शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

‘अभिजात’ मराठीसाठी पंतप्रधान कार्यालय कृतिशील व्हावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 05:34 IST

नव्या वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी अभिजात दर्जा मिळाल्याची आनंदाची बातमी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आता पंतप्रधान कार्यालयाने कृती करून गतिमान प्रशासनाचे उदाहरण घालून द्यावे, ही माफक अपेक्षा आहे.

- विजय बाविस्करनव्या वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी अभिजात दर्जा मिळाल्याची आनंदाची बातमी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आता पंतप्रधान कार्यालयाने कृती करून गतिमान प्रशासनाचे उदाहरण घालून द्यावे, ही माफक अपेक्षा आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठीची कृतिशील कार्यवाही विचाराधीन आहे, असे पत्र पंतप्रधान कार्यालयातील सांस्कृतिक मंत्रालय सचिवांचे विभागीय अधिकारी कुमार शैलेंद्र यांनी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना पाठविले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रा. रंगनाथ पठारे समितीने सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात मसापने पुढाकार घेतला. त्यासाठी लोकचळवळ उभी केली. लेखकांची बैठक, मसापचे सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी शाहूपुरी शाखेमार्फत पंतप्रधान कार्यालयाला पाठविलेली एक लाखाहून अधिक पत्रे, मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाबाबत भूमिका घ्यावी, यासाठी मसापच्या शिष्टमंडळाने घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे धूळखात पडलेल्या अभिजात भाषेसाठीच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू झाली. सहा महिन्यांपूर्वी मसापने पाठविलेल्या पत्राला उत्तर देताना मद्रास उच्च न्यायालयातील याचिका निकाली निघाल्याने सांस्कृतिक कार्यालयाला सुधारित कॅबिनेट नोट तयार करण्याचा आदेश देण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. पण, त्यानंतर कोणतीच ठोस कार्यवाही न झाल्यामुळे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पुन्हा ८ डिसेंबर रोजी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करून, नवीन वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे ठोस आश्वासन द्यावे; अन्यथा २६ जानेवारी रोजी दिल्लीत मराठीप्रेमींसमवेत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसे पत्रही पंतप्रधान कार्यालयाला पाठविले होते. या आंदोलनात छत्रपती घराण्याचे वारसदार या नात्याने सहभागी होण्याचा निर्णय साताºयाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला होता. परिषदेच्या पत्राला उत्तर देताना अभिजात दर्जाच्या कृतिशील कार्यवाहीसाठी केंद्र सरकार विचाराधीन असल्याचे कळविण्यात आले आहे. पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे, बडोदा येथे होणाºया ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा सत्कार डॉ. पी.डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभात प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या भाषणात ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीच्या प्रयत्नांत महाराष्ट्रातील राजकीय इच्छाशक्ती अपयशी ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडोद्यातून निवडणूक लढविताना आपल्या स्वाक्षरीने उमेदवारी अर्ज भरला होता. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या पत्रावर पंतप्रधानांची स्वाक्षरी आपण घ्यावी,’ असे भावनिक आवाहन केले. त्याला राजमातांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ‘या कामासाठी निश्चित पुढाकार घेईन,’ असे आश्वासन दिले. त्यामुळे मराठी भाषकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. नव्या वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी अभिजात दर्जा मिळाल्याची आनंदवार्ता मिळणार का, याकडे मराठी जगताचे लक्ष लागले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आता पंतप्रधान कार्यालयाने कृती करून गतिमान प्रशासनाचे आदर्श उदाहरण घालून द्यावे. बडोद्याच्या संमेलनात पंतप्रधानांना निमंत्रित करण्याचा संयोजकांचा मानस आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा झाल्यास हे संमेलन ऐतिहासिक ठरेल. 

टॅग्स :marathiमराठी