शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

‘तेजस्विनी’ला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 01:00 IST

महिला संरक्षण आणि अधिकाराच्या कितीही बाता राजकीय-सामाजिक व्यासपीठावर केल्या जात असल्या तरी सरकारी आणि त्यातच पुरुषी मानसिकता महिलांच्या हक्काबाबत किती संवेदनशील राहिली आहे, याची प्रचिती समाजात घडणाऱ्या घटनांवरून वेळोवेळी आली आहे.

महिला संरक्षण आणि अधिकाराच्या कितीही बाता राजकीय-सामाजिक व्यासपीठावर केल्या जात असल्या तरी सरकारी आणि त्यातच पुरुषी मानसिकता महिलांच्या हक्काबाबत किती संवेदनशील राहिली आहे, याची प्रचिती समाजात घडणाऱ्या घटनांवरून वेळोवेळी आली आहे. महिलांवरील वाढते अत्याचार आणि छेडखानीच्या घटनांना आळा बसावा आणि महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी स्वंतत्र बसेस खरेदीसाठी ९ कोटी २५ लाख रुपयांचा निधी राज्य सरकारच्या वतीने नागपूर महापालिकेला देण्यात आला. महिलांच्या सन्मानाचे प्रतीक असलेले ‘तेजस्विनी’ हे नाव या प्रकल्पाला देण्यात आले. मात्र सरकारने पैसे देऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला असला तरी ‘तेजस्विनी’चा ‘ते’ही महापालिकेत उद्गारला जात नसल्याने महिला सुरक्षिततेच्या बाता करणाºयांविरुद्ध आता संताप व्यक्त केला जात आहे. ज्या प्रयोजनासाठी सरकारने महापालिकेला निधी दिला होता, तो दुसºयाच कामासाठी खर्च करण्यात आल्याने आता प्रयोजन पूर्ण झाले नसल्याने हा निधी सरकार दरबारी परत जाण्याची वेळ आली आहे. यानिमित्ताने देशात ‘बेस्ट इनोव्हेशन सिटी’चा पुरस्कार पटकाविणारी आणि विकासाच्या मार्गावर स्मार्ट वाटचाल करणारी महापालिका आणि तेथील प्रशासन महिलांच्या सुरक्षेसंदर्भात किती गंभीर आहे, हे कटु वास्तव पुढे आले आहे. या बसेस खरेदी करण्याचा अधिकार महापालिकेच्या परिवहन समितीला देण्यात आला होता. एप्रिल २०१७ मध्ये परिवहन समितीने ३२ सीटर ३० रेड बसेस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र परिवहन विभागाच्या उदासीन भूमिकेमुळे फाईल पुढे सरकली नाही. नागपूरच्या विकासासाठी अग्रेसर असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महिलांसाठी पर्यावरणपूरक बस चालविण्याची सूचना केली होती. सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीतून इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचे निर्देशही त्यांनी महापालिका अधिकारी आणि पदाधिकाºयांना दिले होते. यामुळे ३० डिझेल बसऐवजी ६ इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णयही महापालिका प्रशासनाने घेतला होता. मार्चअखेरीस परिवहन विभाग यासंदर्भात सक्रिय झाला होता. मात्र एप्रिल उजाडताच ‘तेजस्विनी’ प्रकल्पाला ब्रेक लागला. गडकरींच्या निर्णयात खोडा टाकत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनीच इलेक्ट्रिक बस खरेदी न करण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. वास्तविक महापालिका कायद्यात स्थायी समितीप्रमाणे परिवहन समितीलाही आर्थिक व प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. परंतु महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व वित्त विभागाच्या मनमानीमुळे अद्याप परिवहन विभागाचे बँकेत खाते उघडण्यात आलेले नाही. यात ‘तेजस्विनी’ प्रकल्प तर फार दूरची बाब आहे. पण आता ‘तेजस्विनी’ प्रकल्पाला ब्रेक लागल्याचे चित्र निर्माण झाल्याने अधिकारी आणि पदाधिकारी एकमेकांकडे बोट दाखवू लागले आहेत. ही निश्चितच अशोभनीय बाब आहे.

टॅग्स :Womenमहिला