शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

बिरबलाची खिचडी अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 04:38 IST

परवा आम्ही बारामतीला येऊन गेलो. सध्याच्या राजकीय हवामानावर आपला अंदाज जाणून घेण्याची इच्छा होती; पण आपण अचानक दिल्लीला गेल्याचे कळले. आम्ही हिरमुसलो नाही. उलट आम्हाला आनंदच झाला.

- नंदकिशोर पाटीलआदरणीय साहेब, साष्टांग नमस्कार.परवा आम्ही बारामतीला येऊन गेलो. सध्याच्या राजकीय हवामानावर आपला अंदाज जाणून घेण्याची इच्छा होती; पण आपण अचानक दिल्लीला गेल्याचे कळले. आम्ही हिरमुसलो नाही. उलट आम्हाला आनंदच झाला. कारण आपण असे अचानक दिल्लीला जाता तेव्हा आमच्यासारख्या अनेकांच्या आशा पल्लवीत होतात. साहेब, मराठी माणसाला दिल्ली मानवत नाही, असे म्हणतात. पण आपणास ती चांगलीच मानवलेली दिसते. दिल्लीतील आपली ‘ऊठबस’ ही आता नॅशनल न्यूज होऊ लागली आहे. आजवर आपण सेव्हन रेसकोर्सवरचे अनेक उंबरठे झिजवले असतील. पण आता दिल्लीतील अनेक रस्ते आपल्या बंगल्यापाशी येऊन थांबतात. कालाय् तस्मे नम:!साहेब, आजवर अनेकांना आपण बोट धरून राजकारणात आणले. काहींनी त्याची जाणीव ठेवली. काहीजण विसरले. पण आपण त्यांना कधीच विसरत नाहीत. हा आपला मोठेपणा. तसा तुमचा गोतावळा खूप मोठा. साहित्य, संगीत, नाट्य, क्रीडा, शिक्षण, कृषी, उद्योग अशा नानाविध क्षेत्रात आपले चाहते आहेत. या सगळ्यांसाठी तुम्ही वेळ कसा काढता?साहेब, भारतीय हवामान खाते आपल्या प्रभावाखाली आहे, असे आमचे ठाम मत बनले आहे. आपल्या धोरणांचा, विचारांचा आणि कृतीचा जसा अंदाज लागत नाही, तसा हवामान खात्याचाही लागत नाही. यंदा पाऊसकाळ चांगला असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. त्यानुसार आम्ही पेरणीची तयारी केली. पण चाड्यावर मूठ धरताच ढगांनी दगा दिला आणि पाऊस गायब झाला. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात मान्सून संपल्याची घोषणा झाली तरी जानेवारीपर्यंत पाणी पडत होते! हल्ली आपलाही अंदाज लागेनासा झाला आहे. काल परवापर्यंत तुम्हीच विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतलेला. आपले स्वयंघोषित शिष्यमोत्तम मोदींजीवर तमाम जनता नाराज असल्याचे आपण वारंवार सांगितलेत. नोटाबंदीमुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांचे कंबरडे मोडले, हिंदुत्ववादी शक्तींमुळे देशात जातीय तणाव वाढू लागला असून लोकशाही धोक्यात आल्याचे आपण सांगत आला आहात. आपल्या पक्षाच्या वर्धापनदिनी बोलताना आपण देशात राजकीय परिवर्तनाची लाट असल्याचे विधान केले होते. ते ऐकून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते ‘कामाला’ लागले होते. राष्टÑीय पातळीवरदेखील विरोधकांची जमवाजमव होऊ लागली होती. कुमारस्वामींच्या शपथविधीला राज्यपातळीवरील ‘राष्टÑीय’ नेत्यांचा हात उंचावलेला फोटो वर्तमानपत्रात पाहून आमची छाती रुंदावली होती. त्या फोटोत आम्हाला उद्याच्या भविष्याचे सुचिन्ह दिसू लागले होते. ‘अब दिल्ली दूर नही’ असे वाटून आम्ही मनोमन खूप आनंदून गेलो होतो. वातावरण देशभर तापलेले असताना आपण परवा केलेल्या एका विधानाने आम्ही पार बुचकळ्यात पडलो. ‘विरोधकांची एकजूट म्हणजे बिरबलाची खिचडी. कितपत पकेल माहीत नाही’ असे आपण म्हणालात यावर आमचा विश्वास बसत नाही. मीडियाने ‘ध’ चा ‘मा’ केला की, आपणच खडा टाकून पाहिलात?खरं काय ते सांगून टाका बरं.उत्तराच्या प्रतीक्षेत...(तिरकस)

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार