शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:20 IST

माझ्या मित्राकडे लग्न समारंभाच्या स्वागत समारंभाला परिवारासहित गेलो होतो. नववधू व वर दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून लठ्ठ पगारावर सेवेत होते. समारंभाला पोहचलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळ एक खूपच मोठे फलक लावले होते ज्यामध्ये वर नववधूला कवेत घेऊन गाणे गात आहे, या आशयाचे चित्र चित्रांकित केले होते.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारमाझ्या मित्राकडे लग्न समारंभाच्या स्वागत समारंभाला परिवारासहित गेलो होतो. नववधू व वर दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून लठ्ठ पगारावर सेवेत होते. समारंभाला पोहचलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळ एक खूपच मोठे फलक लावले होते ज्यामध्ये वर नववधूला कवेत घेऊन गाणे गात आहे, या आशयाचे चित्र चित्रांकित केले होते. मला एका क्षणापुरता चुकून चित्रपटगृहात आल्याचा भास झाला. प्रचंड थंडीचे दिवस असल्यामुळे रात्री ७.३० ला समारंभ आरंभ होणार होता परंतु रात्री ८.३० वाजेपर्यंत नववधू व वर व्यासपीठावर उपस्थित नसल्यामुळे चौकशी केली तेव्हा दोघेही ब्युटी पार्लरमध्ये गेले असल्यामुळे वेळ होत आहे असे कळले नंतर एकदाचे ९.०० वाजता वधू-वर व्यासपीठावर आले. वधूचा पोशाख देहप्रदर्शनासाठी घातल्यासारखा वाटत होता. नववधूच्या गळ्यात मंगळसूत्र नाही हे सासूच्या लक्षात येताच, त्या धावतच व्यासपीठावर गेल्या व छोटूसं तरी मंगळसूत्र फक्त समारंभापुरता घालण्यासाठी वधूची मनधरणी करू लागल्या पण पोशाखाला मंगळसूत्र साजेसं नाही व गळ्यातसुद्धा आरामदायी वाटत नाही म्हणून वधूने सासूची विनंती साफ नाकारली. वयोवृद्ध व इतर नातेवाईक शुभ आशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर जात होते पण वधूवर एखाद्या राजकीय नेत्यासारखे दुरूनच नमस्कार करीत होते. प्रेमानी बोलणे, हसणे व येणाऱ्यांचे स्वागत करणे हा प्रकार कुठेच आढळत नव्हता. आज समाजात पाश्चात्य संस्कृतीचा पगडा सर्वत्र दिसत आहे. शिक्षण व पैशांनी आपण खूप प्रगत झालो व इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहो हा भाव काही प्रमाणात नवीन पिढीमध्ये वाढत असल्याचे दिसत आहे. आज शिक्षणाने जीवनाची मूल्ये वाढवली की ढासळली? आपण सुशिक्षित तर झालो पण सुसंस्कृत झालो का?प्रसंगाचे पावित्र्य राखणे, वडिलधा-यांचा मान राखणे, वेळेचे भान ठेवणे हे संस्कार आपल्यात रूजणे व वयानुसार परिपक्व होणे आवश्यक आहे. सहनशक्ती, सहयोग व प्रसंगानुसार तडजोड करण्याची वृत्ती प्रत्येकांनी जोपासणे अभिप्रेत आहेच. या गुणांच्या अभावामुळेच की काय आज घटस्फोट, नैराश्यता, आत्महत्या असे प्रकार नवीन जोडप्यात वाढत आहे. सुखी संसारासाठी एकमेकांबद्दल व इतरांबद्दल प्रचंड आदर, त्याग, जिव्हाळा, तडजोड, सहनशक्ती हे सद्गुण आवश्यक असते हे नवीन पिढीला विसरून चालणार नाही, हे मात्र खरे!

टॅग्स :marriageलग्नnewsबातम्या