शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

budget 2018 : अंमलबजावणीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:52 IST

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या वर्षीचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे़ सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी हा अर्थसंकल्प तयार केला आहे की खरोखरच तो गरिबांना फायदेशीर ठरणार आहे हे येणारा काळच ठरवेल़ कारण या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या तरतुदी खूपच चांगल्या आहेत़ रेल्वे स्थानकांवर सरकते जिने उभारण्याचा उपक्रमही प्रवाशांच्या हिताचा आहे.

- अच्युत गोडबोले (अर्थतज्ज्ञ)लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या वर्षीचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे़ सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी हा अर्थसंकल्प तयार केला आहे की खरोखरच तो गरिबांना फायदेशीर ठरणार आहे हे येणारा काळच ठरवेल़ कारण या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या तरतुदी खूपच चांगल्या आहेत़ रेल्वे स्थानकांवर सरकते जिने उभारण्याचा उपक्रमही प्रवाशांच्या हिताचा आहे़ मात्र २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करू ही घोषणा प्रत्यक्षात खरी होईल का, याबाबत सध्या तरी साशंकताच आहे़ याआधीही सरकारने ही घोषणा केली होती़ शेतकºयांचे उत्पन्न महागाई वजा करून वाढेल की महागाईचा दर धरून त्यांचे उत्पन्न वाढलेले असेल हे सरकारने स्पष्ट केलेले नाही़ महागाईचा दर धरून उत्पन्न वाढणार असेल तर त्याचा फायदा निश्चितच शेतकºयांना होणार नाही़ महागाईचा दर वजा करून उत्पन्न वाढणार असेल तर ते शेतकºयांना लाभदायी ठरेल़ त्यामुळे शेतकºयांच्या उत्पन्नवाढीची घोषणा पूर्ण स्पष्ट व्हायला हवी़ तसेच शेती उत्पादनवाढीचा दर गेल्या तीन वर्षांत कमी झाला आहे़तीन वर्षांपूर्वी हा दर ३़५ टक्के होता़ आता हा दर १़०९ टक्के झाला आहे़ शेती उत्पादनच कमी झाले असेल तर शेतकºयांचे उत्पन्न कसे वाढणार, असा प्रश्न उपस्थित होतो़ शेतकºयांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर शेती उत्पादन दर वाढायला हवा़ शेती उत्पादन दर १२ टक्के झाला तरच शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत वाढू शकेल, अन्यथा शेतकºयांचे उत्पन्न प्रत्यक्षात वाढणे अशक्य आहे़ शेतकºयांना खर्चापेक्षा ५० टक्के अधिक हमीभाव दिला जाईल, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे़ ही तरतूद सर्व शेती उत्पादनासाठी असल्याने ती नक्कीच शेतकºयांच्या हिताची आहे़ पण याआधीही काही शेती उत्पादनांसाठी अशाच प्रकारची घोषणा करण्यात आली होती़ अधिक हमीभाव मिळूनही शेतकºयांना ती उत्पादने कमी भावाने विकावी लागत आहेत़ असे असताना ही घोषणा कागदावरच राहणार की याचा फायदा शेतकºयांना होणार हे येणारा काळच ठरवेल़ सर्वसामान्यांना दिलासा देणारी या अर्थसंकल्पातील दुसरी तरतूद म्हणजे कुटुंबाला ५ लाख रुपये आरोग्य विमा मिळणार आहे़ ही घोषणा कोट्यवधी कुटुंबांसाठी लाभदायी आहे़ या घोषणेचा फायदा खासगी कंपन्यांना होणार तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित होते़ कारण ही घोषणा पूर्णत्वाला नेण्यासाठी सरकार कोठून पैसे आणणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही़ आरोग्य विम्याचे पैसे मिळवण्यासाठी अनेक जण रुग्णालयाची खोटी बिले, रुग्णालयात अ‍ॅडमिट असल्याचे बनावट दाखले सादर करतात़ नव्या आरोग्य विमा योजनेने भ्रष्टाचार वाढण्याची भीती आहे़ त्यामुळे या वर्षीचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असला तरी त्याचे यश प्रत्यक्ष अंमलबजावणीवर अवलंबून आहे़

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्पEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारत