शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:20 IST

माझ्या मित्राकडे लग्न समारंभाच्या स्वागत समारंभाला परिवारासहित गेलो होतो. नववधू व वर दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून लठ्ठ पगारावर सेवेत होते. समारंभाला पोहचलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळ एक खूपच मोठे फलक लावले होते ज्यामध्ये वर नववधूला कवेत घेऊन गाणे गात आहे, या आशयाचे चित्र चित्रांकित केले होते.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारमाझ्या मित्राकडे लग्न समारंभाच्या स्वागत समारंभाला परिवारासहित गेलो होतो. नववधू व वर दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून लठ्ठ पगारावर सेवेत होते. समारंभाला पोहचलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळ एक खूपच मोठे फलक लावले होते ज्यामध्ये वर नववधूला कवेत घेऊन गाणे गात आहे, या आशयाचे चित्र चित्रांकित केले होते. मला एका क्षणापुरता चुकून चित्रपटगृहात आल्याचा भास झाला. प्रचंड थंडीचे दिवस असल्यामुळे रात्री ७.३० ला समारंभ आरंभ होणार होता परंतु रात्री ८.३० वाजेपर्यंत नववधू व वर व्यासपीठावर उपस्थित नसल्यामुळे चौकशी केली तेव्हा दोघेही ब्युटी पार्लरमध्ये गेले असल्यामुळे वेळ होत आहे असे कळले नंतर एकदाचे ९.०० वाजता वधू-वर व्यासपीठावर आले. वधूचा पोशाख देहप्रदर्शनासाठी घातल्यासारखा वाटत होता. नववधूच्या गळ्यात मंगळसूत्र नाही हे सासूच्या लक्षात येताच, त्या धावतच व्यासपीठावर गेल्या व छोटूसं तरी मंगळसूत्र फक्त समारंभापुरता घालण्यासाठी वधूची मनधरणी करू लागल्या पण पोशाखाला मंगळसूत्र साजेसं नाही व गळ्यातसुद्धा आरामदायी वाटत नाही म्हणून वधूने सासूची विनंती साफ नाकारली. वयोवृद्ध व इतर नातेवाईक शुभ आशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर जात होते पण वधूवर एखाद्या राजकीय नेत्यासारखे दुरूनच नमस्कार करीत होते. प्रेमानी बोलणे, हसणे व येणाऱ्यांचे स्वागत करणे हा प्रकार कुठेच आढळत नव्हता. आज समाजात पाश्चात्य संस्कृतीचा पगडा सर्वत्र दिसत आहे. शिक्षण व पैशांनी आपण खूप प्रगत झालो व इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहो हा भाव काही प्रमाणात नवीन पिढीमध्ये वाढत असल्याचे दिसत आहे. आज शिक्षणाने जीवनाची मूल्ये वाढवली की ढासळली? आपण सुशिक्षित तर झालो पण सुसंस्कृत झालो का?प्रसंगाचे पावित्र्य राखणे, वडिलधा-यांचा मान राखणे, वेळेचे भान ठेवणे हे संस्कार आपल्यात रूजणे व वयानुसार परिपक्व होणे आवश्यक आहे. सहनशक्ती, सहयोग व प्रसंगानुसार तडजोड करण्याची वृत्ती प्रत्येकांनी जोपासणे अभिप्रेत आहेच. या गुणांच्या अभावामुळेच की काय आज घटस्फोट, नैराश्यता, आत्महत्या असे प्रकार नवीन जोडप्यात वाढत आहे. सुखी संसारासाठी एकमेकांबद्दल व इतरांबद्दल प्रचंड आदर, त्याग, जिव्हाळा, तडजोड, सहनशक्ती हे सद्गुण आवश्यक असते हे नवीन पिढीला विसरून चालणार नाही, हे मात्र खरे!

टॅग्स :marriageलग्नnewsबातम्या