शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

राज्याची उपराजधानी म्हणविणा-या शहरातील स्वच्छतेचा ‘कचरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:10 IST

आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी नागपूरला देशाची राजधानी करण्याचा सल्ला दिला आहे.

आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी नागपूरला देशाची राजधानी करण्याचा सल्ला दिला आहे. राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा सध्या सा-या देशात गाजतो आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री श्रींनी हे मत मांडले असणार. पण राज्याची उपराजधानी म्हणविणा-या या शहरातील स्वच्छतेचा जो कचरा झाला आहे त्याचे काय? देशातील हिरव्या गार शहरांमध्ये नागपूरचा समावेश होतो, हे अगदी खरे आहे. शिवाय हे देशातील मध्यवर्ती शहर असल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे. भविष्यात स्मार्ट सिटी म्हणून मिरविण्याचेही स्वप्न स्थानिक प्रशासन बघत आहे. परंतु येथील कचºयांचे वाढते ढीग आणि त्याच्या व्यवस्थापनात संबंधित यंत्रणेला येत असलेले अपयश हा या स्वप्नाच्या पूर्ततेतील सर्वात मोठा रोडा बनतो आहे. नागपूर महानगरपालिकेने कनक रिसोर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला कचरा संकलनाचे पाच वर्षांचे कंत्राट दिले आहे. यासाठी १३५ कोटी रुपये मोजले जाणार आहेत. परंतु ही कंपनी कचरा संकलनापेक्षा अंतर्गत गैरव्यवहारांमुळेच अधिक गाजते आहे. तर दुसरीकडे अलीकडच्या काळात शहरातील कचरा कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. ठिकठिकाणी साचलेले कचºयाचे ढीग याची साक्ष देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हाती घेतल्यानंतर इतर शहरांप्रमाणेच नागपुरातही ही चळवळ उभी राहील, असे वाटले होते. पण असे काही घडताना दिसत नाही. सार्वजनिक स्वच्छतेला अजूनही आम्ही प्राधान्य दिलेले नाही. यावर्षी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या सर्वेक्षणात स्वच्छतेच्या क्रमवारीत नागपूर २० वरून एकदम १३७ व्या स्थानावर घसरले आहे आणि अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढील वर्षी ते आणखी मागे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. अर्थात स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रशासनावर टाकूनही चालणार नाही. नागरिकांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणले तरच शहर स्वच्छ राहू शकते. आम्ही वाट्टेल तेव्हा वाट्टेल तिथे कचरा टाकायचा आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे काम प्रशासनाचे आहे असे मानून हात वर करायचे, ही मानसिकता बदलावी लागेल. स्वच्छ भारत अभियान असो वा स्वच्छ शहर त्यातील लोकसहभाग हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी आहे हे आम्हाला कळते पण वळत नाही. डेंग्यू, स्वाईन फ्लूसारख्या आजाराने यापूर्वी एवढे थैमान कधी घातले नव्हते, हे लक्षात घेतले पाहिजे. एकीकडे नागपूर स्मार्ट आणि ग्लोबल बनू पाहात आहेत आणि दुसरीकडे अस्वच्छतेवरच आम्ही मात करू शकलेलो नाही, हे दुर्दैवच म्हणायचे.

टॅग्स :nagpurनागपूर