शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये भाजपची धडधड वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 03:59 IST

Bihar Assembly Election 2020 News : आधीच नितीश यांच्या संगतीच्या परिणामाची धास्ती; त्यात बडे नेते कोरोनाग्रस्त

-  हरीश गुप्ता(नॅशनल एडिटर लोकमत, नवी दिल्ली)मोदींचे महिमामंडीत व्यक्तिमत्त्व, त्यांची जबरदस्त लोकप्रियता याला   जराही धक्का लागलेला नसताना भारतीय जनता पक्षासाठी मात्र बिहारमध्ये अत्यंत चिंतेची स्थिती आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीची कडवी, ध्रुवीकरण झालेली झुंज दुसऱ्या चरणात प्रवेश करत आहे.  महत्त्वाचा भागीदार असलेल्या नितीशकुमार यांच्या लोकप्रियतेचा आलेख घसरणीला लागल्याने भाजपचे धुरीण गडबडून गेलेले आहेत. कोरोनाच्या महामारीचा संसर्ग आणि त्यापायी निर्माण झालेला राज्यात परतलेल्या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न हाताळण्यात आलेले अपयश नितीश यांना महागात पडेल असे दिसते आहे. बिहारमध्ये एनडीएला हार पत्करावी लागली तर  आगामी काळात भाजपसाठी तो मोठा धक्का असेल.  नितीश यांच्या लोकप्रियतेचा आलेख घसरतो आहे, हे भाजपला माहिती नव्हते, असे नव्हे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुरेशी स्पष्ट झालीच होती. मोदी  लाटेवर स्वार होऊन विजयाची शक्यता दिसताच  भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली होती. या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष नड्डा  आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात जून-जुलैत खलबतांच्या दोन फेऱ्या झाल्या होत्या. नितीश यांना बाजूला करून निवडणुकीत उतरणे हानिकारक ठरेल, तसे झाल्यास नितीश कुमार राजद, कॉंग्रेसबरोबर जातील हे ओळखून अखेरीस संयुक्त जनता दलाबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. नितीश याना  ‘अ‍ँटी इनकम्बन्सी’ त्रासाची होईल हे ओळखून लोजपाच्या  चिराग पासवान यांचा बफर झोन तयार करण्यात आला. जी एरवी कॉंग्रेस-डाव्या आघाडीला गेली असती अशी  नितीशविरोधी मते लोजपा खाईल  असा हिशेब त्यामागे होता. पण प्रचारात रंग भरू लागल्यावर जदयु मागे पडते आहे हे प्रकर्षाने लक्षात आले.दुसरे म्हणजे कोरोनाने भाजपच्या बड्या नेत्यांना नामोहरम केले आहे. देवेंद्र फडणवीस, सुशील मोदी, मंगल पांडे, राजीव प्रताप रुडी,  शहानवाझ हुसेन इतक्या आघाडीच्या नेत्यांना ऐन कसोटीच्या काळात कोरोनाने गाठले. अमित शहाही  सध्या पडद्याआडच आहेत. भाजपाची अडचणमे २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्याने भाजपला स्वर्ग ठेंगणा झाला होता. पण एकामागून एक राज्यांमध्ये दणका मिळाल्यावर मात्र पक्षाचे ग्रह फिरत गेले. महाराष्ट्रात पक्षाने सरकार गमावले, हरियाणात दुष्यंत चौताला यांची मदत घ्यावी लागली. झारखंड आणि दिल्लीत मार खावा लागला. त्यामुळे आता काहीही करून बिहार जिंकणे पक्षासाठी मोलाचे आहे. बिहारमध्ये हरल्यास त्याचा थेट परिणाम पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुडुचेरी आणि आसामात होईल. बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलो तरी पुष्कळ होईल असे अनेकांना वाटते. म्हणून भाजपने मध्येच पवित्रा बदलला. भाजप उमेदवार लढतीत असलेल्या मतदारसंघात नितीशकुमार यांना बरोबर न घेता मोदींच्या सभा घेण्याचे ठरले. नितीश यांना वगळून काही पोस्टर्सही झळकली आहेत. येत्या काही दिवसात मोदी आपल्या भाषणात अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. प्रियांका ल्युटन्स दिल्लीत परतहरियाणातील गुरगावमध्ये काही दिवस राहून प्रियांका गांधी ल्युटन्स दिल्लीत परतल्या आहेत. मोदी सरकारातल्या बाबूंनी त्यांना काही महिन्यांपूर्वी सरकारी बंगला खाली करायला सांगितले होते. थोड्या दिवसांसाठी त्या गुरगावमध्ये गेल्या आणि आता खान मार्केटजवळ सुजनसिंग पार्कमध्ये वास्तव्यास आल्या. जागा कमी असल्याने त्या घरी कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. त्यांचे हे घर खूपच लहान असल्याने सुरक्षा रक्षकांची मात्र पंचाईत होते आहे. राम माधव यांचे काय होणार?भाजपातले उगवते तारे राम माधव यांचे ग्रह फिरलेले दिसतात. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारताचा कारभार त्यांच्याकडे होता. काश्मीरमधले भाजपचे धोरण तयार करण्यात आणि ईशान्येकडील काही राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मोदी पंतप्रधान व्हायच्या आधीपासून अमेरिका आणि इतर देशात त्यांच्यासाठी काम करणाऱ्या इंडिया फाउण्डेशनचे काम राम माधव करतात. त्यांना सरचिटणीस पदावरून दूर केले गेले तेव्हा असे वाटत होते की, राज्यसभेवर घेऊन मंत्रिमंडळ खान्देपालटात त्यांना मंत्रिपद दिले जाईल.  उत्तर प्रदेशात भाजप राज्यसभेच्या १० पैकी ८ जागा जिंकेल तेथून त्यांना राज्यसभेवर घेतले जाईल असा होरा होता. पण यादीत त्यांचे नावच आले नाही. सरचिटणीस म्हणून मिळालेली साउथ  अव्हेन्यूमधली सरकारी सदनिका ते खाली करत आहेत असे आता कानावर आले आहे. त्यांचे काय होणार हे अजून गुलदस्त्यात आहे. सध्या मात्र ते पूर्ण वेळ संघ प्रचारक असल्याने ते संघात परत जातील, असेही बोलले जात आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण