शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

‘तेजस्विनी’ला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 01:00 IST

महिला संरक्षण आणि अधिकाराच्या कितीही बाता राजकीय-सामाजिक व्यासपीठावर केल्या जात असल्या तरी सरकारी आणि त्यातच पुरुषी मानसिकता महिलांच्या हक्काबाबत किती संवेदनशील राहिली आहे, याची प्रचिती समाजात घडणाऱ्या घटनांवरून वेळोवेळी आली आहे.

महिला संरक्षण आणि अधिकाराच्या कितीही बाता राजकीय-सामाजिक व्यासपीठावर केल्या जात असल्या तरी सरकारी आणि त्यातच पुरुषी मानसिकता महिलांच्या हक्काबाबत किती संवेदनशील राहिली आहे, याची प्रचिती समाजात घडणाऱ्या घटनांवरून वेळोवेळी आली आहे. महिलांवरील वाढते अत्याचार आणि छेडखानीच्या घटनांना आळा बसावा आणि महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी स्वंतत्र बसेस खरेदीसाठी ९ कोटी २५ लाख रुपयांचा निधी राज्य सरकारच्या वतीने नागपूर महापालिकेला देण्यात आला. महिलांच्या सन्मानाचे प्रतीक असलेले ‘तेजस्विनी’ हे नाव या प्रकल्पाला देण्यात आले. मात्र सरकारने पैसे देऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला असला तरी ‘तेजस्विनी’चा ‘ते’ही महापालिकेत उद्गारला जात नसल्याने महिला सुरक्षिततेच्या बाता करणाºयांविरुद्ध आता संताप व्यक्त केला जात आहे. ज्या प्रयोजनासाठी सरकारने महापालिकेला निधी दिला होता, तो दुसºयाच कामासाठी खर्च करण्यात आल्याने आता प्रयोजन पूर्ण झाले नसल्याने हा निधी सरकार दरबारी परत जाण्याची वेळ आली आहे. यानिमित्ताने देशात ‘बेस्ट इनोव्हेशन सिटी’चा पुरस्कार पटकाविणारी आणि विकासाच्या मार्गावर स्मार्ट वाटचाल करणारी महापालिका आणि तेथील प्रशासन महिलांच्या सुरक्षेसंदर्भात किती गंभीर आहे, हे कटु वास्तव पुढे आले आहे. या बसेस खरेदी करण्याचा अधिकार महापालिकेच्या परिवहन समितीला देण्यात आला होता. एप्रिल २०१७ मध्ये परिवहन समितीने ३२ सीटर ३० रेड बसेस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र परिवहन विभागाच्या उदासीन भूमिकेमुळे फाईल पुढे सरकली नाही. नागपूरच्या विकासासाठी अग्रेसर असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महिलांसाठी पर्यावरणपूरक बस चालविण्याची सूचना केली होती. सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीतून इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचे निर्देशही त्यांनी महापालिका अधिकारी आणि पदाधिकाºयांना दिले होते. यामुळे ३० डिझेल बसऐवजी ६ इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णयही महापालिका प्रशासनाने घेतला होता. मार्चअखेरीस परिवहन विभाग यासंदर्भात सक्रिय झाला होता. मात्र एप्रिल उजाडताच ‘तेजस्विनी’ प्रकल्पाला ब्रेक लागला. गडकरींच्या निर्णयात खोडा टाकत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनीच इलेक्ट्रिक बस खरेदी न करण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. वास्तविक महापालिका कायद्यात स्थायी समितीप्रमाणे परिवहन समितीलाही आर्थिक व प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. परंतु महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व वित्त विभागाच्या मनमानीमुळे अद्याप परिवहन विभागाचे बँकेत खाते उघडण्यात आलेले नाही. यात ‘तेजस्विनी’ प्रकल्प तर फार दूरची बाब आहे. पण आता ‘तेजस्विनी’ प्रकल्पाला ब्रेक लागल्याचे चित्र निर्माण झाल्याने अधिकारी आणि पदाधिकारी एकमेकांकडे बोट दाखवू लागले आहेत. ही निश्चितच अशोभनीय बाब आहे.

टॅग्स :Womenमहिला