शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

शहरे कचऱ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 03:59 IST

सोन्याची अंडी देणा-या कोंबडीला कसे जपायचे आणि खुडुक झालेल्या कोंबडीचे काय करायचे, हे आमच्या राजकारण्यांना चांगलेच ठाऊक. अगदी हाच न्याय श्रीमंत-गरिबांना आणि शहरी-ग्रामीण भागांना कसा लावायचा यातही ते पारंगत.

सोन्याची अंडी देणा-या कोंबडीला कसे जपायचे आणि खुडुक झालेल्या कोंबडीचे काय करायचे, हे आमच्या राजकारण्यांना चांगलेच ठाऊक. अगदी हाच न्याय श्रीमंत-गरिबांना आणि शहरी-ग्रामीण भागांना कसा लावायचा यातही ते पारंगत. म्हणून शहरवासीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामीण भागावर अन्याय करण्याचे तंत्र या राजकारण्यांनी अगदी सुरुवातीपासूनच अंगिकारले. प्रशासन राजकारण्यांच्या दावणीला बंधले जाते हा इतिहास नवा नाही. कुठलेही सरकार आले तर तो बदलत नाही. त्यामुळे प्रश्न पाण्याचा असो वा कचºयाचा शहरातील लोकांना खूष करण्यासाठी गावकºयांवर अन्याय करायचा हे ठरलेलेच असते. जेव्हा या गावकºयांच्या सहनशीलतेचा अंत होतो तेव्हा त्याचा ‘औरंगाबाद’ होतो. जवळपास ३१ वर्षे या नारेगावकरांनी अख्ख्या औरंगाबादकरांचा कचरा सहन केला. प्रारंभी म्हणजे १९८६ साली नारेगाव परिसरात अगदी विरळ वस्ती होती. ती नसल्यातच जमा होती. पुढे इतर महानगरांचे होते तेच औरंगाबादचेही झाले. हळूहळू शहर अगदी नारेगावला जाऊन खेटले. त्यामुळे कचरा डेपोला विरोध होऊ लागला. २००३ साली नारेगावकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. राजकारण्यांना आणि ओघानेच प्रशासनाला हा प्रश्न कधी सोडवावासा वाटलाच नाही. केवळ वेळ मारून नेण्याचे धोरण अवलंबिले गेले. औरंगाबादच्या कचरा व्यवस्थापनावर वर्षाला महापालिका तब्बल ६० कोटी रुपये खर्च करते. त्या त्या वॉर्डामध्येच कचºयावर प्रक्रिया झाली तर या खर्चात मोठी बचत होेऊ शकते. मात्र, पालिकेच्या बचतीपेक्षा आपले खिशे भरण्याची अधिक काळजी असलेल्या राजकारण्यांनी कचºयाचा प्रश्न गांभीर्याने घेतलाच नाही. हा प्रश्न एकट्या औरंगाबादचा नाही. प्रत्येक महानगराचे हेच दुखणे आहे. प्रत्येक ठिकाणी शहरापेक्षा स्वहित महत्त्वाचे असलेल्यांचाच भरणा आहे. शहराशेजारचे कुठले तरी गाव गाठायचे आणि तिथे कचरा डम्प करायचा, हेच सर्वत्र केले जात आहे. किती दिवस सहन करणार ते? औरंगाबादनंतर आता अहमदनगरमध्येही विरोध होऊ लागला आहे. आज ना उद्या प्रत्येक शहरात हे घडणारच आहे. मुंबईशेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी या प्रमुख शहरांत तरी काय होते? एकट्या ठाण्यात दररोज ९५० मेट्रिक टन कचरा निघतो. कुठलीही प्रक्रिया न करता तो खर्डी-दिवा येथे खाडीकिनारी टाकला जातो. आज तिथे कुणी राहत नाही म्हणून बरे चालले आहे. आज ना उद्या तिथेही विरोध होणारच आहे. या कचºयाचा माणसांना त्रास होतो. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोच. संपूर्ण पर्यावरणाची वाट लागते, याचा तर विचार कुणीच करत नाही. मूळ प्रश्न वेगळाच आहे आणि तो सोडविण्याची मानसिकता कुणाचीच दिसत नाही. त्या त्या वॉर्डातील कचºयावर तिथेच प्रक्रिया झाली तर प्रश्न कायमचा सुटणार आहे. नागरी घनकचरा नियम २०० नुसार कचºयावर प्रक्रिया करण्याचे बंधन राज्यातील महापालिकांवर घालण्यात आले आहे. ते करतो कोण? पुण्याचे ‘रोल मॉडेल’ देशभरात गाजले. आज तिथलीही स्थिती वाईटच आहे. नाशिकसारख्या काही स्मार्ट शहरांचा अपवाद सोडला तर सर्वत्र आनंदीआनंद आहे. घंटागाड्यांना जीपीएस लावून तिथे ओला-सुका कचरा उचलला जातो आणि त्यातील जवळपास ७० टक्के कचºयाची विल्हेवाट लावली जाते. नवनवीन तंत्रज्ञानातून हे प्रमाण नाशिककरांनी १०० टक्क्यांवर नेण्याची आणि हाच मार्ग इतर शहरांनी अवलंबण्याची गरज आहे. मात्र, कचरा वाहतुकीत सोने शोधणाºया राजकारण्यांना आणि ओघानेच प्रशासनालादेखील सोन्याची अंडी देणारी ही कोंबडी जीवे मारून कसे चालेल? त्यांची सोन्याची भूक कशी भागेल?

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न