शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालयांपुढे आव्हान

By admin | Updated: September 24, 2016 07:45 IST

अधिकारी कार्यालयातर्फे खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांत सार्वजनिक गं्रथालयाच्या पदाधिकारी व ग्रंथपालांच्या स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात आल्या.

केंद्र सरकारच्या राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान (कोलकाता) आणि जिल्हा गं्थालय अधिकारी कार्यालयातर्फे खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांत सार्वजनिक गं्रथालयाच्या पदाधिकारी व ग्रंथपालांच्या स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात आल्या. प्रतिष्ठानच्या ग्रंथालयांसाठीच्या अर्थसाहाय्य योजना चांगल्या असून, दरवर्षी राज्यातील सुमारे चार हजार ग्रंथालये त्याचा लाभ घेत आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हेतू चांगला असला तरी सार्वजनिक ग्रंथालये आणि तेथील कर्मचार्‍यांपुढे असणार्‍या प्रश्नांविषयी मात्र तेथे फार काही बोलले गेले नाही. महाराष्ट्रात १९६७ मध्ये महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये कायदा मंजूर झाला. या कायद्याचे विधेयक विधिमंडळात सादर करताना तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी म्हणाले होते की, जनतेचे नेतृत्व, कार्यकर्त्यांचे कर्तृत्व, दात्यांचे दातृत्व व शासनाचे पितृत्व यावर ग्रंथालय चळवळीच्या सर्वांगीण विकासाची सारी भिस्त राहाणार आहे. कायदा अस्तित्वात येऊन ५0 वर्षे होत आली असताना ग्रंथालयांची संख्या १२ हजार १४४ एवढी झाली आहे. ३५ जिल्ह्यांमध्ये शासकीय ग्रंथालये आहेत. संख्यात्मक प्रगती चांगली झाली असली तरी गुणात्मक प्रगतीविषयी विधान करणे धाडसाचे होणार आहे. गाव तेथे ग्रंथालय हे शासनाचे उद्दिष्ट असले तरी शासकीय अनुदानावर डोळा ठेवून अनेक ठिकाणी कागदावर ग्रंथालये स्थापन झाली. शासन मान्यता मिळवून देणारे दलाल तयार झाले. अखेर शासनाने महसूल विभागाकडून पडताळणी करून बोगस ग्रंथालयांना चाप लावला. जनतेचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचे कर्तृत्व यामुळे काही ग्रंथालयांचा राज्यभर नावलौकिक आहे. शंभरी ओलांडलेल्या ग्रंथालयांनी त्या-त्या भागातील सांस्कृतिक जीवनात मोठे योगदान दिले आहे. साहित्य व नाट्य संमेलनांच्या आयोजनात प्रतिष्ठित ग्रंथालये अग्रभागी राहिली आहेत. व्याख्यानमाला, साहित्य पुरस्कार, नियतकालिके असे सातत्यपूर्ण उपक्रम काही ग्रंथालये राबवीत आहेत. दात्यांचे दातृत्व लाभले तर ग्रंथालये आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील आणि असे वेगळे उपक्रम राबवू शकतील; परंतु असे भाग्य मोजक्या आणि त्याही महानगर आणि जिल्हा पातळीवरील ग्रंथालयांना लाभते. गाव आणि तालुका पातळीवरील ग्रंथालये अनेक आव्हानांना तोंड देत आहेत. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांनी सांगितलेल्या पाच सूत्रांची स्थिती आज काय आहे? ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत, प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे, प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे, वाचकांचा वेळ वाचला पाहिजे, ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे या पाच सूत्रांच्या पूर्ततेचे बंधन असलेली ग्रंथालये अपुरे शासकीय अनुदान, कर्मचार्‍यांचे तुटपुंजे वेतन, जनतेने ग्रंथालयाकडे फिरविलेली पाठ, जागेचा प्रश्न, नि:स्वार्थी व धडपड्या कार्यकर्त्यांची वानवा या आव्हानांना सामोरे जात आहेत. ३0 हजारांपासून ते सात लाख २0 हजार रुपयांपर्यंत वार्षिक अनुदान सार्वजनिक ग्रंथालयांना मिळत आहे. त्यातून कर्मचार्‍यांचे वेतन, ग्रंथखरेदी, सांस्कृतिक कार्यक्रम, इमारत देखभाल असा खर्च भागविण्याची कसरत करावी लागत आहे. एकीकडे सातवा वेतन आयोग लागू असताना ग्रंथालय कर्मचार्‍यांना मात्र वर्षानुवर्षे चार आकडी पगार दिला जात आहे. तरुण पिढीने ग्रंथालयाकडे फिरविलेली पाठ ही गंभीर समस्या आहे. संगणक, टॅब, स्मार्टफोन याद्वारे वाचनाची भूक भागविणारी युवा पिढी ग्रंथालयात पुस्तके घ्यायला येणार कशी? त्यांना ग्रंथालयाकडे आकर्षित करण्यासाठी ई-लायब्ररीसारखे उपाय हाती घ्यायला हवेत. ग्रंथालयात वाचक येत नसतील तर 'ग्रंथ आपल्या दारी'सारख्या उपक्रमांची गरज आहे. 