शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

संधी साधता येईल?

By admin | Updated: July 13, 2015 00:23 IST

चीनमधील शेअर बाजार कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही त्याची लगोलग प्रतिक्रिया उमटली आणि सलग दोन दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला.

चीनमधील शेअर बाजार कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही त्याची लगोलग प्रतिक्रिया उमटली आणि सलग दोन दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला. शेअर बाजार अत्यंत संवेदनशील असल्याने, ग्रीसमधील आर्थिक संकटापाठोपाठ चीनमध्ये शेअर बाजार कोसळल्याने भारतीय शेअर बाजार कोसळले, यात आश्चर्यजनक असे काही नव्हते; परंतु चीनमधील बाजार कोसळणे ही भारतासाठी खरेच धोक्याची घंटा आहे का? काही जाणकारांनुसार, ही भारतासाठी धोक्याची घंटा तर नाहीच; पण साधली तर संधीच ठरेल! चीनमधील संकटात भारतासाठी संधी शोधणारे तज्ज्ञ, २००८ मधील लेहमन ब्रदर्स पेचप्रसंगाची आठवण करून देतात. त्या पेचप्रसंगाच्या वेळीही जगभरातील शेअर बाजार एकापाठोपाठ कोसळले आणि भारतातही चिंतेचे वातावरण पसरले; मात्र कालांतराने भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आली व नंतर धावायलाही लागली. चीनमधील घटनेचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो, असे मानणाऱ्या अर्थतज्ज्ञांच्या मते, या संकटामुळे जगभरातील ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारावर विपरीत परिणाम होईल व त्यांच्या किमती घसरतील. भारत अशा वस्तूंची आयात, तर सेवांची निर्यात करतो. त्यामुळे वस्तूंच्या किमतीत घसरण होण्याचा भारताला लाभच होईल. भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन प्रामुख्याने देशांतर्गत मागणीच्या इंधनावर धावत असल्याने, चिनी बाजार कोसळल्यामुळे पडणारा मनोवैज्ञानिक प्रभाव लवकरच पुसला जाईल, असेही या तज्ज्ञांना वाटते. चीनमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बॅँक व्याजदरातील अपेक्षित कपात पुढे ढकलू शकते आणि तसे झाल्यास जागतिक गुंतवणूकदार अमेरिकेकडे न वळता, भारताकडे वळू शकतील व त्याचा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला होईल. सध्याच्या घडीला भारतातील महागाईचा दर नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर, मान्सूनने साथ दिली आणि नरेंद्र मोदी सरकारने योग्य ती पावले उचलली, तर संभाव्य संकटाचे संधीत रूपांतर करणे शक्य असल्याचे, या तज्ज्ञांचे मत आहे. डिझेलनंतर एलपीजी व रॉकेलवरील अनुदान बंद करून त्यांना नियंत्रणमुक्त करणे, सार्वजनिक गुंतवणूक वाढविणे, बॅँकांना तातडीने भांडवलाचा पुरवठा करणे आणि कायद्याची गरज नसेल ती नियंत्रणे हटविण्याचा वेग वाढविणे, इत्यादी उपाययोजना त्यांनी सुचविल्या आहेत. या उपाययोजनांसाठी नरेंद्र मोदींनी बिहार निवडणूक आटोपण्याची वाट बघू नये; अन्यथा उशीर होईल, असा इशाराही या तज्ज्ञांनी दिला आहे.