शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

समुद्राचे पाणी आणि मलमूत्रातून वीज तयार करता येईल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 07:59 IST

समुद्रातून घेतलेले अर्धा लिटर खारे पाणी वापरून ४५ दिवस चार्ज न करता प्रकाश देतील असे कंदील बनवण्यात संशोधकांना यश आले आहे. त्या प्रयोगाविषयी...

ऊर्जेचा तुटवडा हे जागतिक वास्तव आहे. विकसित देश अनेक कारणांसाठी ऊर्जेचा अतिवापर करून ग्लोबल वॉर्मिंगसारखी समस्या निर्माण करत आहेत. गेली शंभर वर्षे विकसित देशांचे राहणीमान उच्चच राहिले आहे. त्यांच्याकडील या उच्च जीवनशैलीचे लाड पुरवण्यासाठी मुख्यतः तिसऱ्या जगातील (म्हणजे द. अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडातले काही देश) कच्चा माल मोठ्या प्रमाणात वापरला जातो. शिवाय गेल्या दोन दशकांत जगातल्या विकसनशील देशांतील जीवनमानदेखील एकंदरीने उंचावल्यामुळे तेथेही ही लाट पोहोचली आहे.  विजेची जगभरातील मागणी दरवर्षी वाढत आहे आणि पारंपरिक जीवाश्म इंधन संसाधने कमी होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) असे सूचित केले आहे की, जगभरातील ८४ कोटी लोक सध्या विजेशिवाय जीवन जगत आहेत. आता वेळ आली आहे, ती उपाय शोधायची. यातील एक स्तुत्य उपक्रम दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात राबवला जात आहे. 

दक्षिण अमेरिकेतील अभियंत्यांनी वॉटरलाइट हे अभिनव  उपकरण  विकसित केले आहे- एक हाताने धरलेले उपकरण जे फक्त दोन कप समुद्रातील खाऱ्या  पाण्याने प्रकाश आणि वीज निर्माण  करू शकते. वॉटरलाइट हा एक फिरता कंदील आहे जो अर्धा लिटर खाऱ्या  पाण्याचे अशा ऊर्जेत रूपांतर करतो की, ज्यायोगे  ४५ दिवस  चार्ज न करता प्रकाश देईल. हे उपकरण  आयनीकरणाद्वारे कार्य करते. जेव्हा मिठाच्या पाण्याचे इलेक्ट्रोलाइटस् उपकरणाच्या आत मॅग्नेशियमवर प्रतिक्रिया देतात तेव्हा विद्युत ऊर्जा तयार होते. या प्रक्रियेत मीठ आणि पाणी वेगळे होतात. म्हणून वॉटरलाइट जेव्हा प्रकाश देणे थांबवते तेव्हा उरलेले पाणी स्वयंपाकासाठी वापरले जाऊ शकते. विकासकांनी   दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील टोकावरील किनारी वाळवंट असलेल्या गुआजिरा द्वीपकल्पातील लोकांना हे दिवे प्रदान केले आहेत. तिथे वीज उपलब्ध नाही. हे उपकरण वॉटरप्रूफ आहे आणि पुनर्वापर करता येण्याजोग्या कच्च्या मालापासून  बनवलेले आहे. त्याचे अपेक्षित आयुष्य सुमारे ५,६०० तास आहे; जे २-३ वर्षांच्या वापराएवढे आहे, हे कंदील बनवायची किंमत सध्या पाच हजार रुपये आहे.

हे दिवे रॉकेल किंवा तेल-आधारित कंदिलांना बदलू  शकतात. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून चार्ज केले जाऊ शकतात. उपरोक्त द्वीपकल्पातील वायू  जमातीचे सदस्य त्यांच्या बोटींवर हे कंदील यशस्वीरीत्या वापरत आहेत, ज्यामुळे त्यांना रात्री मासेमारी करता येते. हे कंदील यूएसबी पोर्टद्वारे लहान उपकरणेही चार्ज करू शकतात. आणीबाणीच्या परिस्थितीत जर खारे पाणी उपल्बध नसेल, तर  मानवी लघवीचा वापर ऊर्जानिर्मिसाठी केला जाऊ शकतो. याचाच साधा अर्थ आहे की स्वच्छतागृहातील पदार्थांचा आपण ऊर्जेसाठी सहज वापर करू शकतो. वेस्ट टू वेल्थ हा शब्दप्रयोग अशाच उपायांना वापरला जातो.

- दीपक शिकारपूर, संगणक साक्षरता प्रसारक deepak@deepakshikarpur.com

टॅग्स :electricityवीज