शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: जोडे विरुद्ध खेटरे; शिवपुतळा कोसळणं दुर्दैवी, पण दोन्हीकडच्या राजकारणाचं समर्थन कसं करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 09:16 IST

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल तसतसे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत जाईल आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतील संघर्षाचे अनेक प्रसंग बघायला मिळतील.

विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल तसतसे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत जाईल आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतील संघर्षाचे अनेक प्रसंग बघायला मिळतील. २०१९ च्या निकालानंतर चमत्कारिक राजकीय घटनांचा सिलसिला सुरू झाला. दोस्त दुश्मन झाले आणि दुश्मन दोस्त होताना आपण बघितले. सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या सत्ताकारणाची खिचडी करून ठेवली आहे. आता छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. अर्थात त्याला विधानसभा निवडणुकीची किनार  आहेच. दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती; पण, त्यानिमित्ताने दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या राजकारणाचे समर्थन कसे करणार? छत्रपती शिवरायांच्या विचारांचे पाईक आम्हीच असे भासविण्याचे प्रयत्न दोन्हीकडे सुरू आहेत. मुळात गेल्या पाच वर्षांत आताच्या सहा आणि पूर्वीच्या चार प्रमुख पक्षांनी जे काही दगाफटक्याचे राजकारण केले ते छत्रपती शिवरायांच्या कोणत्या विचारांमध्ये बसणारे होते याचे प्रामाणिक उत्तर ज्याचे त्याने द्यावे.

आतापर्यंतच्या वाक‌्युद्धात  वापरलेली भाषा सभ्यतेच्या चौकटीत बसणारी नव्हतीच. सकाळपासून रात्रीपर्यंत कोण कोणापेक्षा खालच्या दर्जाचे बोलतो याची स्पर्धा महाराष्ट्रात दरदिवशी बघायला मिळते. खासगीमध्येही पूर्वीचे राजकारणी एकमेकांबद्दल ज्या भाषेत बोलत नसत, त्याहीपेक्षा खालच्या पातळीवरच्या भाषेचा वापर जाहीररीत्या केला जात आहे. ‘आमचेच शिवप्रेम कसे जाज्वल्य आणि तुमचे कसे बेगडी’ हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे. इतिहासातील संदर्भ देत एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. दर्जाहीन शब्दसंपदा आता संपत चालली म्हणून की काय आता ‘जोडे मारो विरुद्ध खेटर मारो’ असे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांच्याकडून शहाणपणाची अपेक्षा आहे असे बडेबडे नेते एकमेकांच्या फोटोंना जोडे-चपलांनी बडवत आहेत. पायातील वहाणा या पायातच चांगल्या असतात, त्याचा अन्य कारणांसाठी असा गैरवापर करू नये एवढेही शहाणपण कोणत्याच पक्षाच्या नेत्यांकडे राहिलेले नाही असा त्याचा अर्थ! एक दिवस सांकेतिक आंदोलन करून विषय संपविता आला असता; पण नाही, आता राज्यभर हे आंदोलन करण्याची भूमिका घेतली जात आहे. राज्यभर ‘जोडे मारो, खेटर मारो’ करत फिरण्याचे समर्थन कसे करणार?

सणासुदीचे दिवस आहेत. गणरायांचे आगमन चार दिवसांवर आले आहे. त्यानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी असे सगळे उत्सवी आणि उत्साही वातावरण असेल. कोणाच्या राजकारणामुळे या वातावरणाला गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वपक्षीय नेत्यांनी घेणे आवश्यक आहे. ही भूमिका मांडल्यानंतर, ‘छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतरही आंदोलन करायचे नाही काय?’ आणि ‘‘या आंदोलनाला प्रत्युत्तर द्यायचे नाही काय?’ असे प्रश्न साहजिकच विचारले जाऊ शकतात. आंदोलन करण्यास काहीही विरोध नाही, फक्त त्यानिमित्ताने एकमेकांना शिवीगाळ करणे, एकमेकांना वहाणांनी मारणे असे प्रकार टाळले तर सामाजिक साैहार्द टिकेल. महाराष्ट्र निवडणुकीकडे जात असताना मध्ये रांगेने सण येणार आहेत. आपल्याकडे राजकारण आणि धार्मिक भावनांची सरमिसळ लगेच होते, हे संवेदनशीलपणे लक्षात घेण्याची गरज आहे. ‘छत्रपती शिवरायांचा पुतळा पडूनही दंगली कशा घडत नाहीत?’ असे विधान करणे किंवा दररोज वातावरण चिघळेल अशी भडकाऊ भाषा उद्धवसेना, शिंदेसेना किंवा भाजपच्या ‘लाउडस्पीकर’ नेत्यांनी वापरणे तातडीने बंद केले पाहिजे. अशी भाषा प्रत्येक पक्षातील ‘शाउटिंग ब्रिगेड’ वापरतच असते, किंबहुना अशा काही नेत्यांना प्रत्येकच पक्षाने त्यासाठी सोडून दिलेले असते. पण, आता ज्येष्ठ मानले जाणारे नेतेही अशी भाषा वापरू लागले आहेत ही अधिक चिंतेची बाब! एकमेकांविरुद्ध तुम्ही कितीही गरळ ओका, फैसला जनतेच्या दरबारातच होणार आहे. हा दरबारच कोणाला सत्तेत बसवायचे ते ठरविणार आहे. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जाण्याची संधी जनताजनार्दनाकडे मागताना तरी या वहाणा बाहेर ठेेवा. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाचे जे सर्वपक्षीय अवमूल्यन झाले, त्याला लोक कंटाळले आहेत. विकास, राजकीय संस्कृती, सभ्यता याबाबत देशाला मार्गदर्शक ठरणारा पूर्वीचा महाराष्ट्र लोकांना हवा आहे. तो असे जोडे, खेटरे एकमेकांवर उगारून नेतेमंडळी देऊ शकणार नाहीत. बिहारच्या राजकारणाला आपण आजवर नावे ठेवत होतो; पण आपण तर त्याच्याहीपेक्षा खालची पातळी गाठत आहोत. हे वेळेत थांबले नाही, तर संत तुकाराम यांच्या भाषेत जनताच राजकारण्यांना ‘मोजोनी माराव्या पैजारा’ असे म्हणेल; ती वेळ येऊ नये एवढेच!

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती