शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

गोव्यात भाजपाची अवस्था बिकट, पण 'मध्यावधी' कुणालाच नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 16:49 IST

गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनारोग्याचा परिणाम जसा सरकारवर झालाय तसा तो भाजपावरही झाला आहे. लोकांमध्ये असंतोष आहे.

- राजू नायक

गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनारोग्याचा परिणाम जसा सरकारवर झालाय तसा तो भाजपावरही झाला आहे. लोकांमध्ये असंतोष आहे. लोक या पक्षाला व सत्तेत भागीदार असलेल्या पक्षांनाही अद्दल घडविण्याची भाषा बोलताहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाची काही खैर नाही, तसेच लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुका झाल्या तर या पक्षाची संख्या १४ वरुन एक आकडी संख्येवर येईल.

गेले सहा महिने मुख्यमंत्री आजारी आहेत. मधला बराच काळ ते गोव्याबाहेर होते. या काळात मंत्रिमंडळाच्या बैठकाही झालेल्या नाहीत आणि विधानसभा अधिवेशनही आटोपते घ्यावे लागले. राज्यात खाणी बंद आहेत. रोजगाराचा प्रश्न तीव्र बनला आहे. सरकारच आजारी असल्यासारखी परिस्थिती आहे. कारण दोन मंत्री इस्पितळातच बराच काळ होते. त्यानंतर आठवडाभरापूर्वी फ्रान्सिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर यांना डच्चू देऊन नवे मंत्री घेतले आहेत. परंतु मंत्रिमंडळ बैठक घेतली जात नाही. मुख्यमंत्री दिल्लीत २६ खाती घेऊन बसले आहेत. त्यांचे पुनर्वाटप होत नाही आणि योजनांना अर्थिक मंजुरी मिळत नसल्याने कामे ठप्प झाली आहेत.

या पार्श्वभूमीवर दर आठवड्याला मंत्रिमंडळाची अनौपचारिक बैठक व्हावी असे सुचविण्यात आले होते. परंतु बुधवारी बैठकीस चार मंत्री अनुपस्थित राहिल्याने बैठक बारगळली. त्यामुळे मंत्रिमंडळातील बरेच सदस्य नाराज  झाले. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांनी या नाराजीवर आपला पक्ष विधानसभा निवडणुकीला तयार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या मते लोकसभेबरोबर निवडणुका घेतल्या गेल्यास त्यांच्या पक्षाला कसलाही धोका असणार नाही. एक गोष्ट खरी आहे की, मगोपची सदस्य संख्या २०१७ च्या निवडणुकीत केवळ तीनवर आली आहे. ती त्याच्या खाली येणार काय, असे विचारले जाते. परंतु या पक्षाचे दोन मंत्री - बाबू आजगावकर व दिपक पाऊसकर हे मगोपात फारसे खुश नाहीत. दोघांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांची सत्ता असेल तेथे जाण्याचा सल्ला यापूर्वीच दिला आहे.

गोवा फॉरवर्ड या पक्षासमोर अस्तित्वाचे संकट आहे. हा पक्ष काँग्रेसने ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसल्यामुळे स्वतंत्रपणे लढला व त्यांचे पहिल्यांदाच तीन सदस्य जिंकून आले. या काळात भाजपाला साथ दिल्यामुळे त्यांचा पारंपरिक ख्रिस्ती मतदार खवळला व तो पक्षाला धडा शिकविण्याची भाषा बोलतोय. परंतु या पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी याकाळात एक नविनच रणनीती आखून मनोहर पर्रीकर यांच्या निकट जाणे पसंत केले. या पक्षाला लागलीच निवडणूक नको असली तरी तो काँग्रेसला नामोहरम करणारी नवी चाल खेळण्याची शक्यता आहे. मधल्या काळात काँग्रेसने गोवा फॉरवर्ड वगळता मगोपला आपल्या बाजूने वळविण्याचे बरेच प्रयत्न केले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा पदरात पाडण्याचे शर्थीचे प्रयत्न काँग्रेसने चालविले आहेत. परंतु त्यांना फळ येत नाही. काँग्रेसने 'एकाला चलो' नीती स्वीकारली तर ती जोखीमच असेल. या पार्श्वभूमीवर गोव्यात कोणालाच निवडणूक नको आहे. सारे पक्ष लोकसभा निवडणुकीची वाट पाहत आहेत आणि त्यातल्या त्यात राजस्थान निवडणुकीचा निकाल काय लागतो यावरून ते राज्यात निवडणुकीचे आडाखे बांधणे चालू करणार आहेत. भाजपा निवडणुकीला सामोरी गेली तर चौदापैकी चारजण तरी जिंकून येतील का, हा प्रश्न आहे आणि मगोपाचे सुदीन ढवळीकर वगळता इतर दोघे निवडून येणे कठीण आहे. गोवा फॉरवर्डचे भवितव्य अनिश्चित आहे पण काँग्रेसचा प्रश्न आहे, तो या पक्षात नेत्यांची संख्या जास्त व कार्यकर्त्यांचा अभाव आहे. प्रत्येकाला मुख्यमंत्री बनायचे आहे. काँग्रेस सहज सत्तेवर येईल असे वातावरण बनले तर नेते एकमेकांविरुद्ध कुरघोडी करण्याचीच शक्यता अधिक आहे. २०१७ मध्ये असेच घडून नेत्यांचा अहंकार व आत्मकेंद्रीपणा पक्षाला नडला होता. याचा अंदाज पक्षश्रेष्ठीना असल्याने मध्यावधी निवडणुकीचा आग्रह त्यांनी सोडून दिला आहे.

(लेखक गोवा लोकमतचे संपादक आहेत.)

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूकManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा