शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

वंचितांचे ‘नाराजी-नाट्य’; भाजपाला एक संधी, शिंदे-अजितदादांच्या कोट्यातील मंत्रिपदे ‘हाउसफुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 09:27 IST

शिंदेसेना वा अजित पवार गटात  पुढील पाच वर्षे कोणी मंत्री होईल, अशी संधी दिसत नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये आता ४२ मंत्री आहेत. कायद्याने एकूण जास्तीत जास्त ४३ (आमदार संख्येच्या १५ टक्के) मंत्री असू शकतात. याचा अर्थ केवळ एकच मंत्रिपद आता रिक्त आहे आणि ते भाजपच्या कोट्यातील आहे. त्यामुळे आता मंत्री होण्याची उरलीसुरली पुसट आशा फक्त भाजपमध्येच आहे, बाकी दोघांसमोर ‘हाउसफुल्ल’चा बोर्ड लागला आहे. नेतृत्वावर या ना त्या प्रकारे दबाव आणून, ब्लॅकमेल करत मंत्रिपद मिळविण्याचा खटाटोप अधूनमधून होत असतो. एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात तसा अनुभव आपल्याच लोकांकडून आलेला होता; पण तेही तयारीचे होते, दबावाला बळी वगैरे पडले नाहीत. त्यामुळे  कोट शिवून तयार ठेवला; पण तो शपथविधीला वापरण्याची संधी काहींना मिळालीच नाही. अशा कोटवाल्यांपैकी एक भरत गोगावले अखेर आता मंत्री झाले आहेत. 

शिंदेसेना वा अजित पवार गटात  पुढील पाच वर्षे कोणी मंत्री होईल, अशी संधी दिसत नाही. नाही म्हणता ‘आता दिलेली मंत्रिपदे अडीच वर्षांसाठीच असल्या’चे  संकेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दिले आहेत. खरेच तसे घडेल का? अडीच वर्षांनंतर हे दोघे भाकरी फिरवतील का? याबाबत जरा शंकाच आहे. आताच भाकरी फिरवताना इतका त्रास झाला तर अडीच वर्षांनी तो आणखी जास्त होईल. आपल्यांना दुखावणे इतके सोपे नसते. अडीच वर्षांचा जो फॉर्म्युला काढला आहे त्या मागे मुख्यत्वे नाराजांना आशेवर ठेवण्याचाच उद्देश अधिक दिसतो.  एकाचवेळी एवढ्या मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात होण्याची अलीकडच्या वर्षांमधली ही पहिलीच घटना आहे. पूर्वी किमान चार-पाच मंत्रिपदे रिकामी ठेवली जायची आणि त्यायोगे इच्छुकांना मंत्रिपदाचे गाजर दाखवत ठेवायची सोयही असायची. मग अनेक नेते ‘आज ना उद्या आपल्याला घेतीलच’ या आशेवर टांगलेले राहायचे. मंत्रिपदापासून वंचित राहिलेले नेते मग पडद्याआडून खूप काही करायचे, मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणाऱ्या खेळी खेळल्या जायच्या. काठावर बहुमत असायचे तेव्हा अशा खेळींचा काही उपयोग तरी व्हायचा, यावेळी तसे कोणी केले तरी सरकारच्या स्थैर्यावर त्याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. 

काही नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवायला लगेच सुरुवात केली आहे; पण त्यातून  केवळ माध्यमांना बातम्या मिळत राहतील; सरकारला त्याचा फटका बसण्याची शक्यता नाही. ४३ पैकी ४२ मंत्रिपदे एकाच झटक्यात भरल्याने असंतोषाचा काही ना काही भडका नक्कीच उडेल, याची कल्पना फडणवीस-शिंदे-अजित पवारांना नक्कीच असावी, तरीही त्यांनी धाडस केले. स्थिर आणि भक्कम सरकारच्या दृष्टीने त्याचे स्वागतच केले पाहिजे. विविध प्रकारचे संतुलन साधताना कोणी ना कोणी नाराज होणार, हेही तितकेच खरे पण तरीही काही दिग्गज नेत्यांना बाजूला केल्याने चर्चा तर होणारच. उपमा, अलंकारांची पेरणी करत प्रवाही बोलणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिपदाचा अलंकार कसा काय काढून घेतला गेला, हे इतरांना काय त्यांना स्वत:लादेखील अद्याप कळलेले नाही. आपले नाव मंत्रिपदासाठी पाठविले आहे, असे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याला सांगितले होते, असे मुनगंटीवार यांनी स्वत:च म्हटले आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? त्यांचे नाव वर म्हणजे दिल्लीला पाठविले होते, तरीही ते मंत्री झाले नाहीत, याचा अर्थ दिल्लीने त्यांचा पत्ता कापला असा घ्यावा काय? फडणवीस यांनी तयार केलेली आपल्या पक्षाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीने जशीच्या तशी स्वीकारली नाही. पाच-सहा दिवस त्यांना ताटकळत ठेवले. 

मुनगंटीवार यांच्याशी त्यांचे फारसे सख्य नाही; पण त्यांच्या अगदी जवळच्या दोघांच्या नावावर दिल्लीने फुली मारली; पाचवेळचे आमदार डॉ. संजय कुटे हे त्यापैकीच एक होते, अशी चर्चाही आता होऊ लागली आहे. छगन भुजबळ या दिग्गज नेत्याला डावलणे, हा अजित पवार गटातील अंतर्गत संघर्षाचा परिपाक दिसतो. भुजबळ हे बहुजन समाजाचे नेते आहेत. त्यांना नेहमीसाठी डावलणे अजित पवार यांना राजकीयदृष्ट्या परवडणारे नसेल. त्यांच्यासाठी पुनर्वसनाचे कुठले ना कुठले केंद्र शोधावेच लागेल. जातीय, विभागीय संतुलन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका असे सगळे लक्षात घेऊन मंत्रिमंडळ बनविले गेले असले तरी मंत्रिपदांपासून वंचित राहिलेल्यांचे  नाराजीचे सूर उमटत राहू नयेत, यासाठीची डागडुजी तिन्ही पक्षांना करावीच लागणार आहे.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMahayutiमहायुतीState Governmentराज्य सरकार