शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

पूल, रस्ते होताहेत, परंतु लोक आनंदी आहेत काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 20:40 IST

गोव्यात गेल्या २० वर्षात अनेक प्रकल्प उभे झाले; परंतु त्यांचा दर्जा काही योग्य नाही. प्रचंड भ्रष्टाचार घडलाय. त्यामुळे विकास झालाय; परंतु त्याचा दर्जा व लाभ काय, असा प्रश्न नेहमीच विरोधक उपस्थित करतात.

-  राजू नायक

पणजी शहराला जोडणा-या राष्ट्रीय हमरस्ता ६६ वर सध्या पूल व उंची वाढविलेला रस्ता याची कामे वेगाने सुरू आहेत. परिणामी लोकांना खूपच अडचणी सोसाव्या लागतात. दक्षिण गोव्याला जोडणारा कुठ्ठाळी जंक्शनपासूनचा अडीच किमी रस्ता बंद ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याबाबत सध्या जनतेमध्ये तीव्र रोष आहे.

शुक्रवारी राज्याच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होऊन तूर्तास महिनाभर कुठ्ठाळी जंक्शन ते टोयोटा शोरूम हा रस्ता बंद न ठेवण्याचे ठरविण्यात आले. तेथे बगल रस्ता तात्पुरता बांधता येईल का, याची चाचपणी केली जाणार आहे. लोकांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर सरकारलाही उपरती झाली.

दुर्दैवाने पर्वरीतील रहिवासी गेली पाच वर्षे अनेक अडचणी सोसताहेत. तेथे नवीन मांडवी पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रचंड रांगा लागतात. तेथे एक छोटा रस्ता तयार करण्यात आला. तरीही प्रश्न सुटलेला नाही.

सार्वजनिक बांधकाम खात्याबद्दल लोकांमध्ये मोठा रोष आहे. कामाचा दर्जा, दिरंगाई, विषयाचा सखोल अभ्यास न करण्याची प्रवृत्ती व भ्रष्टाचार यामुळे कामाचा दर्जा कोसळतो व लोकांना अडचणींना सामोरे जावे लागते.

नव्या मांडवी पुलाचे कामही वादातून सुरू झाले. हा पूल देशातील एक सुंदर पूल होणार आहे यात शंका नाही. परंतु, त्याचे दोन खांब मांडवी नदीत उभे करताना सरकारने पर्यावरण परिणामांची शक्याशक्यता तपासली नव्हती. परिणामी एक एनजीओ हरित लवादाकडे गेली. तिने सरकारला तपासणी करण्यास भाग पाडले. तपासणी केल्यानंतर काम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी हा अहवाल बनावट असल्याचा एनजीओचा आरोप आहे. त्यामुळे कामाला विलंब लागल्याचे सरकारचे म्हणणो आहे. असे असले तरी पुलाने काही प्रश्न जरूर निर्माण केले आहेत. पूल गोवा सरकार ‘नाबार्ड’कडून ६०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन उभारत असले तरी त्याने पणजी राजधानीची वाहतूक कोंडी सुटणार का, एवढा प्रचंड खर्च करण्याऐवजी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या अत्यावश्यक सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी उपाय का योजले नाहीत, वगैरे प्रश्न आहेत. त्याशिवाय पर्वरीपासून ते वेर्णेपर्यंत संपूर्ण महामार्ग ब-याच उंचावरून जाणार आहे. म्हणजे पर्वरीपासून दक्षिण गोव्याला जोडणारा महामार्ग जवळजवळ पुलावरच उभा असेल. हा खर्च कंत्राटदाराचे भले करण्यासाठीच वाढवून केला असल्याचीही टीका होते.

गोव्यात गेल्या २० वर्षात अनेक प्रकल्प उभे झाले; परंतु त्यांचा दर्जा काही योग्य नाही. प्रचंड भ्रष्टाचार घडलाय. त्यामुळे विकास झालाय; परंतु त्याचा दर्जा व लाभ काय, असा प्रश्न नेहमीच विरोधक उपस्थित करतात. आताही कुठ्ठाळीचा मार्ग बंद न ठेवण्याचे ठरविले असले तरी ते तात्पुरते आहे आणि लोकांना नवीन संकटाला तोंड द्यावे लागणार आहे, यात शंका वाटत नाही!

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :goaगोवा