शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

केंद्र व परीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:15 AM

भारतीय तत्त्वज्ञानात असे सांगितले आहे की, मूळ ऊर्जा एकच असून ती आपल्या मूळ रूपात पूर्णत: तटस्थ असते. परंतु ती ऊर्जा कशाप्रकारे अभिव्यक्त होते यावरून तिच्या चांगल्या व वाईटाचा विचार केला जातो. जर ऊर्जेची अभिव्यक्ती लोककल्याणासाठी असेल तर ती ऊर्जा चांगली मानली जाते.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायभारतीय तत्त्वज्ञानात असे सांगितले आहे की, मूळ ऊर्जा एकच असून ती आपल्या मूळ रूपात पूर्णत: तटस्थ असते. परंतु ती ऊर्जा कशाप्रकारे अभिव्यक्त होते यावरून तिच्या चांगल्या व वाईटाचा विचार केला जातो. जर ऊर्जेची अभिव्यक्ती लोककल्याणासाठी असेल तर ती ऊर्जा चांगली मानली जाते. याउलट जर ऊर्जा नुकसानकारक असेल तर तिला नकारात्मक मानले जाते.डॉक्टर चाकूचा वापर करून शल्यचिकित्सेद्वारे रुग्णांना जीवदान देतात. त्यामुळेच त्यांना यश व संपत्ती दोन्ही प्राप्त होतात. गुन्हेगारसुद्धा चाकूचा वापर करतो. परंतु त्याला शिक्षा भोगावी लागते व समाजात त्याला हीन दर्जा दिला जातो. दोन्ही ठिकाणी चाकूचा वापर होतो परंतु एकाची अभिव्यक्ती लोककल्याणासाठी आहे तर दुसरा नकारात्मक रूपात अभिव्यक्त होतो. म्हणजेच एक चांगला व दुसरा वाईट आहे.हे तथ्य समजून घेण्यासाठी अनेक ग्रंथांमध्ये एखाद्या वृत्ताच्या केंद्र व परिघाचे उदाहरण दिले गेले अ ाहे. केंद्रावर आपल्याला कोणतीही रेषा दिसत नाही परंतु केंद्रापासून या रेषा जस-जशा दूर जातात, तस-तसे त्या दोन रेषांमधील अंतरही वाढत जाते.परिघाला जेव्हा या रेषा छेदतात, तेव्हा त्यांच्यातील अंतर सर्वात जास्त असते. याउलट त्या रेषा जस-जशा विरुद्ध दिशेकडून केंद्राकडे येतात, तस-तसे त्यांच्यातील अंतर कमी कमी होत जाते व त्या केंद्राच्या आकारात पूर्णत: एक होतात.परमचैतन्य आपले केंद्र, विश्व वृत्ताचा परिघ व आपले कार्य वृत्ताच्या रेषा म्हणजेच त्रिज्या होय. आपण जस-जसे सांसारिक वस्तूंमध्ये गुंतत जातो, तस-तसे आपण आपल्या परमचेतनेच्या अवस्थेपासून दूर जातो व आपल्याला या विश्वात अंतरच अंतर व भेदा-भेद दिसतात. हेच भेद काही ठिकाणी जातीचे, काही ठिकाणी धर्माचे, काही ठिकाणी वर्णाचे, तर काही ठिकाणी लिंगाचे रूप घेतात. एकमेकांविषयीचा द्वेष आणि हिंसा हे भेदाचेच कारण आहे.यामुळेच भारतीय योग साधनेत आपल्या ध्यानाला आत घेऊन आपल्या परमचेतनेला स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो.ध्यान जेव्हा केंद्राकडे येते तेव्हा एकत्वाची अनुभूती होते व परमकल्याण आणि दयेचा उदय होतो.