शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जातीवर जाणे!

By admin | Updated: July 20, 2015 22:32 IST

जातव्यवस्था हा देशाच्या समाजव्यवस्थेवरील कलंक आहे आणि तो जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर धुऊन काढला पाहिजे, या विधानाशी असहमती दर्शविणारा

जातव्यवस्था हा देशाच्या समाजव्यवस्थेवरील कलंक आहे आणि तो जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर धुऊन काढला पाहिजे, या विधानाशी असहमती दर्शविणारा एकही पुढारी देशात सापडणार नाही. व्यक्तींची नावे बऱ्याचदा जातनिदर्शक असतात आणि त्यामुळे आडनावेच लावली जाऊ नयेत इथपासून तो शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जातीचा आणि धर्माचाही उल्लेख केला जाऊ नये, इथपर्यंत अनेक सूचना आजवर केल्या गेल्या आहेत. पण जितक्या जोरात जातव्यवस्थेच्या विरोधात प्रचार केला जावा, त्यापेक्षा अधिक वेगाने जातीपातींची मूळे अधिक खोलवर रुजत जावीत हाच वास्तवातला अनुभव आहे. परंतु केवळ तितकेच नव्हे, तर आता जातवादाच्या जोडीलाच पोट जातवादाचे कंगोरेदेखील अधिक टोकदार बनत चालल्याचे दिसून येऊ लागले आहे. या साऱ्याला सर्वसामान्य जनता नव्हे तर देशातील यच्चयावत राजकारणीच कारणीभूत आहेत व त्याचा पुन:प्रत्यय येत्या काही दिवसात होणाऱ्या बिहार विधनसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने येतो आहे. केन्द्र सरकारने अलीकडेच केलेल्या आर्थिक पाहणीच्या दरम्यान लंकलित केलेली जातनिहाय आकडेवारी उघड केली जावी म्हणून भाजपा विरोधक पक्ष जे आंदोलन करु इच्छित आहेत, त्यामागील हेतूदेखील हाच आहे. बिहार राज्याची सामाजिक रचना लक्षात घेता, तिथे सवर्णांच्या तुलनेत मागासवर्गीय व अल्पसंख्य यांचे प्रमाण अधिक असून सर्वाधिक संख्येत आहेत ते, अन्य मागासवर्गीय. त्यामुळेच की काय, देशाच्या पंतप्रधानपदावर एका अन्य मागासवर्गीयाला म्हणजे ओबीसीला विराजमान करण्याचे कार्य सर्वप्रथम भाजपाने केले, असा दावा त्या पक्षाने केला. तो केला गेल्याने कोट्यवधींना नरेन्द्र मोदी यांचे मूळ काय याचा प्रथमच शोध लागला. भाजपाने हा दावा करताक्षणी लालूप्रसाद यादव यांनी त्याचे खंडण केले आणि देवेगौडा हे पहिले ओबीसी पंतप्रधान होते व त्यांना त्या पदावर बसविण्यासाठी आपणच प्रयत्न केले, असे सांगून टाकले. त्याचवेळी भाजपाचे केन्द्रातील एक मंत्री गिरीरीज सिंग यांनी, बिहारात उच्चवर्णीय मुख्यमंत्री होणे केवळ असंभव असल्याचे उद्गार काढले. आता या साऱ्या गोंधळात संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव हेदेखील उतरले असून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ही पदे घटनात्मक असल्याने, ती जातरहित असतात, असे त्यांनी सांगून टाकले. पण प्रत्यक्षात तसे कधीही होत नसते, हे त्यानाही चांगलेच ठाऊक आहे. घटनात्मक पदांवर निवडणुकीच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या व्यक्ती पक्षरहित असतात, हेदेखील घटनात्मक वास्तव असतानाच संबंधितांची वर्तणूक मात्र पक्षभेद करण्याचीच असते. बिहारात आपल्या पक्षाची तर सत्ता यावीच पण मुख्यमंत्रीही आपल्याच म्हणजे अन्य मागास जातीतला असावा, असा आग्रह नितीशकुमार आणि दोन्ही यादवांचा असल्याचे उघड असल्याने शरद यादव यांनी उगाच ताकाला जाऊन भांडे लपविण्यापेक्षा सरळ जातीवर जावे हेच बरे.