शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:20 IST

माझ्या मित्राकडे लग्न समारंभाच्या स्वागत समारंभाला परिवारासहित गेलो होतो. नववधू व वर दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून लठ्ठ पगारावर सेवेत होते. समारंभाला पोहचलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळ एक खूपच मोठे फलक लावले होते ज्यामध्ये वर नववधूला कवेत घेऊन गाणे गात आहे, या आशयाचे चित्र चित्रांकित केले होते.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारमाझ्या मित्राकडे लग्न समारंभाच्या स्वागत समारंभाला परिवारासहित गेलो होतो. नववधू व वर दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून लठ्ठ पगारावर सेवेत होते. समारंभाला पोहचलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळ एक खूपच मोठे फलक लावले होते ज्यामध्ये वर नववधूला कवेत घेऊन गाणे गात आहे, या आशयाचे चित्र चित्रांकित केले होते. मला एका क्षणापुरता चुकून चित्रपटगृहात आल्याचा भास झाला. प्रचंड थंडीचे दिवस असल्यामुळे रात्री ७.३० ला समारंभ आरंभ होणार होता परंतु रात्री ८.३० वाजेपर्यंत नववधू व वर व्यासपीठावर उपस्थित नसल्यामुळे चौकशी केली तेव्हा दोघेही ब्युटी पार्लरमध्ये गेले असल्यामुळे वेळ होत आहे असे कळले नंतर एकदाचे ९.०० वाजता वधू-वर व्यासपीठावर आले. वधूचा पोशाख देहप्रदर्शनासाठी घातल्यासारखा वाटत होता. नववधूच्या गळ्यात मंगळसूत्र नाही हे सासूच्या लक्षात येताच, त्या धावतच व्यासपीठावर गेल्या व छोटूसं तरी मंगळसूत्र फक्त समारंभापुरता घालण्यासाठी वधूची मनधरणी करू लागल्या पण पोशाखाला मंगळसूत्र साजेसं नाही व गळ्यातसुद्धा आरामदायी वाटत नाही म्हणून वधूने सासूची विनंती साफ नाकारली. वयोवृद्ध व इतर नातेवाईक शुभ आशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर जात होते पण वधूवर एखाद्या राजकीय नेत्यासारखे दुरूनच नमस्कार करीत होते. प्रेमानी बोलणे, हसणे व येणाऱ्यांचे स्वागत करणे हा प्रकार कुठेच आढळत नव्हता. आज समाजात पाश्चात्य संस्कृतीचा पगडा सर्वत्र दिसत आहे. शिक्षण व पैशांनी आपण खूप प्रगत झालो व इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहो हा भाव काही प्रमाणात नवीन पिढीमध्ये वाढत असल्याचे दिसत आहे. आज शिक्षणाने जीवनाची मूल्ये वाढवली की ढासळली? आपण सुशिक्षित तर झालो पण सुसंस्कृत झालो का?प्रसंगाचे पावित्र्य राखणे, वडिलधा-यांचा मान राखणे, वेळेचे भान ठेवणे हे संस्कार आपल्यात रूजणे व वयानुसार परिपक्व होणे आवश्यक आहे. सहनशक्ती, सहयोग व प्रसंगानुसार तडजोड करण्याची वृत्ती प्रत्येकांनी जोपासणे अभिप्रेत आहेच. या गुणांच्या अभावामुळेच की काय आज घटस्फोट, नैराश्यता, आत्महत्या असे प्रकार नवीन जोडप्यात वाढत आहे. सुखी संसारासाठी एकमेकांबद्दल व इतरांबद्दल प्रचंड आदर, त्याग, जिव्हाळा, तडजोड, सहनशक्ती हे सद्गुण आवश्यक असते हे नवीन पिढीला विसरून चालणार नाही, हे मात्र खरे!

टॅग्स :marriageलग्नnewsबातम्या