शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचे उत्सवीकरण!

By किरण अग्रवाल | Updated: November 23, 2017 10:00 IST

मृत्यू जर अटळ आहे तर त्याचे भय काय बाळगायचे? हा तसा साधा प्रश्न. हिमालयात साधना करणाºया साधूपासून ते आपल्याकडील गल्लीबोळातील भगवे कपडेधा-यापर्यंत व ज्ञानीपासून ते अज्ञानीपर्यंत, सर्वांकडून उपदेशीला जाणारा.

मृत्यू जर अटळ आहे तर त्याचे भय काय बाळगायचे? हा तसा साधा प्रश्न. हिमालयात साधना करणाºया साधूपासून ते आपल्याकडील गल्लीबोळातील भगवे कपडेधा-यापर्यंत व ज्ञानीपासून ते अज्ञानीपर्यंत, सर्वांकडून उपदेशीला जाणारा. तरी मृत्यू नकोसा वाटतो, कारण अटळतेला स्वीकारायची कुणाची तयारी नाही. मृत्यूपाठोपाठ इतरेजनांवर ओढवणारा शोकही आपसूकच नकोसा ठरणारा. म्हणूनच, मृत्यूपश्चात शोकाऐवजी उत्सव साजरा करणारे जेव्हा दिसून येतात तेव्हा त्यांच्यातील निर्मोहित्त्वाला दाद देणे क्रमप्राप्त ठरून जाते.

मरण हे कुणाचेही असो, दु:खदच असते. तरी दीर्घायू राहिलेल्या व सुखा-समाधानाने गेलेल्या व्यक्तीसाठी तिच्या अंत्ययात्रेत भजनी मंडळाला पाचारण करण्याची प्रथा आहे. भजनाच्या घोषात दु:ख वा शोक हलका होण्याची भावना तर असतेच, शिवाय जाणाºयाला दिल्या जाणाºया निरोपाचे ते एकप्रकारचे उत्सवीकरणही असते. मृत्यूपश्चातच्या शोकात मोडकळून पडण्याऐवजी त्यातले सत्य स्वीकारण्याची शक्ती लाभावी म्हणून दशक्रिया विधीच्या दिनी प्रवचनही ठेवले जाते. दशक्रिया किंवा संबंधित विधीवरून सध्या सुरू असलेला वाद-विरोध हा भाग वेगळा; परंतु यानिमित्तच्या प्रवचनात थोरांचे, संतांचे यासंदर्भातले दाखले देत जीवनाचे क्षणभंगूरत्व मांडले जाते. जीव-जगत काय, हे सांगतानाच पंचत्वाचे निरूपण यात केले जाते. जे ज्या मातीतून निर्माण झाले आहे, ते त्या मातीतच मिळणार, असा भावगर्भ आशय त्यामागे असतो. त्याची एक वेगळी फिलॉसॉफी आहे. ती सहज संदर्भाने या माध्यमातून मांडली जाते. ती ‘फिलॉसॉफी’ कोणती, तर‘‘मरताना ज्याच्या राम आला मुखे, धन्य त्याचा सुखा, पार नाही!’’

या संतवचनाचा अर्थ असा की, ज्याने आयुष्य सदाचरणात घालविले असेल तो सुखाने जाईल, त्याची इहलोकीची यात्रा सुफळ ठरेल. पं. जवाहरलाल नेहरू यांनीही मृत्यूबद्दल सांगितलेली एक वेगळी बाब येथे उद्धृत करता येणारी आहे. ‘मृत्यूने नवे जीवन मिळते. जो मृत्यूला मानत नाही किंवा स्वीकारत नाही, त्याला जगणेसुद्धा समजत नाही’, असे नेहरू म्हणत. खूप मोठा आशय व तत्त्वज्ञान या विचारधनात सामावलेले आहे. या साºयाची चर्चा येथे कशासाठी, तर गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील नोएडात हरिभाई लालवाणीनामक व्यक्तीची अंत्ययात्रा बॅण्डबाजा लावून काढण्यात आली व त्यात त्याच्या मुली डान्स करीत सहभागी झाल्याचे वाचावयास मिळाले म्हणून. लालवाणी यांच्या इच्छेनुरूप हे असे केले गेले; परंतु मृत्यूचे हे उत्सवीकरण खरेच सत्य स्वीकारण्याची मनाची तयारी घडविणारेच म्हणता यावे. या संदर्भात प्रख्यात हास्यकवी काका हाथरसी यांचेही उदाहरण देता यावे. आयुष्य लोकांना हसविण्यात वेचलेल्या या कवीने आपल्या निधनानंतर चितेच्या साक्षीने हास्यकवी संमेलन घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती; त्यानुसार ते घेतले गेले होते म्हणे.

विशेष म्हणजे, आपल्याकडे मृत्यूचा असा उत्सव करण्याचे प्रकार चर्चित ठरत असतानाच या उत्सवाची प्रथा जपून त्याबद्दल कमालीची संवेदना जपणा-या एका समुदायाची माहितीही समोर आली आहे. इंडोनेशियाच्या साऊथ सुलावेसी प्रांतातील टोराजा समुदायात ही मृत्यूच्या उत्सवाची प्रथा आहे. या समुदायातील लोक मृत्यूपश्चात आनंदोत्सव तर साजरा करतातच; पण मृतदेहासोबत फोटोही काढतात व एका विशिष्ट रसायनाच्या लेपनाने तो मृतदेह जपूनदेखील ठेवतात. व्यक्ती कधीही मृत्युमुखी पडत नसते, अशी त्यांची त्यामागील श्रद्धा व धारणा आहे. ऐकावे ते नवल, या प्रकारात मोडणारीच ही बाब म्हणायला हवी. पण आहे तिथे तशी प्रथा. शेवटी श्रद्धेला कसा व कोण धक्का लावू शकेल? इजिप्तमध्ये ‘ममीज’ आहेत, तसेच हे म्हणायचे. इजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व २००० काळातील देह ‘ममीफिकेशन’ करून जपून ठेवले गेले आहेत. त्याची स्वतंत्र ‘व्हॅलीज आॅफ किंग्ज्’ तेथे असून, जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे व उत्सुकतेचे ते एक केंद्र ठरले आहे.

थोडक्यात काय तर, मृत्यू हा जीवनाचा अंतिम पडाव असून, त्याबाबतची अपरिहार्यता स्वीकारता आली पाहिजे. जे भल्याभल्यांना जमत नाही. मृत्यूनंतरचा शोक स्वाभाविक असला तरी, गीतोदेशाप्रमाणे कोण काय घेऊन आले, की काय घेऊन जाता येणार आहे? मग असे असेल तर शोक तरी कशाचा करायचा? येथे याच संदर्भाने प्रख्यात कव्वाल अजिज नाझा यांच्या अतिशय गाजलेल्या रचनेचा उल्लेख करता येणारा आहे. ‘चढता सूरज धिरे धिरे ढलता है ढल जायेगा...’मधील ‘खाली हाथ आया है, खाली हाथ जायेंगा’चे वास्तव स्वीकारण्याचा हा विषय आहे. हे रिकाम्या हाती जाणे निर्मोहत्त्वाशी संबंध साधणारे आहे. जगण्यातील कसल्याही सुखाशी, इच्छा-आकाक्षांशी मोह न ठेवणारी व्यक्तीच या अवस्थेपर्यंत पोहोचू शकते. देहाची नश्चरता स्वीकारणे त्यातूनच शक्य होते. नोएडातील लालवाणी कुटुंबातील कन्यांनी तेच सत्य स्वीकारले म्हणायचे.