शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बोलाचाच भात अन्...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 03:46 IST

‘कॅग’च्या अहवालात सरकारी निर्ढावलेपणाची लक्तरे टांगली असतानाच, अर्थसंकल्पी तरतुदींवर सेनादले नाराज असल्याचे वृत्त आहे.

साधारणत: वर्षभरापूर्वी माजी सैनिकांच्या एका गटास संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पूर्वीच्या सरकारने सेनादलांकडे गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष केल्याने सेनादलांचे तर नुकसान झालेच, पण सोबतच राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण झाला, या शब्दात टीकास्त्र डागले होते. आज त्या वक्तव्याची आठवण होण्याचे कारण म्हणजे नियंत्रक आणि महालेखापाल म्हणजेच ‘कॅग’चा ताजा अहवाल!

सियाचीनसारख्या अतिउंचावरील प्रदेशात हाडे गोठविणाऱ्या थंडीत देशाच्या रक्षणासाठी सजग असलेल्या सैनिकांच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासारख्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तो सोमवारी संसदेच्या पटलावर ठेवण्यात आला. सियाचीनसारख्या प्रदेशात परिधान करावे लागणारे विशिष्ट कपडे आणि तेथे लागणारी विशेष उपकरणे यांच्या खरेदीस तब्बल चार वर्षांचा विलंब करण्यात आल्याने सैन्याला कपडे व उपकरणांची टंचाई भासते आहे, असे निरीक्षण ‘कॅग’ने नोंदविले आहे. त्यात बर्फाळ प्रदेशात सूर्यप्रकाशाच्या परिवर्तनामुळे डोळ्यांना इजा पोहोचू नये यासाठी वापरावे लागणारे स्नो गॉगल, तसेच बहुउद्देशीय जोड्यांचा समावेश आहे. लष्कराला आवश्यकतेपेक्षा ६२ टक्के कमी स्नो गॉगल उपलब्ध झाले, तर नोव्हेंबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत बहुउद्देशीय जोडे उपलब्धच करून देण्यात आले नाहीत, असे अहवालात म्हटले आहे. शिवाय प्रस्तावित भारतीय संंरक्षण विद्यापीठाच्या स्थापनेतील विलंबावरही अहवालात ताशेरे ओढले आहेत.

कारगिल युद्धानंतर अशा विद्यापीठाच्या स्थापनेची शिफारस केली होती. तेव्हा त्यासाठी ३९५ कोटी लागतील, असा अंदाज होता. आता ती चार हजार कोटींचाही आकडा पार करून गेली आहे आणि तरीही विद्यापीठाचा पत्ताच नाही! राष्ट्रीय सुरक्षेकडेही किती दुर्लक्ष करण्यात येते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. ‘कॅग’च्या अहवालात सरकारी निर्ढावलेपणाची लक्तरे टांगली असतानाच, अर्थसंकल्पी तरतुदींवर सेनादले नाराज असल्याचे वृत्त आहे. सेनादलांच्या आधुनिकीकरणाचा विषय बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. त्यासाठी सातत्याने अतिरिक्त निधीची मागणी करूनही गतवर्षीच्या तुलनेत निधीमध्ये अत्यल्प वाढ करून, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सेनादलांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यांनी संरक्षणासाठी केलेली तरतूद जीडीपीच्या अवघी दीड टक्का आहे. ही १९६२ नंतरची सर्वात कमी तरतूद आहे. सेनादलांवर खर्च करण्याच्या बाबतीत भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो; मात्र जीडीपीचा किती भाग सेनादलांवर खर्च होतो हा निकष लावल्यास, भारताचा क्रमांक बराच खाली जातो.

गतवर्षी सौदी अरेबियाने जीडीपीच्या ८.८ टक्के, इस्रायलने ४.३ टक्के, रशियाने ३.९ टक्के, तर अमेरिकेने ३.२ टक्के खर्च सेनादलांवर केला होता. त्या तुलनेत भारताची तरतूद अगदीच तुटपुंजी म्हणावी लागते. अशा प्रकारे वर्षानुवर्षे सेनादलांकडे अक्षम्य दुर्लक्षाचा परिणाम मनुष्यबळाचा पेचप्रसंग निर्माण होण्यातही झाला आहे. तीन वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार, लष्करात १७.४ टक्के आणि नौदलात १३.३ टक्के कमी मनुष्यबळ होते. भरीस भर म्हणून लष्कराचे बरेचसे मनुष्यबळ अंतर्गत सुरक्षा हाताळण्यातही गुंतून पडलेले असते. त्याचा परिणाम स्वाभाविकरीत्या सीमांच्या रक्षणाच्या तयारीवर होतो. राजकीय लाभासाठी सातत्याने राष्ट्रवाद जागविणाऱ्या आणि आधीच्या सरकारांनी सेनादलांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा उठसूट आरोप करणाऱ्या सरकारसाठी ही परिस्थिती अत्यंत लाजिरवाणी आहे.

सेनादलांकडे दुर्लक्ष ही बाब देशासाठी नवी नाही. स्वातंत्र्यापासून ते सुरू आहे. त्याचे दुष्परिणाम पाकिस्तानसोबतच्या चार आणि चीनसोबतच्या एका युद्धात देशाला भोगावे लागले. त्या त्या वेळी सत्तेत असलेल्या प्रत्येक सरकारला त्यासाठी जबाबदार धरावे लागेल; पण प्रत्येक बाबतीत आधीच्या सरकारांपेक्षा वेगळे असल्याचा कंठशोष करणाऱ्या सरकारच्या कारकिर्दीतही परिस्थितीत फरक पडत नसेल, तर ही कृती केवळ बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी, असल्याचे म्हणावे लागेल!

अर्थमंत्री सीतारामन यांनी सेनादलांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यांनी संरक्षणासाठी केलेली तरतूद सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच जीडीपीच्या अवघी दीड टक्का आहे. ही तरतूद १९६२ नंतरची सर्वात कमी तरतूद आहे.

टॅग्स :budget 2020बजेटNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभागIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था