शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

संधी साधता येईल?

By admin | Updated: July 13, 2015 00:23 IST

चीनमधील शेअर बाजार कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही त्याची लगोलग प्रतिक्रिया उमटली आणि सलग दोन दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला.

चीनमधील शेअर बाजार कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही त्याची लगोलग प्रतिक्रिया उमटली आणि सलग दोन दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला. शेअर बाजार अत्यंत संवेदनशील असल्याने, ग्रीसमधील आर्थिक संकटापाठोपाठ चीनमध्ये शेअर बाजार कोसळल्याने भारतीय शेअर बाजार कोसळले, यात आश्चर्यजनक असे काही नव्हते; परंतु चीनमधील बाजार कोसळणे ही भारतासाठी खरेच धोक्याची घंटा आहे का? काही जाणकारांनुसार, ही भारतासाठी धोक्याची घंटा तर नाहीच; पण साधली तर संधीच ठरेल! चीनमधील संकटात भारतासाठी संधी शोधणारे तज्ज्ञ, २००८ मधील लेहमन ब्रदर्स पेचप्रसंगाची आठवण करून देतात. त्या पेचप्रसंगाच्या वेळीही जगभरातील शेअर बाजार एकापाठोपाठ कोसळले आणि भारतातही चिंतेचे वातावरण पसरले; मात्र कालांतराने भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आली व नंतर धावायलाही लागली. चीनमधील घटनेचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो, असे मानणाऱ्या अर्थतज्ज्ञांच्या मते, या संकटामुळे जगभरातील ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारावर विपरीत परिणाम होईल व त्यांच्या किमती घसरतील. भारत अशा वस्तूंची आयात, तर सेवांची निर्यात करतो. त्यामुळे वस्तूंच्या किमतीत घसरण होण्याचा भारताला लाभच होईल. भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन प्रामुख्याने देशांतर्गत मागणीच्या इंधनावर धावत असल्याने, चिनी बाजार कोसळल्यामुळे पडणारा मनोवैज्ञानिक प्रभाव लवकरच पुसला जाईल, असेही या तज्ज्ञांना वाटते. चीनमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बॅँक व्याजदरातील अपेक्षित कपात पुढे ढकलू शकते आणि तसे झाल्यास जागतिक गुंतवणूकदार अमेरिकेकडे न वळता, भारताकडे वळू शकतील व त्याचा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला होईल. सध्याच्या घडीला भारतातील महागाईचा दर नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर, मान्सूनने साथ दिली आणि नरेंद्र मोदी सरकारने योग्य ती पावले उचलली, तर संभाव्य संकटाचे संधीत रूपांतर करणे शक्य असल्याचे, या तज्ज्ञांचे मत आहे. डिझेलनंतर एलपीजी व रॉकेलवरील अनुदान बंद करून त्यांना नियंत्रणमुक्त करणे, सार्वजनिक गुंतवणूक वाढविणे, बॅँकांना तातडीने भांडवलाचा पुरवठा करणे आणि कायद्याची गरज नसेल ती नियंत्रणे हटविण्याचा वेग वाढविणे, इत्यादी उपाययोजना त्यांनी सुचविल्या आहेत. या उपाययोजनांसाठी नरेंद्र मोदींनी बिहार निवडणूक आटोपण्याची वाट बघू नये; अन्यथा उशीर होईल, असा इशाराही या तज्ज्ञांनी दिला आहे.