शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

झळाळती कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 2:44 AM

दिनांक २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस म्हणून ओळखला जातो; मात्र यावर्षी विदर्भ रणजी संघासाठी तो सर्वात मोठा दिवस ठरला.

दिनांक २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस म्हणून ओळखला जातो; मात्र यावर्षी विदर्भ रणजी संघासाठी तो सर्वात मोठा दिवस ठरला. काल-परवापर्यंत अगदीच लिंबूटिंबू समजल्या जाणा-या विदर्भ रणजी क्रिकेट संघाने त्या दिवशी रणजी चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून विदर्भातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीची मान ताठ केली. भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू महाराजा रणजितसिंह यांच्या नावाने १९३४ मध्ये सुरू झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात विदर्भाचा संघ फार कमी वेळा आपल्या नावाचा ठसा उमटवू शकला. विदर्भाने रणजी स्पर्धेत पदार्पण केले ते १९५७-५८ च्या हंगामात! तेव्हापासून २००१-०२ मध्ये स्पर्धेचे स्वरूप बदलेपर्यंत, विदर्भाचा संघ मध्य विभागात खेळत असे आणि बहुतांश वेळा विभागीयस्तरावरच त्याचे आव्हान संपुष्टात येत असे. अपवाद फक्त १९७०-७१ आणि १९९५-९६ च्या हंगामाचा! त्या दोन हंगामामध्ये विदर्भ उपउपांत्य फेरीत पोहोचला होता. पुढे २००२-०३ च्या हंगामापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेचे विभागीय स्वरूप संपुष्टात आणले आणि त्याऐवजी १५ आघाडीच्या संघांचा समावेश असलेला ‘एलिट’ गट आणि तळातील संघांचा समावेश असलेला ‘प्लेट’ गट, असे नवे स्वरूप स्पर्धेला दिले. त्यानंतर विदर्भाचा संघ २००२-०३ आणि २०११-१२ मध्ये ‘प्लेट’ गटाच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. एवढीच काय ती विदर्भ रणजी संघाची आजवरची चमकदार कामगिरी! एकूण २५९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये केवळ ४१ विजय, ८९ पराजय आणि १२९ अनिर्णीत सामने ही आकडेवारी, संघाच्या एकंदर कामगिरीवरील बोलके भाष्य आहे. या पृष्ठभूमीवर, कर्नाटकसारख्या आठवेळा विजेता राहिलेल्या संघाला उपांत्य सामन्यात पराभूत करून थेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश, ही कामगिरी एकदम झळाळून उठते! कर्नाटकचा संघ यावर्षी सातत्याने दमदार कामगिरी करीत होता. मोठे सामने खेळण्याचा आणि जिंकण्याचा भरीव अनुभव त्या संघाच्या गाठीशी होता. अशा संघाला नमविणे ही सोपी गोष्ट नव्हती; मात्र विदर्भाच्या युवा क्रिकेटपटूंनी ते करून दाखविले. विदर्भ संघाच्या कामगिरीत झालेल्या या लक्षणीय बदलाचे श्रेय नि:संशयपणे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचे आहे. विदर्भाच्या क्रिकेटपटूंमध्ये गुणवत्ता होतीच; मात्र त्या गुणवत्तेला पैलू पाडण्याचे व संघाला विजयाची सवय लावण्याचे काम पंडित यांनी केले. संघात विजिगीषू भावना निर्माण करण्याचे श्रेय कर्णधार फैज फजललाही द्यावेच लागेल. संघाची कामगिरी अंतिम सामन्यातही अशीच बहरो आणि रणजी चषकावर नाव कोरता येवो, हीच शुभेच्छा!

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडकRanji Trophy 2017रणजी चषक 2017