शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शहरे कचऱ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 03:59 IST

सोन्याची अंडी देणा-या कोंबडीला कसे जपायचे आणि खुडुक झालेल्या कोंबडीचे काय करायचे, हे आमच्या राजकारण्यांना चांगलेच ठाऊक. अगदी हाच न्याय श्रीमंत-गरिबांना आणि शहरी-ग्रामीण भागांना कसा लावायचा यातही ते पारंगत.

सोन्याची अंडी देणा-या कोंबडीला कसे जपायचे आणि खुडुक झालेल्या कोंबडीचे काय करायचे, हे आमच्या राजकारण्यांना चांगलेच ठाऊक. अगदी हाच न्याय श्रीमंत-गरिबांना आणि शहरी-ग्रामीण भागांना कसा लावायचा यातही ते पारंगत. म्हणून शहरवासीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामीण भागावर अन्याय करण्याचे तंत्र या राजकारण्यांनी अगदी सुरुवातीपासूनच अंगिकारले. प्रशासन राजकारण्यांच्या दावणीला बंधले जाते हा इतिहास नवा नाही. कुठलेही सरकार आले तर तो बदलत नाही. त्यामुळे प्रश्न पाण्याचा असो वा कचºयाचा शहरातील लोकांना खूष करण्यासाठी गावकºयांवर अन्याय करायचा हे ठरलेलेच असते. जेव्हा या गावकºयांच्या सहनशीलतेचा अंत होतो तेव्हा त्याचा ‘औरंगाबाद’ होतो. जवळपास ३१ वर्षे या नारेगावकरांनी अख्ख्या औरंगाबादकरांचा कचरा सहन केला. प्रारंभी म्हणजे १९८६ साली नारेगाव परिसरात अगदी विरळ वस्ती होती. ती नसल्यातच जमा होती. पुढे इतर महानगरांचे होते तेच औरंगाबादचेही झाले. हळूहळू शहर अगदी नारेगावला जाऊन खेटले. त्यामुळे कचरा डेपोला विरोध होऊ लागला. २००३ साली नारेगावकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. राजकारण्यांना आणि ओघानेच प्रशासनाला हा प्रश्न कधी सोडवावासा वाटलाच नाही. केवळ वेळ मारून नेण्याचे धोरण अवलंबिले गेले. औरंगाबादच्या कचरा व्यवस्थापनावर वर्षाला महापालिका तब्बल ६० कोटी रुपये खर्च करते. त्या त्या वॉर्डामध्येच कचºयावर प्रक्रिया झाली तर या खर्चात मोठी बचत होेऊ शकते. मात्र, पालिकेच्या बचतीपेक्षा आपले खिशे भरण्याची अधिक काळजी असलेल्या राजकारण्यांनी कचºयाचा प्रश्न गांभीर्याने घेतलाच नाही. हा प्रश्न एकट्या औरंगाबादचा नाही. प्रत्येक महानगराचे हेच दुखणे आहे. प्रत्येक ठिकाणी शहरापेक्षा स्वहित महत्त्वाचे असलेल्यांचाच भरणा आहे. शहराशेजारचे कुठले तरी गाव गाठायचे आणि तिथे कचरा डम्प करायचा, हेच सर्वत्र केले जात आहे. किती दिवस सहन करणार ते? औरंगाबादनंतर आता अहमदनगरमध्येही विरोध होऊ लागला आहे. आज ना उद्या प्रत्येक शहरात हे घडणारच आहे. मुंबईशेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी या प्रमुख शहरांत तरी काय होते? एकट्या ठाण्यात दररोज ९५० मेट्रिक टन कचरा निघतो. कुठलीही प्रक्रिया न करता तो खर्डी-दिवा येथे खाडीकिनारी टाकला जातो. आज तिथे कुणी राहत नाही म्हणून बरे चालले आहे. आज ना उद्या तिथेही विरोध होणारच आहे. या कचºयाचा माणसांना त्रास होतो. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोच. संपूर्ण पर्यावरणाची वाट लागते, याचा तर विचार कुणीच करत नाही. मूळ प्रश्न वेगळाच आहे आणि तो सोडविण्याची मानसिकता कुणाचीच दिसत नाही. त्या त्या वॉर्डातील कचºयावर तिथेच प्रक्रिया झाली तर प्रश्न कायमचा सुटणार आहे. नागरी घनकचरा नियम २०० नुसार कचºयावर प्रक्रिया करण्याचे बंधन राज्यातील महापालिकांवर घालण्यात आले आहे. ते करतो कोण? पुण्याचे ‘रोल मॉडेल’ देशभरात गाजले. आज तिथलीही स्थिती वाईटच आहे. नाशिकसारख्या काही स्मार्ट शहरांचा अपवाद सोडला तर सर्वत्र आनंदीआनंद आहे. घंटागाड्यांना जीपीएस लावून तिथे ओला-सुका कचरा उचलला जातो आणि त्यातील जवळपास ७० टक्के कचºयाची विल्हेवाट लावली जाते. नवनवीन तंत्रज्ञानातून हे प्रमाण नाशिककरांनी १०० टक्क्यांवर नेण्याची आणि हाच मार्ग इतर शहरांनी अवलंबण्याची गरज आहे. मात्र, कचरा वाहतुकीत सोने शोधणाºया राजकारण्यांना आणि ओघानेच प्रशासनालादेखील सोन्याची अंडी देणारी ही कोंबडी जीवे मारून कसे चालेल? त्यांची सोन्याची भूक कशी भागेल?

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न