शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बिरबलाची खिचडी अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 04:38 IST

परवा आम्ही बारामतीला येऊन गेलो. सध्याच्या राजकीय हवामानावर आपला अंदाज जाणून घेण्याची इच्छा होती; पण आपण अचानक दिल्लीला गेल्याचे कळले. आम्ही हिरमुसलो नाही. उलट आम्हाला आनंदच झाला.

- नंदकिशोर पाटीलआदरणीय साहेब, साष्टांग नमस्कार.परवा आम्ही बारामतीला येऊन गेलो. सध्याच्या राजकीय हवामानावर आपला अंदाज जाणून घेण्याची इच्छा होती; पण आपण अचानक दिल्लीला गेल्याचे कळले. आम्ही हिरमुसलो नाही. उलट आम्हाला आनंदच झाला. कारण आपण असे अचानक दिल्लीला जाता तेव्हा आमच्यासारख्या अनेकांच्या आशा पल्लवीत होतात. साहेब, मराठी माणसाला दिल्ली मानवत नाही, असे म्हणतात. पण आपणास ती चांगलीच मानवलेली दिसते. दिल्लीतील आपली ‘ऊठबस’ ही आता नॅशनल न्यूज होऊ लागली आहे. आजवर आपण सेव्हन रेसकोर्सवरचे अनेक उंबरठे झिजवले असतील. पण आता दिल्लीतील अनेक रस्ते आपल्या बंगल्यापाशी येऊन थांबतात. कालाय् तस्मे नम:!साहेब, आजवर अनेकांना आपण बोट धरून राजकारणात आणले. काहींनी त्याची जाणीव ठेवली. काहीजण विसरले. पण आपण त्यांना कधीच विसरत नाहीत. हा आपला मोठेपणा. तसा तुमचा गोतावळा खूप मोठा. साहित्य, संगीत, नाट्य, क्रीडा, शिक्षण, कृषी, उद्योग अशा नानाविध क्षेत्रात आपले चाहते आहेत. या सगळ्यांसाठी तुम्ही वेळ कसा काढता?साहेब, भारतीय हवामान खाते आपल्या प्रभावाखाली आहे, असे आमचे ठाम मत बनले आहे. आपल्या धोरणांचा, विचारांचा आणि कृतीचा जसा अंदाज लागत नाही, तसा हवामान खात्याचाही लागत नाही. यंदा पाऊसकाळ चांगला असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. त्यानुसार आम्ही पेरणीची तयारी केली. पण चाड्यावर मूठ धरताच ढगांनी दगा दिला आणि पाऊस गायब झाला. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात मान्सून संपल्याची घोषणा झाली तरी जानेवारीपर्यंत पाणी पडत होते! हल्ली आपलाही अंदाज लागेनासा झाला आहे. काल परवापर्यंत तुम्हीच विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतलेला. आपले स्वयंघोषित शिष्यमोत्तम मोदींजीवर तमाम जनता नाराज असल्याचे आपण वारंवार सांगितलेत. नोटाबंदीमुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांचे कंबरडे मोडले, हिंदुत्ववादी शक्तींमुळे देशात जातीय तणाव वाढू लागला असून लोकशाही धोक्यात आल्याचे आपण सांगत आला आहात. आपल्या पक्षाच्या वर्धापनदिनी बोलताना आपण देशात राजकीय परिवर्तनाची लाट असल्याचे विधान केले होते. ते ऐकून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते ‘कामाला’ लागले होते. राष्टÑीय पातळीवरदेखील विरोधकांची जमवाजमव होऊ लागली होती. कुमारस्वामींच्या शपथविधीला राज्यपातळीवरील ‘राष्टÑीय’ नेत्यांचा हात उंचावलेला फोटो वर्तमानपत्रात पाहून आमची छाती रुंदावली होती. त्या फोटोत आम्हाला उद्याच्या भविष्याचे सुचिन्ह दिसू लागले होते. ‘अब दिल्ली दूर नही’ असे वाटून आम्ही मनोमन खूप आनंदून गेलो होतो. वातावरण देशभर तापलेले असताना आपण परवा केलेल्या एका विधानाने आम्ही पार बुचकळ्यात पडलो. ‘विरोधकांची एकजूट म्हणजे बिरबलाची खिचडी. कितपत पकेल माहीत नाही’ असे आपण म्हणालात यावर आमचा विश्वास बसत नाही. मीडियाने ‘ध’ चा ‘मा’ केला की, आपणच खडा टाकून पाहिलात?खरं काय ते सांगून टाका बरं.उत्तराच्या प्रतीक्षेत...(तिरकस)

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार