शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पूल, रस्ते होताहेत, परंतु लोक आनंदी आहेत काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 20:40 IST

गोव्यात गेल्या २० वर्षात अनेक प्रकल्प उभे झाले; परंतु त्यांचा दर्जा काही योग्य नाही. प्रचंड भ्रष्टाचार घडलाय. त्यामुळे विकास झालाय; परंतु त्याचा दर्जा व लाभ काय, असा प्रश्न नेहमीच विरोधक उपस्थित करतात.

-  राजू नायक

पणजी शहराला जोडणा-या राष्ट्रीय हमरस्ता ६६ वर सध्या पूल व उंची वाढविलेला रस्ता याची कामे वेगाने सुरू आहेत. परिणामी लोकांना खूपच अडचणी सोसाव्या लागतात. दक्षिण गोव्याला जोडणारा कुठ्ठाळी जंक्शनपासूनचा अडीच किमी रस्ता बंद ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याबाबत सध्या जनतेमध्ये तीव्र रोष आहे.

शुक्रवारी राज्याच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होऊन तूर्तास महिनाभर कुठ्ठाळी जंक्शन ते टोयोटा शोरूम हा रस्ता बंद न ठेवण्याचे ठरविण्यात आले. तेथे बगल रस्ता तात्पुरता बांधता येईल का, याची चाचपणी केली जाणार आहे. लोकांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर सरकारलाही उपरती झाली.

दुर्दैवाने पर्वरीतील रहिवासी गेली पाच वर्षे अनेक अडचणी सोसताहेत. तेथे नवीन मांडवी पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रचंड रांगा लागतात. तेथे एक छोटा रस्ता तयार करण्यात आला. तरीही प्रश्न सुटलेला नाही.

सार्वजनिक बांधकाम खात्याबद्दल लोकांमध्ये मोठा रोष आहे. कामाचा दर्जा, दिरंगाई, विषयाचा सखोल अभ्यास न करण्याची प्रवृत्ती व भ्रष्टाचार यामुळे कामाचा दर्जा कोसळतो व लोकांना अडचणींना सामोरे जावे लागते.

नव्या मांडवी पुलाचे कामही वादातून सुरू झाले. हा पूल देशातील एक सुंदर पूल होणार आहे यात शंका नाही. परंतु, त्याचे दोन खांब मांडवी नदीत उभे करताना सरकारने पर्यावरण परिणामांची शक्याशक्यता तपासली नव्हती. परिणामी एक एनजीओ हरित लवादाकडे गेली. तिने सरकारला तपासणी करण्यास भाग पाडले. तपासणी केल्यानंतर काम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी हा अहवाल बनावट असल्याचा एनजीओचा आरोप आहे. त्यामुळे कामाला विलंब लागल्याचे सरकारचे म्हणणो आहे. असे असले तरी पुलाने काही प्रश्न जरूर निर्माण केले आहेत. पूल गोवा सरकार ‘नाबार्ड’कडून ६०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन उभारत असले तरी त्याने पणजी राजधानीची वाहतूक कोंडी सुटणार का, एवढा प्रचंड खर्च करण्याऐवजी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या अत्यावश्यक सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी उपाय का योजले नाहीत, वगैरे प्रश्न आहेत. त्याशिवाय पर्वरीपासून ते वेर्णेपर्यंत संपूर्ण महामार्ग ब-याच उंचावरून जाणार आहे. म्हणजे पर्वरीपासून दक्षिण गोव्याला जोडणारा महामार्ग जवळजवळ पुलावरच उभा असेल. हा खर्च कंत्राटदाराचे भले करण्यासाठीच वाढवून केला असल्याचीही टीका होते.

गोव्यात गेल्या २० वर्षात अनेक प्रकल्प उभे झाले; परंतु त्यांचा दर्जा काही योग्य नाही. प्रचंड भ्रष्टाचार घडलाय. त्यामुळे विकास झालाय; परंतु त्याचा दर्जा व लाभ काय, असा प्रश्न नेहमीच विरोधक उपस्थित करतात. आताही कुठ्ठाळीचा मार्ग बंद न ठेवण्याचे ठरविले असले तरी ते तात्पुरते आहे आणि लोकांना नवीन संकटाला तोंड द्यावे लागणार आहे, यात शंका वाटत नाही!

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :goaगोवा