शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

जात पंचायतींचे भूत

By admin | Updated: March 26, 2016 03:20 IST

न्यायदान हे पवित्र व्रत मानले जाते. त्या व्रताचे पालन करणारा आणि अंमलबजावणी करणारा न्यायी, समतोल वृत्तीचा आणि सत्यनिष्ठेला कायद्याच्या तराजूत तोलणारा असावा

न्यायदान हे पवित्र व्रत मानले जाते. त्या व्रताचे पालन करणारा आणि अंमलबजावणी करणारा न्यायी, समतोल वृत्तीचा आणि सत्यनिष्ठेला कायद्याच्या तराजूत तोलणारा असावा लागतो हे सर्वश्रृतच आहे. परंतु अलीकडे काही जण जात पंचायतींच्या नावाखाली स्वत:लाच न्यायाधीश समजून कायदा हातात घेतात व अत्यंत जाचक स्वरूपाचा न्यायनिवाडा करून समाजात दुही निर्माण करण्याचे काम करताना दिसतात. राज्यातील अनेक भागात भटके विमुक्त आणि आदिवासी समाजात जात पंचायत नावाची अनेक संस्थाने निर्माण झालेली आहेत. त्यांचा दिवसेंदिवस वाढत जाणारा जाच लक्षात घेता ती जात पंचायत की जाच पंचायत असा प्रश्न उपस्थित व्हावा इतकी त्यांनी मजल गाठली आहे. किरकोळ कारणावरून घरातील सुनेला पंचायतीसमोर उभे करणे, आंतरजातीय विवाह केला म्हणून, जागेचे बक्षीसपत्र न दिले म्हणून आणि पंचायतीने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून बहिष्कार आणि वाळीत टाकण्याचे प्रकार महाराष्ट्रात सर्रास घडत असतानाच्या तुलनेत या प्रकारांना आळा घालण्याचे धाडस करायला कोणी धजावत नाहीत. तक्रार केल्यावर कारवाई होणे साहजिक आहे, पण आजही या प्रकारामुळे असंख्य पीडित पंचांनी दिलेला निर्णय प्रमाण मानून मुकाट्याने बहिष्कृताचे जीणे जगत आहेत. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात जातपंचायतीचा आदेश डावलल्यामुळे एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना नंदुरबार जिल्ह्यातील एका विधवा महिलेच्या विरोधात चारित्र्यशुद्धीच्या परीक्षेचा फतवा काढण्यात आला होता. त्यात अजून एक भर पडली आहे गुरुवारच्या एका ताज्या घटनेची. दौंड तालुक्यातील वाळीत टाकलेल्या तिघांना समाजात परत घेण्यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये दंड आणि टक्कल करून गाढवावरून धिंड काढण्याची शिक्षा सुनावली आहे. समाजाने दिलेल्या अधिकाराचा जर कुणी अशाप्रकारे अतिरेक करीत असेल तर अशा पंचांच्या मुसक्या आवळायलाच हव्यात.