शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

गोव्यात भाजपाची अवस्था बिकट, पण 'मध्यावधी' कुणालाच नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 16:49 IST

गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनारोग्याचा परिणाम जसा सरकारवर झालाय तसा तो भाजपावरही झाला आहे. लोकांमध्ये असंतोष आहे.

- राजू नायक

गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनारोग्याचा परिणाम जसा सरकारवर झालाय तसा तो भाजपावरही झाला आहे. लोकांमध्ये असंतोष आहे. लोक या पक्षाला व सत्तेत भागीदार असलेल्या पक्षांनाही अद्दल घडविण्याची भाषा बोलताहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाची काही खैर नाही, तसेच लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुका झाल्या तर या पक्षाची संख्या १४ वरुन एक आकडी संख्येवर येईल.

गेले सहा महिने मुख्यमंत्री आजारी आहेत. मधला बराच काळ ते गोव्याबाहेर होते. या काळात मंत्रिमंडळाच्या बैठकाही झालेल्या नाहीत आणि विधानसभा अधिवेशनही आटोपते घ्यावे लागले. राज्यात खाणी बंद आहेत. रोजगाराचा प्रश्न तीव्र बनला आहे. सरकारच आजारी असल्यासारखी परिस्थिती आहे. कारण दोन मंत्री इस्पितळातच बराच काळ होते. त्यानंतर आठवडाभरापूर्वी फ्रान्सिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर यांना डच्चू देऊन नवे मंत्री घेतले आहेत. परंतु मंत्रिमंडळ बैठक घेतली जात नाही. मुख्यमंत्री दिल्लीत २६ खाती घेऊन बसले आहेत. त्यांचे पुनर्वाटप होत नाही आणि योजनांना अर्थिक मंजुरी मिळत नसल्याने कामे ठप्प झाली आहेत.

या पार्श्वभूमीवर दर आठवड्याला मंत्रिमंडळाची अनौपचारिक बैठक व्हावी असे सुचविण्यात आले होते. परंतु बुधवारी बैठकीस चार मंत्री अनुपस्थित राहिल्याने बैठक बारगळली. त्यामुळे मंत्रिमंडळातील बरेच सदस्य नाराज  झाले. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांनी या नाराजीवर आपला पक्ष विधानसभा निवडणुकीला तयार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या मते लोकसभेबरोबर निवडणुका घेतल्या गेल्यास त्यांच्या पक्षाला कसलाही धोका असणार नाही. एक गोष्ट खरी आहे की, मगोपची सदस्य संख्या २०१७ च्या निवडणुकीत केवळ तीनवर आली आहे. ती त्याच्या खाली येणार काय, असे विचारले जाते. परंतु या पक्षाचे दोन मंत्री - बाबू आजगावकर व दिपक पाऊसकर हे मगोपात फारसे खुश नाहीत. दोघांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांची सत्ता असेल तेथे जाण्याचा सल्ला यापूर्वीच दिला आहे.

गोवा फॉरवर्ड या पक्षासमोर अस्तित्वाचे संकट आहे. हा पक्ष काँग्रेसने ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसल्यामुळे स्वतंत्रपणे लढला व त्यांचे पहिल्यांदाच तीन सदस्य जिंकून आले. या काळात भाजपाला साथ दिल्यामुळे त्यांचा पारंपरिक ख्रिस्ती मतदार खवळला व तो पक्षाला धडा शिकविण्याची भाषा बोलतोय. परंतु या पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी याकाळात एक नविनच रणनीती आखून मनोहर पर्रीकर यांच्या निकट जाणे पसंत केले. या पक्षाला लागलीच निवडणूक नको असली तरी तो काँग्रेसला नामोहरम करणारी नवी चाल खेळण्याची शक्यता आहे. मधल्या काळात काँग्रेसने गोवा फॉरवर्ड वगळता मगोपला आपल्या बाजूने वळविण्याचे बरेच प्रयत्न केले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा पदरात पाडण्याचे शर्थीचे प्रयत्न काँग्रेसने चालविले आहेत. परंतु त्यांना फळ येत नाही. काँग्रेसने 'एकाला चलो' नीती स्वीकारली तर ती जोखीमच असेल. या पार्श्वभूमीवर गोव्यात कोणालाच निवडणूक नको आहे. सारे पक्ष लोकसभा निवडणुकीची वाट पाहत आहेत आणि त्यातल्या त्यात राजस्थान निवडणुकीचा निकाल काय लागतो यावरून ते राज्यात निवडणुकीचे आडाखे बांधणे चालू करणार आहेत. भाजपा निवडणुकीला सामोरी गेली तर चौदापैकी चारजण तरी जिंकून येतील का, हा प्रश्न आहे आणि मगोपाचे सुदीन ढवळीकर वगळता इतर दोघे निवडून येणे कठीण आहे. गोवा फॉरवर्डचे भवितव्य अनिश्चित आहे पण काँग्रेसचा प्रश्न आहे, तो या पक्षात नेत्यांची संख्या जास्त व कार्यकर्त्यांचा अभाव आहे. प्रत्येकाला मुख्यमंत्री बनायचे आहे. काँग्रेस सहज सत्तेवर येईल असे वातावरण बनले तर नेते एकमेकांविरुद्ध कुरघोडी करण्याचीच शक्यता अधिक आहे. २०१७ मध्ये असेच घडून नेत्यांचा अहंकार व आत्मकेंद्रीपणा पक्षाला नडला होता. याचा अंदाज पक्षश्रेष्ठीना असल्याने मध्यावधी निवडणुकीचा आग्रह त्यांनी सोडून दिला आहे.

(लेखक गोवा लोकमतचे संपादक आहेत.)

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूकManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा