शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

सिनेमावाल्यांचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:53 IST

तामिळनाडूच्या राजकारणात रजनीकांत हा नवा तारा आता उगवला आहे. सिनेमावाल्यांची सत्ता त्या राज्याच्या तशीही चांगली अंगवळणी पडली आहे. १९६७ पासून द्रमुक व अण्णाद्रमुक या दोन पक्षांनी त्या क्षेत्राचे राजकारण केले आणि त्या दोहोंचेही नेते सिनेनट, दिग्दर्शक, चित्रपट निर्माते व अभिनेत्री अशा सिनेवर्गातूनच आले आहेत.

तामिळनाडूच्या राजकारणात रजनीकांत हा नवा तारा आता उगवला आहे. सिनेमावाल्यांची सत्ता त्या राज्याच्या तशीही चांगली अंगवळणी पडली आहे. १९६७ पासून द्रमुक व अण्णाद्रमुक या दोन पक्षांनी त्या क्षेत्राचे राजकारण केले आणि त्या दोहोंचेही नेते सिनेनट, दिग्दर्शक, चित्रपट निर्माते व अभिनेत्री अशा सिनेवर्गातूनच आले आहेत. करुणानिधी सिनेमातले आणि जयललिताही सिनेमातल्याच. आता करुणानिधींनी राजकारण संन्यास घेण्याची घोषणा केली तर जयललिता देवाघरीच गेल्या. करुणानिधींचा पक्ष गटबाजी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बेजार तर जयललितांच्या उत्तराधिकारी त्याच आरोपांतून तुरुंगवासात. ही स्थिती रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाला अनुकूल आहे आणि तेही तिची गेली २२ वर्षे वाट पाहात होते. त्यांच्याजवळ पक्षसंघटना नाही. ती द्रमुकजवळ आहे. जयललितांचा अण्णाद्रमुक त्याच्यावरील आरोप आणि दिनकरन याचा आत्ताचा आर.के. पुरम मतदार संघातील विजय यामुळे अडचणीत आहे. यावेळी ‘राजकारणातील अध्यात्माच्या’ पातळीवर येण्याची आणि त्यातील भ्रष्टाचार नाहिसा करण्याची रजनीकांत यांची घोषणा तामीळ लोकांना आकर्षक वाटणारी आहे. त्यांची सिनेक्षेत्रातील लोकप्रियता नेत्यांनाही हेवा वाटावा एवढी मोठी आहे आणि त्यांनी राजकारणात यावे याची वाट पाहणारा मोठा वर्गही त्या राज्यात आहे. शिवाय जेथे लाटेचे राजकारण चालते तेथे संघटना फारशा कामी येत नाहीत. लाटेचे राजकारण रजनीकांत यांना साथ देईल अशी आशा त्यांच्यासकट तेथील अनेकांना वाटत आहे. तामिळनाडूत भाजपाला मित्र नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या अनुयायांनी रजनीकांतच्या राजकारण प्रवेशाचे जोरात स्वागत केले आहे. मात्र त्यांच्या चाहत्यांचा त्यांना असलेला सल्ला त्यांनी कोणताही पक्ष एवढ्यात जवळ करू नये असा आहे. निवडणुका पार पडल्यानंतर पक्षोपपक्षांचे बळ पाहून रजनीकांत यांनी त्यांची पुढची पावले टाकावी असे या चाहत्यांचे मत आहे. मात्र तामिळनाडूत २०२१ मध्ये निवडणुका व्हायच्या असून त्यांना चार वर्षाचा अवधी आहे. एवढा काळ आपली लाट उंचावत ठेवणे ही राजकीय किमया आहे. शिवाय या काळात काहीही घडू शकते याची साºयांना जाणीव आहे. सध्याचे तामिळनाडूचे पनिरसेल्वम सरकार दुभंगले आहे आणि ते भ्रष्टाचारात बुडाले असल्याचा आरोप आहे. त्यांचे सरकार कोणत्या ना कोणत्या मार्गाने उलथृून लावण्याचा प्रयत्न द्रमुकचे स्टॅलिन, जयललिताचे दिनकरन या काळात करतील. त्यांना दिल्लीतील राजकारणाची साथ मिळण्याची शक्यताही मोठी आहे. हे सरकार उलथविता आले तर ते दिल्लीकरांना हवेही आहे. तसे झाले तर निवडणुका लवकर होतील व रजनीकांत यांना त्यांचे नशीब आजमवण्याची संधी लवकर मिळेल. त्यांची लोकप्रियता वादातीत आहे. त्यांच्या सिनेमांची तिकिटे एकेक महिना अगोदर संपली असतात. जेथे जातील तेथे त्यांच्याभोवती हजारो लोक जमाही होतात. लोकप्रियतेचे हे राजकारण टिकविणे आणि येणाºया निवडणुकांची वाट पाहणे हे आता त्यांच्यापुढचे आव्हान आहे. दरम्यान विधानसभेच्या सर्व म्हणजे २२४ ही जागा लढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तामीळ राजकारणात यापुढच्या काळात रंगणारा सिनेमा पाहण्याजोगा असेल. जाता जाता एक गोष्ट येथे उल्लेखण्याजोगी, दक्षिणेतील नटांना जमलेले हे ेलोककारण उत्तरेच्या कोणत्याही नटाला कां जमले नसावे. त्यांनी प्रचारकांचीच कामे आजवर केली. नेतृत्व करणे त्यांच्यातल्या कुणाला झेपले नाही आणि दक्षिणेतील नट व नट्या जनतेच्या अधिक जवळ राहत असाव्या काय? त्यांचे सिनेमे लोकजीवनाचा अधिक चांगला व योग्य वापर आपल्या चित्रपटात करीत असतील काय? एका अर्थाने हे चांगलेही आहे. भारत देशच उद्या सिनेमावाल्यांच्या हाती असा गेला तर आपल्या खºया राजकारणातल्या सिनेमावाल्यांनी काय करायचे मग उरणार असते... ?

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूPoliticsराजकारणcinemaसिनेमा