शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांचे ‘नाराजी-नाट्य’; भाजपाला एक संधी, शिंदे-अजितदादांच्या कोट्यातील मंत्रिपदे ‘हाउसफुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 09:27 IST

शिंदेसेना वा अजित पवार गटात  पुढील पाच वर्षे कोणी मंत्री होईल, अशी संधी दिसत नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये आता ४२ मंत्री आहेत. कायद्याने एकूण जास्तीत जास्त ४३ (आमदार संख्येच्या १५ टक्के) मंत्री असू शकतात. याचा अर्थ केवळ एकच मंत्रिपद आता रिक्त आहे आणि ते भाजपच्या कोट्यातील आहे. त्यामुळे आता मंत्री होण्याची उरलीसुरली पुसट आशा फक्त भाजपमध्येच आहे, बाकी दोघांसमोर ‘हाउसफुल्ल’चा बोर्ड लागला आहे. नेतृत्वावर या ना त्या प्रकारे दबाव आणून, ब्लॅकमेल करत मंत्रिपद मिळविण्याचा खटाटोप अधूनमधून होत असतो. एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात तसा अनुभव आपल्याच लोकांकडून आलेला होता; पण तेही तयारीचे होते, दबावाला बळी वगैरे पडले नाहीत. त्यामुळे  कोट शिवून तयार ठेवला; पण तो शपथविधीला वापरण्याची संधी काहींना मिळालीच नाही. अशा कोटवाल्यांपैकी एक भरत गोगावले अखेर आता मंत्री झाले आहेत. 

शिंदेसेना वा अजित पवार गटात  पुढील पाच वर्षे कोणी मंत्री होईल, अशी संधी दिसत नाही. नाही म्हणता ‘आता दिलेली मंत्रिपदे अडीच वर्षांसाठीच असल्या’चे  संकेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दिले आहेत. खरेच तसे घडेल का? अडीच वर्षांनंतर हे दोघे भाकरी फिरवतील का? याबाबत जरा शंकाच आहे. आताच भाकरी फिरवताना इतका त्रास झाला तर अडीच वर्षांनी तो आणखी जास्त होईल. आपल्यांना दुखावणे इतके सोपे नसते. अडीच वर्षांचा जो फॉर्म्युला काढला आहे त्या मागे मुख्यत्वे नाराजांना आशेवर ठेवण्याचाच उद्देश अधिक दिसतो.  एकाचवेळी एवढ्या मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात होण्याची अलीकडच्या वर्षांमधली ही पहिलीच घटना आहे. पूर्वी किमान चार-पाच मंत्रिपदे रिकामी ठेवली जायची आणि त्यायोगे इच्छुकांना मंत्रिपदाचे गाजर दाखवत ठेवायची सोयही असायची. मग अनेक नेते ‘आज ना उद्या आपल्याला घेतीलच’ या आशेवर टांगलेले राहायचे. मंत्रिपदापासून वंचित राहिलेले नेते मग पडद्याआडून खूप काही करायचे, मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणाऱ्या खेळी खेळल्या जायच्या. काठावर बहुमत असायचे तेव्हा अशा खेळींचा काही उपयोग तरी व्हायचा, यावेळी तसे कोणी केले तरी सरकारच्या स्थैर्यावर त्याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. 

काही नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवायला लगेच सुरुवात केली आहे; पण त्यातून  केवळ माध्यमांना बातम्या मिळत राहतील; सरकारला त्याचा फटका बसण्याची शक्यता नाही. ४३ पैकी ४२ मंत्रिपदे एकाच झटक्यात भरल्याने असंतोषाचा काही ना काही भडका नक्कीच उडेल, याची कल्पना फडणवीस-शिंदे-अजित पवारांना नक्कीच असावी, तरीही त्यांनी धाडस केले. स्थिर आणि भक्कम सरकारच्या दृष्टीने त्याचे स्वागतच केले पाहिजे. विविध प्रकारचे संतुलन साधताना कोणी ना कोणी नाराज होणार, हेही तितकेच खरे पण तरीही काही दिग्गज नेत्यांना बाजूला केल्याने चर्चा तर होणारच. उपमा, अलंकारांची पेरणी करत प्रवाही बोलणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिपदाचा अलंकार कसा काय काढून घेतला गेला, हे इतरांना काय त्यांना स्वत:लादेखील अद्याप कळलेले नाही. आपले नाव मंत्रिपदासाठी पाठविले आहे, असे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याला सांगितले होते, असे मुनगंटीवार यांनी स्वत:च म्हटले आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? त्यांचे नाव वर म्हणजे दिल्लीला पाठविले होते, तरीही ते मंत्री झाले नाहीत, याचा अर्थ दिल्लीने त्यांचा पत्ता कापला असा घ्यावा काय? फडणवीस यांनी तयार केलेली आपल्या पक्षाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीने जशीच्या तशी स्वीकारली नाही. पाच-सहा दिवस त्यांना ताटकळत ठेवले. 

मुनगंटीवार यांच्याशी त्यांचे फारसे सख्य नाही; पण त्यांच्या अगदी जवळच्या दोघांच्या नावावर दिल्लीने फुली मारली; पाचवेळचे आमदार डॉ. संजय कुटे हे त्यापैकीच एक होते, अशी चर्चाही आता होऊ लागली आहे. छगन भुजबळ या दिग्गज नेत्याला डावलणे, हा अजित पवार गटातील अंतर्गत संघर्षाचा परिपाक दिसतो. भुजबळ हे बहुजन समाजाचे नेते आहेत. त्यांना नेहमीसाठी डावलणे अजित पवार यांना राजकीयदृष्ट्या परवडणारे नसेल. त्यांच्यासाठी पुनर्वसनाचे कुठले ना कुठले केंद्र शोधावेच लागेल. जातीय, विभागीय संतुलन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका असे सगळे लक्षात घेऊन मंत्रिमंडळ बनविले गेले असले तरी मंत्रिपदांपासून वंचित राहिलेल्यांचे  नाराजीचे सूर उमटत राहू नयेत, यासाठीची डागडुजी तिन्ही पक्षांना करावीच लागणार आहे.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMahayutiमहायुतीState Governmentराज्य सरकार