शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

‘क्रॉप लॉस रिपोर्टिंग’चे गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 02:37 IST

पीकविमा मिळविण्यासाठी सरकारी अडथळे पार करणाऱ्या देशातील लाखो शेतक-यांना पुन्हा एकदा ‘क्रॉप लॉस रिपोर्टिंग’च्या नवीन निर्णयाने अडचणीत आणले आहे.

पीकविमा मिळविण्यासाठी सरकारी अडथळे पार करणाऱ्या देशातील लाखो शेतक-यांना पुन्हा एकदा ‘क्रॉप लॉस रिपोर्टिंग’च्या नवीन निर्णयाने अडचणीत आणले आहे. पीकविम्याची रक्कम १५ दिवसांत मिळेल, असे गाजर दाखवत शेतकºयांनाच आॅनलाईन प्रक्रियेत गुंतवण्याच्या प्रक्रियेला काही दिवसात सुरुवात होणार आहे. यासाठी केंद्र सरकार आॅक्टोबरपासून ‘क्रॉप लॉस रिपोर्टिंग’ नावाचे मोबाईल अ‍ॅप आणत आहे. त्याद्वारे पीकविम्याची सर्व प्रक्रिया पार पाडली जाईल. निर्णयानुसार शेतकºयाचे कोणत्याही कारणाने पिकाचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांत त्याचे छायाचित्र अ‍ॅपवर लोड करायचे आहे. नंतर पुढच्या १0 दिवसांत विमा कंपन्या नुकसानीचे सर्वेक्षण करतील अन् त्यानंतर पुढच्या १५ दिवसांत विम्याचे पैसे अदा केले जातील. विमा कंपन्यांनी उशीर केल्यास शेतकºयाला १२ टक्के व्याजासह रक्कम अदा करावी लागेल. तक्रार फोनने अथवा ई मेलने पाठविण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. वास्तविक ही क्लिष्ट प्रक्रिया प्रत्येकच शेतकरी पूर्ण करू शकेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येकच शेतकरी इतके टेक्नोसॅव्ही आहेत का? मागील अनेक वर्षांपासून पीकविमा कंपन्यांनी शेतकºयांनाच वेठीस धरून विम्याचे दावे विविध कारणे दाखवून फेटाळण्याचे उद्योग केले. गतवर्षी शेतकºयांना आॅगस्टपर्यंत पीकविम्याची रक्कम भरण्यासाठी मुभा दिली होती. मात्र, आॅनलाईनच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे शेतकºयांचीच लूट झाली. ‘आपले सरकार’ व ‘सेतू’च्या माध्यमातून शेतकºयांना झुलवले गेले. सेतू केंद्रांनी वेबसाईट बंद असल्याची कारणे देऊन आगाऊ रक्कम वसूल केली. नंतर पीकविमा भरून घेण्याची जबाबदारी बँकांवर दिली होती. त्यांनीही अडवणूक केली. वंचित शेतकºयांना नंतर ‘आॅफलाईन’मध्येही क्लेम करण्याचे सांगण्यात आले. पण या कंपन्यांनी उशीर झाल्याची कारणे देऊन दावे फेटाळले. असंवेदनशील यंत्रणेने सर्वच ठिकाणी शेतकºयांची अडवणूक केली. गतवर्षी राज्यात कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीनचे उत्पन्न घटले. कापसावर बोंडअळी आली. विविध पिकांचे नुकसान झाले. हजारो शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात अशा पीकविमा कंपन्यांवर कारवाई करू, अशी घोषणा केली. पण, पुढे काय झाले? आता तर ‘क्रॉप लॉस रिपोर्टिंग’च्या निर्णयाने शेतकरी पुन्हा एकदा दुष्टचक्रात अडकणार, हे निश्चित आहे. या निर्णयात ७२ तासात छायाचित्र काढून ते अपलोड करण्याचे सुचविले गेले आहे. तो कालावधी नेमका पेरणीपासून की नुकसानीपासून? ‘अ‍ॅप’द्वारे प्रक्रिया राबवून लाखो शेतकºयांचे नुकसान किंवा दावे पाहण्यासाठी या कंपन्यांकडे मोठी यंत्रणा आहे का? त्यातही व्याजासह रक्कम देण्याच्या निर्णयातून मार्ग काढण्यासाठी या कंपन्या मार्ग शोधणार नाहीत का? या निर्णयाने शेवटी शेतकरीच गोत्यात येणार हे निश्चित आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी