शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

राज्याची उपराजधानी म्हणविणा-या शहरातील स्वच्छतेचा ‘कचरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:10 IST

आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी नागपूरला देशाची राजधानी करण्याचा सल्ला दिला आहे.

आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी नागपूरला देशाची राजधानी करण्याचा सल्ला दिला आहे. राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा सध्या सा-या देशात गाजतो आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री श्रींनी हे मत मांडले असणार. पण राज्याची उपराजधानी म्हणविणा-या या शहरातील स्वच्छतेचा जो कचरा झाला आहे त्याचे काय? देशातील हिरव्या गार शहरांमध्ये नागपूरचा समावेश होतो, हे अगदी खरे आहे. शिवाय हे देशातील मध्यवर्ती शहर असल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे. भविष्यात स्मार्ट सिटी म्हणून मिरविण्याचेही स्वप्न स्थानिक प्रशासन बघत आहे. परंतु येथील कचºयांचे वाढते ढीग आणि त्याच्या व्यवस्थापनात संबंधित यंत्रणेला येत असलेले अपयश हा या स्वप्नाच्या पूर्ततेतील सर्वात मोठा रोडा बनतो आहे. नागपूर महानगरपालिकेने कनक रिसोर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला कचरा संकलनाचे पाच वर्षांचे कंत्राट दिले आहे. यासाठी १३५ कोटी रुपये मोजले जाणार आहेत. परंतु ही कंपनी कचरा संकलनापेक्षा अंतर्गत गैरव्यवहारांमुळेच अधिक गाजते आहे. तर दुसरीकडे अलीकडच्या काळात शहरातील कचरा कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. ठिकठिकाणी साचलेले कचºयाचे ढीग याची साक्ष देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हाती घेतल्यानंतर इतर शहरांप्रमाणेच नागपुरातही ही चळवळ उभी राहील, असे वाटले होते. पण असे काही घडताना दिसत नाही. सार्वजनिक स्वच्छतेला अजूनही आम्ही प्राधान्य दिलेले नाही. यावर्षी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या सर्वेक्षणात स्वच्छतेच्या क्रमवारीत नागपूर २० वरून एकदम १३७ व्या स्थानावर घसरले आहे आणि अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढील वर्षी ते आणखी मागे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. अर्थात स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रशासनावर टाकूनही चालणार नाही. नागरिकांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणले तरच शहर स्वच्छ राहू शकते. आम्ही वाट्टेल तेव्हा वाट्टेल तिथे कचरा टाकायचा आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे काम प्रशासनाचे आहे असे मानून हात वर करायचे, ही मानसिकता बदलावी लागेल. स्वच्छ भारत अभियान असो वा स्वच्छ शहर त्यातील लोकसहभाग हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी आहे हे आम्हाला कळते पण वळत नाही. डेंग्यू, स्वाईन फ्लूसारख्या आजाराने यापूर्वी एवढे थैमान कधी घातले नव्हते, हे लक्षात घेतले पाहिजे. एकीकडे नागपूर स्मार्ट आणि ग्लोबल बनू पाहात आहेत आणि दुसरीकडे अस्वच्छतेवरच आम्ही मात करू शकलेलो नाही, हे दुर्दैवच म्हणायचे.

टॅग्स :nagpurनागपूर