'वाचाल तर वाचाल' याबरोबरच 'काळानुसार बदलाल तर वाचाल' असे म्हणायची वेळ आली आहे. - मिलिंद कुलकर्णीजळगाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा आविभाज्य भाग असलेली ग्रंथालये मोठय़ा आव्हानांना तोंड देत आहेत. त्यांना शासकीय व सामाजिक मदतीची खरी गरज आहे. केंद्र सरकारच्या राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान (कोलकाता) आणि जिल्हा गं्रथालय अधिकारी कार्यालयातर्फे खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांत सार्वजनिक गं्रथालयाच्या पदाधिकारी व ग्रंथपालांच्या स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात आल्या. प्रतिष्ठानच्या ग्रंथालयांसाठीच्या अर्थसाहाय्य योजना चांगल्या असून, दरवर्षी राज्यातील सुमारे चार हजार ग्रंथालये त्याचा लाभ घेत आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हेतू चांगला असला तरी सार्वजनिक ग्रंथालये आणि तेथील कर्मचार्‍यांपुढे असणार्‍या प्रश्नांविषयी मात्र तेथे फार काही बोलले गेले नाही. महाराष्ट्रात १९६७ मध्ये महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये कायदा मंजूर झाला. या कायद्याचे विधेयक विधिमंडळात सादर करताना तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी म्हणाले होते की, जनतेचे नेतृत्व, कार्यकर्त्यांचे कर्तृत्व, दात्यांचे दातृत्व व शासनाचे पितृत्व यावर ग्रंथालय चळवळीच्या सर्वांगीण विकासाची सारी भिस्त राहाणार आहे. कायदा अस्तित्वात येऊन ५0 वर्षे होत आली असताना ग्रंथालयांची संख्या १२ हजार १४४ एवढी झाली आहे. ३५ जिल्ह्यांमध्ये शासकीय ग्रंथालये आहेत. संख्यात्मक प्रगती चांगली झाली असली तरी गुणात्मक प्रगतीविषयी विधान करणे धाडसाचे होणार आहे. गाव तेथे ग्रंथालय हे शासनाचे उद्दिष्ट असले तरी शासकीय अनुदानावर डोळा ठेवून अनेक ठिकाणी कागदावर ग्रंथालये स्थापन झाली. शासन मान्यता मिळवून देणारे दलाल तयार झाले. अखेर शासनाने महसूल विभागाकडून पडताळणी करून बोगस ग्रंथालयांना चाप लावला. जनतेचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचे कर्तृत्व यामुळे काही ग्रंथालयांचा राज्यभर नावलौकिक आहे. शंभरी ओलांडलेल्या ग्रंथालयांनी त्या-त्या भागातील सांस्कृतिक जीवनात मोठे योगदान दिले आहे. साहित्य व नाट्य संमेलनांच्या आयोजनात प्रतिष्ठित ग्रंथालये अग्रभागी राहिली आहेत. व्याख्यानमाला, साहित्य पुरस्कार, नियतकालिके असे सातत्यपूर्ण उपक्रम काही ग्रंथालये राबवीत आहेत. दात्यांचे दातृत्व लाभले तर ग्रंथालये आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील आणि असे वेगळे उपक्रम राबवू शकतील; परंतु असे भाग्य मोजक्या आणि त्याही महानगर आणि जिल्हा पातळीवरील ग्रंथालयांना लाभते. गाव आणि तालुका पातळीवरील ग्रंथालये अनेक आव्हानांना तोंड देत आहेत. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांनी सांगितलेल्या पाच सूत्रांची स्थिती आज काय आहे? ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत, प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे, प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे, वाचकांचा वेळ वाचला पाहिजे, ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे या पाच सूत्रांच्या पूर्ततेचे बंधन असलेली ग्रंथालये अपुरे शासकीय अनुदान, कर्मचार्‍यांचे तुटपुंजे वेतन, जनतेने ग्रंथालयाकडे फिरविलेली पाठ, जागेचा प्रश्न, नि:स्वार्थी व धडपड्या कार्यकर्त्यांची वानवा या आव्हानांना सामोरे जात आहेत. ३0 हजारांपासून ते सात लाख २0 हजार रुपयांपर्यंत वार्षिक अनुदान सार्वजनिक ग्रंथालयांना मिळत आहे. त्यातून कर्मचार्‍यांचे वेतन, ग्रंथखरेदी, सांस्कृतिक कार्यक्रम, इमारत देखभाल असा खर्च भागविण्याची कसरत करावी लागत आहे. एकीकडे सातवा वेतन आयोग लागू असताना ग्रंथालय कर्मचार्‍यांना मात्र वर्षानुवर्षे चार आकडी पगार दिला जात आहे. तरुण पिढीने ग्रंथालयाकडे फिरविलेली पाठ ही गंभीर समस्या आहे. संगणक, टॅब, स्मार्टफोन याद्वारे वाचनाची भूक भागविणारी युवा पिढी ग्रंथालयात पुस्तके घ्यायला येणार कशी? त्यांना ग्रंथालयाकडे आकर्षित करण्यासाठी ई-लायब्ररीसारखे उपाय हाती घ्यायला हवेत. ग्रंथालयात वाचक येत नसतील तर 'ग्रंथ आपल्या दारी'सारख्या उपक्रमांची गरज आहे. 'वाचाल तर वाचाल' याबरोबरच 'काळानुसार बदलाल तर वाचाल' असे म्हणायची वेळ आली आहे. - मिलिंद कुलकर्णी जळगाव