शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

काळाबरोबर बदलूया !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 09:14 IST

- मिलिंद कुलकर्णीकाळाबरोबर चालल्यास प्रगती होते; स्थितीशील राहिल्यास प्रगती खुंटते असे म्हटले जाते. आदिमानव ते आधुनिक मानव हे त्याचे ठळक उदाहरण आहे. दैनंदिन जीवनात आपण अत्याधुनिक सोयी-सुविधांचा वापर करतो, कारण त्यामुळे वेळ वाचतो, श्रम कमी होतात. कामे गुणवत्तापूर्ण होतात. हा त्याचा फायदा आहे. चुलीवरचा स्वयंपाक ही बाब आता कुतूहलाचा विषय ...

- मिलिंद कुलकर्णीकाळाबरोबर चालल्यास प्रगती होते; स्थितीशील राहिल्यास प्रगती खुंटते असे म्हटले जाते. आदिमानव ते आधुनिक मानव हे त्याचे ठळक उदाहरण आहे. दैनंदिन जीवनात आपण अत्याधुनिक सोयी-सुविधांचा वापर करतो, कारण त्यामुळे वेळ वाचतो, श्रम कमी होतात. कामे गुणवत्तापूर्ण होतात. हा त्याचा फायदा आहे. चुलीवरचा स्वयंपाक ही बाब आता कुतूहलाचा विषय बनली आहे. घरोघरी गॅसच्या चुली आलेल्या आहेत. भौतिक साधनांमध्ये ही प्रगती सहजपणे स्वीकारल्यानंतर परंपरा, संस्कृती यात काळानुसार बदल करण्याची सुरुवात झाली आहे. ही सुरुवात खूप धिम्या गतीने आहे. पण त्याची गती वाढण्याची आवश्यकता आहे.

उदाहरण घ्यायचे झाले तर सध्या सुरु असलेल्या लग्नसराईचे घेता येईल. पूर्वीसारखे ८-१० दिवस चालणारे विवाहसोहळे कधीच कालबाह्य झाले आहेत. दीड दिवसांचे विवाह सोहळे बहुतेक ठिकाणी होतात. आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम, सीमंती कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी लग्न सोहळा होतो. स्वागत समारंभ ऐच्छिक असतो. अर्थात ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे तो होत असतो.

यंदा अधिक मास असल्याने लग्नतिथी साधारण १२ मे नंतर नाही, असे सांगितले जाते. विवाह जुळल्यानंतर महिनाभर थांबण्यापेक्षा या हंगामात लग्न उरकण्याकडे वर-वधु या दोन्ही पक्षांचा कल असतो. मे महिन्यातील उन्हाळी सुट्या हे त्यामागील प्रमुख कारण असते. घरातील पहिले किंवा शेवटचे कार्य असे म्हणत लग्न धुमधडाक्यात करायचे, यावर वर पक्षाकडील मंडळींचे एकमत असते. बोलणी करताना मंगल कार्यालय, घोड्यावरुन मिरवणूक, डीजे अशा अटी मंजूर करुन घेतल्या जातात. मोजकी कार्यालये प्रत्येक शहरांमध्ये असल्याने अवाच्या सवा भाडे आकारले जाते. ज्यांना परवडत नाही, ते दारापुढे मंडप टाकून कार्य उरकतात. ४५ अंश तापमानात दारापुढे मंडप टाकून होणारी लग्ने, मिरवणुकांमध्ये डीजेच्या दणदणाटात थ्रीपीस सूट आणि फेटे बांधलेल्या तरुणाईचे सैराट नृत्य पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. वयोवृध्द मंडळी, लहान मुले यांची होणारी आबाळ नजरेआड करुन कसे चालेल? व-हाडींसाठी वाहने लागतात, हंगाम म्हटल्यावर त्यांचेही दर दुप्पट होतात. लग्न कार्याशी संबंधित सगळ्याच बाबी महागलेल्या असतात.

हे सगळे टाळता येणार नाही काय? याचा विचार अलिकडे होऊ लागला आहे. नोंदणी विवाहाची संख्या हळूहळू वाढते आहे. लग्नपत्रिका प्रत्यक्ष घरी जाऊन देण्याचे प्रमाण कमी होत असून व्हॉटस् अप, मेलद्वारे निमंत्रणे पोहोचू लागली आहेत. मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत लग्नसोहळा आटोपून सायंकाळी स्वागत समारंभ आयोजित केला जाऊ लागला आहे. श्रीमंतांमध्ये ‘डेस्टीनेशन मॅरेज’ ही संकल्पना रुढ होऊ लागली आहे.

खान्देशात तर हळदीचा कार्यक्रम आणि लग्न दीड दिवसाचे असले तरी काही समाजात लग्नाच्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत मंडप रिकामा झालेला असतो. लग्नघटिकेपूर्वी भोजनावळी सुरु केल्याने अकारण ताटकळणे थांबले आहे. असे स्वागतार्ह बदल अंगिकारले गेले तर आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास कमी होऊ शकेल आणि लग्नसोहळ्याचा आनंद व-हाडींसोबत यजमानांनाही घेता येऊ शकेल.