शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात भाजपाची अवस्था बिकट, पण 'मध्यावधी' कुणालाच नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 16:49 IST

गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनारोग्याचा परिणाम जसा सरकारवर झालाय तसा तो भाजपावरही झाला आहे. लोकांमध्ये असंतोष आहे.

- राजू नायक

गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनारोग्याचा परिणाम जसा सरकारवर झालाय तसा तो भाजपावरही झाला आहे. लोकांमध्ये असंतोष आहे. लोक या पक्षाला व सत्तेत भागीदार असलेल्या पक्षांनाही अद्दल घडविण्याची भाषा बोलताहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाची काही खैर नाही, तसेच लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुका झाल्या तर या पक्षाची संख्या १४ वरुन एक आकडी संख्येवर येईल.

गेले सहा महिने मुख्यमंत्री आजारी आहेत. मधला बराच काळ ते गोव्याबाहेर होते. या काळात मंत्रिमंडळाच्या बैठकाही झालेल्या नाहीत आणि विधानसभा अधिवेशनही आटोपते घ्यावे लागले. राज्यात खाणी बंद आहेत. रोजगाराचा प्रश्न तीव्र बनला आहे. सरकारच आजारी असल्यासारखी परिस्थिती आहे. कारण दोन मंत्री इस्पितळातच बराच काळ होते. त्यानंतर आठवडाभरापूर्वी फ्रान्सिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर यांना डच्चू देऊन नवे मंत्री घेतले आहेत. परंतु मंत्रिमंडळ बैठक घेतली जात नाही. मुख्यमंत्री दिल्लीत २६ खाती घेऊन बसले आहेत. त्यांचे पुनर्वाटप होत नाही आणि योजनांना अर्थिक मंजुरी मिळत नसल्याने कामे ठप्प झाली आहेत.

या पार्श्वभूमीवर दर आठवड्याला मंत्रिमंडळाची अनौपचारिक बैठक व्हावी असे सुचविण्यात आले होते. परंतु बुधवारी बैठकीस चार मंत्री अनुपस्थित राहिल्याने बैठक बारगळली. त्यामुळे मंत्रिमंडळातील बरेच सदस्य नाराज  झाले. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांनी या नाराजीवर आपला पक्ष विधानसभा निवडणुकीला तयार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या मते लोकसभेबरोबर निवडणुका घेतल्या गेल्यास त्यांच्या पक्षाला कसलाही धोका असणार नाही. एक गोष्ट खरी आहे की, मगोपची सदस्य संख्या २०१७ च्या निवडणुकीत केवळ तीनवर आली आहे. ती त्याच्या खाली येणार काय, असे विचारले जाते. परंतु या पक्षाचे दोन मंत्री - बाबू आजगावकर व दिपक पाऊसकर हे मगोपात फारसे खुश नाहीत. दोघांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांची सत्ता असेल तेथे जाण्याचा सल्ला यापूर्वीच दिला आहे.

गोवा फॉरवर्ड या पक्षासमोर अस्तित्वाचे संकट आहे. हा पक्ष काँग्रेसने ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसल्यामुळे स्वतंत्रपणे लढला व त्यांचे पहिल्यांदाच तीन सदस्य जिंकून आले. या काळात भाजपाला साथ दिल्यामुळे त्यांचा पारंपरिक ख्रिस्ती मतदार खवळला व तो पक्षाला धडा शिकविण्याची भाषा बोलतोय. परंतु या पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी याकाळात एक नविनच रणनीती आखून मनोहर पर्रीकर यांच्या निकट जाणे पसंत केले. या पक्षाला लागलीच निवडणूक नको असली तरी तो काँग्रेसला नामोहरम करणारी नवी चाल खेळण्याची शक्यता आहे. मधल्या काळात काँग्रेसने गोवा फॉरवर्ड वगळता मगोपला आपल्या बाजूने वळविण्याचे बरेच प्रयत्न केले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा पदरात पाडण्याचे शर्थीचे प्रयत्न काँग्रेसने चालविले आहेत. परंतु त्यांना फळ येत नाही. काँग्रेसने 'एकाला चलो' नीती स्वीकारली तर ती जोखीमच असेल. या पार्श्वभूमीवर गोव्यात कोणालाच निवडणूक नको आहे. सारे पक्ष लोकसभा निवडणुकीची वाट पाहत आहेत आणि त्यातल्या त्यात राजस्थान निवडणुकीचा निकाल काय लागतो यावरून ते राज्यात निवडणुकीचे आडाखे बांधणे चालू करणार आहेत. भाजपा निवडणुकीला सामोरी गेली तर चौदापैकी चारजण तरी जिंकून येतील का, हा प्रश्न आहे आणि मगोपाचे सुदीन ढवळीकर वगळता इतर दोघे निवडून येणे कठीण आहे. गोवा फॉरवर्डचे भवितव्य अनिश्चित आहे पण काँग्रेसचा प्रश्न आहे, तो या पक्षात नेत्यांची संख्या जास्त व कार्यकर्त्यांचा अभाव आहे. प्रत्येकाला मुख्यमंत्री बनायचे आहे. काँग्रेस सहज सत्तेवर येईल असे वातावरण बनले तर नेते एकमेकांविरुद्ध कुरघोडी करण्याचीच शक्यता अधिक आहे. २०१७ मध्ये असेच घडून नेत्यांचा अहंकार व आत्मकेंद्रीपणा पक्षाला नडला होता. याचा अंदाज पक्षश्रेष्ठीना असल्याने मध्यावधी निवडणुकीचा आग्रह त्यांनी सोडून दिला आहे.

(लेखक गोवा लोकमतचे संपादक आहेत.)

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूकManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा