न स्थानिक प्रशासन बघत आहे. परंतु येथील कचºयांचे वाढते ढीग आणि त्याच्या व्यवस्थापनात संबंधित यंत्रणेला येत असलेले अपयश हा या स्वप्नाच्या पूर्ततेतील सर्वात मोठा रोडा बनतो आहे. नागपूर महानगरपालिकेने कनक रिसोर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला कचरा संकलनाचे पाच वर्षांचे कंत्राट दिले आहे. यासाठी १३५ कोटी रुपये मोजले जाणार आहेत. परंतु ही कंपनी कचरा संकलनापेक्षा अंतर्गत गैरव्यवहारांमुळेच अधिक गाजते आहे. तर दुसरीकडे अलीकडच्या काळात शहरातील कचरा कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. ठिकठिकाणी साचलेले कचºयाचे ढीग याची साक्ष देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हाती घेतल्यानंतर इतर शहरांप्रमाणेच नागपुरातही ही चळवळ उभी राहील, असे वाटले होते. पण असे काही घडताना दिसत नाही. सार्वजनिक स्वच्छतेला अजूनही आम्ही प्राधान्य दिलेले नाही. यावर्षी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या सर्वेक्षणात स्वच्छतेच्या क्रमवारीत नागपूर २० वरून एकदम १३७ व्या स्थानावर घसरले आहे आणि अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढील वर्षी ते आणखी मागे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. अर्थात स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रशासनावर टाकूनही चालणार नाही. नागरिकांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणले तरच शहर स्वच्छ राहू शकते. आम्ही वाट्टेल तेव्हा वाट्टेल तिथे कचरा टाकायचा आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे काम प्रशासनाचे आहे असे मानून हात वर करायचे, ही मानसिकता बदलावी लागेल. स्वच्छ भारत अभियान असो वा स्वच्छ शहर त्यातील लोकसहभाग हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी आहे हे आम्हाला कळते पण वळत नाही. डेंग्यू, स्वाईन फ्लूसारख्या आजाराने यापूर्वी एवढे थैमान कधी घातले नव्हते, हे लक्षात घेतले पाहिजे. एकीकडे नागपूर स्मार्ट आणि ग्लोबल बनू पाहात आहेत आणि दुसरीकडे अस्वच्छतेवरच आम्ही मात करू शकलेलो नाही, हे दुर्दैवच म्हणायचे.

टॅग्स :nagpurनागपूर