शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

पोपट बदलला?

By admin | Updated: April 7, 2017 23:39 IST

उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह इत्यादी १३ नेत्यांच्या विरोधात, ढाचा उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचल्याच्या आरोपाखाली खटला चालवला पाहिजे

अयोध्येतील विवादित ढाचा उद्ध्वस्त केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह इत्यादी १३ नेत्यांच्या विरोधात, ढाचा उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचल्याच्या आरोपाखाली खटला चालवला पाहिजे, ही केंद्रीय अन्वेषण संस्था म्हणजेच सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात घेतलेली भूमिका धक्कादायकच म्हटली पाहिजे. साधारणत: चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेच सीबीआयची संभावना ‘पिंजऱ्यातील पोपट’ या शब्दांत केली होती. सीबीआय केवळ केंद्र सरकारच्या हुकमाची ताबेदार आहे आणि सत्तारूढ पक्षाच्या मर्जीनुसारच काम करते, हा न्यायालयाच्या म्हणण्याचा आशय होता. सर्वोच्च न्यायालयाच्या त्या मताच्या पार्श्वभूमीवर, सीबीआयने घेतलेली ताजी भूमिका ही किमान प्रथमदर्शनी तरी धक्कादायकच वाटते. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात प्रचंड बहुमतासह सत्तारूढ झालेले असताना, त्या पक्षाच्या भरारीचा उड्डाण बिंदू ठरलेल्या राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर षडयंत्र रचल्याचा खटला चालविण्याची वकिली जर सीबीआय करीत असेल, तर भारतीय राजकारणाचा किंचितसाही अभ्यास असलेल्या कुणालाही धक्का बसणारच ! कारण सीबीआयच्या इतिहासात तसा दाखलाच नाही. त्यामुळेच तर सर्वोच्च न्यायालयानेही चिडून सीबीआयला पिंजऱ्यातला पोपट संबोधले होते. सीबीआयने सत्तारूढ पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे सकृतदर्शनी दिसत असले तरी, सीबीआयची भूमिका सत्तारूढ पक्षाच्या, किंबहुना त्या पक्षाच्या विद्यमान धुरिणांच्या, विरोधात जाणारी आहे का, हे मात्र तपासूनच बघावे लागेल; कारण राजकारणाची वाट दिसते तशी सरळसोट कधीच नसते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात सत्तारूढ होण्याच्या आधीपासूनच, अडवाणी व जोशींनी मोदींना विरोध करण्याची भूमिका घेतली होती, हे उघड सत्य आहे. तो विरोध मोडून काढत मोदी आधी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार व नंतर पंतप्रधानही बनले. ते होताबरोबर त्यांनी लगेच अडवाणी व जोशींना पक्षाच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य बनवून एकप्रकारे मोडीतच काढले, हा ताजा इतिहास आहे. अडवाणी व जोशींनी त्यानंतरही बऱ्याचदा मोदींच्या विरोधात कुरबूर, धुसफूस केली आहे. वरून दोघेही जुलैमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीकडे डोळे लावून बसले आहेत. राष्ट्रपतिपदासाठी नरेंद्र मोदींच्या मनात जर दुसरेच कोणते नाव असेल, तर त्या व्यक्तीच्या मार्गातील अडथळे आतापासूनच दूर करण्याचा हेतू तर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात घेतलेल्या भूमिकेमागे नाही ना, अशी शंका कुणाच्या मनात चुकचुकल्यास ती अगदीच निराधार म्हणता येणार नाही. त्यामुळे सीबीआयने सत्तारूढ पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने लगेच पोपट बदलला, असे म्हणून हुरळून जाता येणार नाही !