शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

budget 2021 : धक्के नाहीत, हे अभिनंदनीय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 02:57 IST

budget 2021 : अनपेक्षित असे या अर्थसंकल्पात फारसे काही नाही. पायाभूत सुविधांच्या निर्मितीला वेग देण्याचा सरकारचा इरादा अभिनंदनाला पात्र आहे, हे निश्चित. पायाभूत क्षेत्रातील सर्वच घटकांत सरकारने गुंतवणूक करायचा निर्णय घेतलेला दिसतो आहे.

- किरण मुझुमदार-शाॅ(कार्यकारी अध्यक्ष, बायोकॉन )अनपेक्षित असे या अर्थसंकल्पात फारसे काही नाही. पायाभूत सुविधांच्या निर्मितीला वेग देण्याचा सरकारचा इरादा अभिनंदनाला पात्र आहे, हे निश्चित. पायाभूत क्षेत्रातील सर्वच घटकांत सरकारने गुंतवणूक करायचा निर्णय घेतलेला दिसतो आहे. आरोग्य, बंदरे, महामार्ग, मेट्रो, अक्षय ऊर्जा या सगळ्याच क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मितीला वेग येईल, अशी चिन्हे दिसतात. अर्थात, ज्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे सरकारने जाहीर केले, त्या योजनांसाठी पैसा कसा-किती उपलब्ध होतो, या योजनांची  कशाप्रकारे अंमलबजावणी होते, त्या अंमलबजावणीचा वेग काय असेल यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. कोरोनाकाळात गेलेले अनेक रोजगार या गुंतवणूकीतून पुन्हा निर्माण होतील.दुसरा मुद्दा आहे तो संशोधन आणि नवनिर्मिती अर्थात रिसर्च आणि इनोव्हेशन संदर्भात सरकारने घेतलेला निर्णय. दहा वर्षांच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील संशोधनासाठी सरकार ५०,००० कोटी रुपये उपलब्ध करून देणार याचा मोठा आनंद आहे. अर्थात माझी अपेक्षा होती की शासनाने सार्वजनिक क्षेत्राप्रमाणेच खासगी क्षेत्रालाही संशोधनासाठी ‘इन्सेंटिव्ह’ द्यावेत. तसे झाले असते तर मला अधिक आवडले असते, मात्र सरकार खासगी क्षेत्रापेक्षा सार्वजनिक क्षेत्रात अधिक पैसा गुंतवून सार्वजनिक क्षेत्रातील संशोधनाला बळ देण्याचा प्रयत्न करते आहे. एक ‘पब्लिक इकोसिस्टिम’ त्यातून तयार करायचा प्रयत्न दिसतो आहे. पायाभूत सुविधा, संशोधन, शिक्षण या क्षेत्रातली गुंतवणूकही त्या दिशेने तयार करण्यात येणाऱ्या संधींसाठीच अधिक उपयुक्त ठरावी, असे प्रयत्न दिसतात. बँकिंग आणि विमा क्षेत्रात येणाऱ्या विदेशी गुंतवणुकीचा अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होईल. निर्गुंतवणूक प्रक्रियाही सरकारने सुरू केलेली दिसते. मात्र या अर्थसंकल्पात तरी सरकारचा खरा भर सार्वजनिक क्षेत्राचे हात बळकट करणे, त्या क्षेत्रांना अधिक संधी-निधी उपलब्ध करून देणे यावरच दिसतो आहे. खासगी क्षेत्रालाही त्यांनी तसे पाठबळ दिले असते तर ते जास्त पूरक ठरले असते, मात्र तसा विचार न करता सरकारने यावेळी तरी आपली सारी मदार सार्वजनिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांवरच ठेवलेली दिसते. खासगीकरणाला या सरकारचा विरोध नसला, तरी खासगी उद्योग क्षेत्राने सरकारकडे डोळे लावून बसू नये, या क्षेत्राने स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे एकूण धोरण दिसते. वरकरणी या अर्थसंकल्पात फार काही ‘धक्के’ नाहीत याचाही आनंदच आहे. अनेकांना वाटत होते की, कोविड काळातून सावरताना श्रीमंतांपासून सामान्यांपर्यंत प्रत्येकासाठी करभार वाढेल, मात्र तसे  काही घडले नाही या साऱ्याच्या पल्याड एक महत्त्वाची गोष्ट आहे- देशाच्या आर्थिक धोरणात आवश्यक असलेले सातत्य. ते सातत्य या अर्थसंकल्पाने राखले ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. 

टॅग्स :budget 2021बजेट 2021