शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

Budget 2021: रस्ते बांधा, रेल्वे मार्ग बांधा, हातांना काम द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 03:46 IST

Budget 2021: कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर उद्योगांना कर्जरूपी सवलत देण्याची वेळ निघून गेली आहे. उद्योगांची मागणी कशी वाढेल, यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.

- प्रदीप भार्गव (ज्येष्ठ उद्योजक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे माजी अध्यक्ष )कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर उद्योगांना कर्जरूपी सवलत देण्याची वेळ निघून गेली आहे. उद्योगांची मागणी कशी वाढेल, यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून एमएसएमईला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारायला हवे. त्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रासाठी वेगळी योजना आणावी, अशी आमची मागणी नाही. जुन्याच योजनांची प्रभावीपणे अंमलबाजवणी करण्याची गरज आहे. असे केले तरी अर्थव्यवस्था रुळावर येईल आणि उद्योगांना त्याचा फायदा होईल. त्यासाठी सरकारने वेळीच पुढाकार घेऊन याकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे.सध्याच्या स्थितीत एमएसएमई उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित पावले उचलणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्रात मागणी निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे आणि महामार्ग निर्मितीमध्ये अधिक गुंतवणूक करावी. या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढल्यास कुशल आणि अकुशल कामगारांना रोजगार मिळेल. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. अकुशल कामगरांबरोबर कुशल कामगारही बेरोजगार झाले. काहींचे पगार कमी झाले, तर काहींच्या डोक्यावर अजूनही बरोजगारीची टांगती तलवार आहे. कामगारांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले गेले पाहिजे आणि तातडीने ते सोडवले गेले पाहिजेत. या कामांमध्ये एमएसएमईला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारायला हवे. त्यामुळे पायाभूत सुविधा सक्षम होण्याबरोबरच लहान उद्योगांना काम मिळेल. राज्य सरकारनेही स्थानिक पातळीवरील कामांमध्ये एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्यायला हवे. रोखतेचा अभाव ही सध्याच्या उद्योगांसमोरील मोठी समस्या आहे. केंद्र सरकार, सार्वजनिक कंपन्यांकडे विविध प्रकारचा कर परतावा आणि केलेल्या कामांची थकीत रक्कम मिळून उद्योगांची तब्बल तीन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकीत आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळाल्यास उद्योगांवरील रोखतेचा भार बराच कमी होईल. वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) परतावा, निर्यात परतावा, सरकार आणि सरकारी कंपन्यांसाठी केलेल्या कामांची थकीत रक्कम, विविध कामांसाठी ठेव म्हणून दिलेली रक्कम अशा थकबाकीचा यात समावेश आहे. ही देणी तातडीने मिळावीत. कंपनीने केलेल्या कामापोटी काही रक्कम अनामत म्हणून ठेवली जाते. ही रक्कम मिळण्यातही उशीर होतो. हे उचित नव्हे.  यात काही भार मोठ्या उद्योगांनाही उचलावा लागेल, काही सरकारला. सरकारने मोठ्या उद्योगांची देणी दिल्यास, ते लहान उद्योगांची देणी देतील. करपरतावा आणि केलेल्या कामांची देणी म्हणजे उद्योगांना दिलेली मदत नाही. हा उद्योगांचा हक्काचा पैसा आहे. तो त्यांना मिळायलाच हवा. केंद्र आणि राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये एमएसएमईला प्राधान्य दिले गेले, तर लघुउद्योगांमध्ये मागणी वाढेल... स्वाभाविकच रोजगारही तयार होतील! अर्थव्यवस्थेसाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.

टॅग्स :budget 2021बजेट 2021businessव्यवसाय