शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Budget 2021: रस्ते बांधा, रेल्वे मार्ग बांधा, हातांना काम द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 03:46 IST

Budget 2021: कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर उद्योगांना कर्जरूपी सवलत देण्याची वेळ निघून गेली आहे. उद्योगांची मागणी कशी वाढेल, यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.

- प्रदीप भार्गव (ज्येष्ठ उद्योजक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे माजी अध्यक्ष )कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर उद्योगांना कर्जरूपी सवलत देण्याची वेळ निघून गेली आहे. उद्योगांची मागणी कशी वाढेल, यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून एमएसएमईला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारायला हवे. त्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रासाठी वेगळी योजना आणावी, अशी आमची मागणी नाही. जुन्याच योजनांची प्रभावीपणे अंमलबाजवणी करण्याची गरज आहे. असे केले तरी अर्थव्यवस्था रुळावर येईल आणि उद्योगांना त्याचा फायदा होईल. त्यासाठी सरकारने वेळीच पुढाकार घेऊन याकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे.सध्याच्या स्थितीत एमएसएमई उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित पावले उचलणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्रात मागणी निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे आणि महामार्ग निर्मितीमध्ये अधिक गुंतवणूक करावी. या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढल्यास कुशल आणि अकुशल कामगारांना रोजगार मिळेल. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. अकुशल कामगरांबरोबर कुशल कामगारही बेरोजगार झाले. काहींचे पगार कमी झाले, तर काहींच्या डोक्यावर अजूनही बरोजगारीची टांगती तलवार आहे. कामगारांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले गेले पाहिजे आणि तातडीने ते सोडवले गेले पाहिजेत. या कामांमध्ये एमएसएमईला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारायला हवे. त्यामुळे पायाभूत सुविधा सक्षम होण्याबरोबरच लहान उद्योगांना काम मिळेल. राज्य सरकारनेही स्थानिक पातळीवरील कामांमध्ये एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्यायला हवे. रोखतेचा अभाव ही सध्याच्या उद्योगांसमोरील मोठी समस्या आहे. केंद्र सरकार, सार्वजनिक कंपन्यांकडे विविध प्रकारचा कर परतावा आणि केलेल्या कामांची थकीत रक्कम मिळून उद्योगांची तब्बल तीन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकीत आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळाल्यास उद्योगांवरील रोखतेचा भार बराच कमी होईल. वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) परतावा, निर्यात परतावा, सरकार आणि सरकारी कंपन्यांसाठी केलेल्या कामांची थकीत रक्कम, विविध कामांसाठी ठेव म्हणून दिलेली रक्कम अशा थकबाकीचा यात समावेश आहे. ही देणी तातडीने मिळावीत. कंपनीने केलेल्या कामापोटी काही रक्कम अनामत म्हणून ठेवली जाते. ही रक्कम मिळण्यातही उशीर होतो. हे उचित नव्हे.  यात काही भार मोठ्या उद्योगांनाही उचलावा लागेल, काही सरकारला. सरकारने मोठ्या उद्योगांची देणी दिल्यास, ते लहान उद्योगांची देणी देतील. करपरतावा आणि केलेल्या कामांची देणी म्हणजे उद्योगांना दिलेली मदत नाही. हा उद्योगांचा हक्काचा पैसा आहे. तो त्यांना मिळायलाच हवा. केंद्र आणि राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये एमएसएमईला प्राधान्य दिले गेले, तर लघुउद्योगांमध्ये मागणी वाढेल... स्वाभाविकच रोजगारही तयार होतील! अर्थव्यवस्थेसाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.

टॅग्स :budget 2021बजेट 2021businessव्यवसाय