शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेने भाजपा चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:13 IST

राहुल गांधी यांचा मेकओव्हर ज्या पद्धतीने झाला आहे आणि सार्वजनिक सभांमधून ते ज्या त-हेने लोकांशी संवाद साधत आहेत, त्या त्यांच्या संवाद कौशल्यामुळे त्यांच्या पक्षातील लोक तसेच त्यांचे टीकाकार चकित झाले आहेत.

- हरीश गुप्ताराहुल गांधी यांचा मेकओव्हर ज्या पद्धतीने झाला आहे आणि सार्वजनिक सभांमधून ते ज्या त-हेने लोकांशी संवाद साधत आहेत, त्या त्यांच्या संवाद कौशल्यामुळे त्यांच्या पक्षातील लोक तसेच त्यांचे टीकाकार चकित झाले आहेत. नुकतीच भाजपाच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीत स्वत: मोदी, अमित शहा, अरुण जेटली, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी विद्यमान राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. त्यात ‘पप्पू बोलना सिख गया है’ अशात-हेने राहुल गांधींवर खुसखुशीत शब्दात मल्लिनाथी करण्यात आली. पण त्यापेक्षा आणखी गंभीर विषयावर बैठकीत चर्चा झाली तो विषय होता सोशल मीडियावर राहुल गांधींना मिळणा-या प्रतिसादाचा, त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाच्या काही मंत्र्यांनी रशिया, कझाकीस्तान आणि इंडोनेशियातील बनावट अकाऊंटसचा उल्लेख करून त्याचा राहुल गांधींशी संबंध जोडला. राहुल गांधी हे लोकसंपर्क करू लागले आहेत म्हणून काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अलीकडे अमेठीहून परत येताना खासगी वाहनातून जाण्याऐवजी त्यांनी फेरीबोटीतून लोकांसोबत जाणे पसंत केले. इतकेच नव्हे तर प्रवाशांसोबत सेल्फी काढून घेण्याचीही परवानगी देऊन त्यांनी लोकांची मने जिंकून घेतली!संकटमोचक स्वत: संकटातदिनेश्वर शर्मा हे ट्रबलशूटर (संकटमोचक) म्हणून काश्मिरात दाखल झाले आहेत. पण तेथे तेच संकटात सापडले आहेत. कारण हुरियत कॉन्फरन्सचे काही नेते वगळता बरेचसे नेते काळा पैसा पांढरा करण्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. राष्टÑीय तपास संस्थेने हुरियतचे चेअरमन सय्यद अली शाह गिलानी यांच्या जावयाला अटक केली आहे. शब्बीर शाह, जहूर वटाली, फारुख अहमद दार, अब्दुल रशीद, यासीन मलिक, मीरवैज उमेद फारुख आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसी हिसक्याला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सध्या तरी राजकीय पक्षांशिवाय अन्य कुणासोबत चर्चा करणे दिनेश्वर शर्मा यांना शक्य झालेले नाही. काश्मिरातील १५ कट्टरपंथीयांच्या गटाचे नेतृत्व करणारी हुरियत चर्चा करण्यास उत्सुक नाही. त्यामुळे राष्टÑीय तपास संस्थेने चार्जशीट दाखल करण्याचे काम थांबवावे, असे शर्मा यांना वाटते. पण तसे केल्यास आपल्यावर टीका होईल या भीतीने ती संस्था आरोप दाखल करण्याचे काम थांबवायला तयार नाही. प्रत्यक्ष काय घडते, ते बघायचे!सीबीआयमध्ये जुगलबंदी!राकेश अस्थाना यांना विशेष संचालक म्हणून बढती मिळाल्यामुळे सीबीआयमध्ये असंतोष उफाळला आहे. अस्थाना हे सुरत शहराचे पोलीस आयुक्त असताना स्टर्र्लिंग बायोटेकच्या २०११ मध्ये सापडलेल्या डायºयांमध्ये त्यांचे नाव झळकले होते. या डायºया बरीच वर्षे दाबून ठेवण्यात आल्या होत्या. पण आयकर विभागाला त्याचा सुगावा लागल्याने अंमलबजावणी संचालनालय कामाला लागली. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्याकडे हे प्रकरण पाठविण्यात आले. अस्थाना यांचा पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क असल्याने, ते वर्मा यांच्याशी बोलत नव्हते. पण वर्मा यांची नेमणूकही मोदींनीच केली होती. अस्थाना यांच्या विरुद्धचा अहवाल हातात आल्यावर वर्मा यांनी अस्थाना यांच्या बढतीला विरोध केला तरीही सरकारने ही बढती केलीच. आता आपल्याविरुद्धचा अहवाल वर्मा यांनी मीडियाला दिला, असा आरोप अस्थाना करीत आहेत. पण वर्मा आणि अस्थाना या दोघांच्या नेमणुका मोदींनी केलेल्या असल्यामुळे सर्वांचे हात बांधले गेले आहेत, एवढे मात्र खरे!या गडकरींना कोण थांबविणार?गडकरी हे दिल्लीतील मीडियाला खाद्य पुरवीत असतात. त्यांनी दिवाळीपूर्व पार्टीसाठी मीडियाला आपल्या बंगल्यावर निमंत्रित केल्यामुळे मीडिया खुशीत होती. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना गडकरींनी उत्तरे देत कुणालाच निराश केले नाही. ते रस्ता बांधणीविषयी कमी आणि हवाई वाहतुकीविषयी जास्त बोलत होते. कारण एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी नेमलेल्या समितीत त्यांचाही समावेश आहे. गडकरी यांची त्याविषयी स्वत:ची मते आहेत. हवाई वाहतुकीत उदारीकरण आणण्याबाबत निर्णय न घेतल्याने विजय मल्ल्या यांना त्याची किंमत चुकवावी लागली, असे गडकरींना वाटते. रस्ता बांधणीचे काम मार्गाला लागले असल्याने गडकरींनी आपले लक्ष जलसिंचनाकडे वळवले आहे. १.८० कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याची त्यांची योजना आहे. आंतरराज्यीय पाणीतंटे निकालात काढण्याचाही त्यांचा विचार आहे. महाराष्टÑ व गुजरातमधील पाण्याचा वाद त्यांनी मिटवला आहे. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश यांच्यातील जलविवाद मिटविण्यासाठी त्यांनी स्वत: अनेक बैठकी घेतल्या. पण पंजाब व हरियाणा यांच्यातील जलविवाद आपल्याला मिटवता आला नसल्याने आपण पंतप्रधानांना त्यात लक्ष घालायला सांगितले आहे, असेही गडकरी म्हणाले.(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी