शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या शहरांत मोठे भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 05:09 IST

छोटी शहरे आणि खेड्यांना ऊर्जितावस्था हवी

- डॉ. भारत झुनझुनवाला, आर्थिक विषयाचे तज्ज्ञएखादी वस्तू खेड्यात उत्पादित होणार की शहरात हे दळणवळणाच्या सोयींवर ठरते हे वास्तव आहे. हे सोदाहरण दाखवता येईल. ग्रामीण भागात खाल्ला जाणारा तांदूळ तिथल्याच भात गिरण्यात तयार होतो; पण शहरात खपणारा तांदूळ जवळपासच्या मोठ्या भातगिरण्यात तयार होतो. तांदूळ खेड्यातून या गिरण्यांपर्यंत वाहून न्यावा लागतो. खेड्याताल्याच गिरण्यात तांदुळावर प्रक्रिया करून तो शहरात नेता येऊ शकतो किंवा शहराजवळच्या गिरण्यात नेऊन प्रक्रिया झालेला तांदूळ शहरात पुरवता येतो.खेड्यातच पिकलेला तांदूळ तिथेच पुरवायचा असेल तर छोटी गिरणी पुरते. छोट्या गिरणीत तांदुळावर प्रक्रिया करण्याचा खर्च जास्त पडतो. शिवाय तांदुळाची गुणवत्ताही चांगली नसते. भाताची तुसेही वाया जातात. हे लक्षात घेऊन धंदेवाईक माणूस तांदूळ शहरातल्या मोठ्या गिरणीत नेणे पसंत करतो. याच्या उलट साखर कारखाने ग्रामीण भागातच काढले जातात. कारण एक किलो साखर उत्पादन करायला १० किलो ऊस लागतो. शहराजवळच्या कारखान्यात दहापट ऊस न्यायला खूपच जास्त खर्च येईल. लांबच्या कारखान्यात ऊस नेऊन तयार झालेली १ किलो साखर लगतच्या शहराकडे न्यायला तुलनेने अधिक खर्च येतो. ऊस आणि साखर अशा दोन्हींच्या वाहतुकीवर होणारा एकत्रित खर्च कारखाना गावाकडेच असेल तर कमी होतो. यामुळेच आपण पाहतो की भात गिरण्या शहराजवळ आणि साखर कारखाने गावाकडे असतात. कृषी उत्पादनावर अवलंबून असणारे कारखानेच फक्त ग्रामीण भागात काढणे परवडते. याचा अर्थ एक प्रकारे वाहतूक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागाचे नुकसान झाले आहे.शेतीतून जे जादाचे उत्पन्न निघेल त्यातूनच उद्योगात मुख्यत्वेकरून गुंतवणूक करावी असे चाळीसच्या दशकात तत्कालीन नेत्यांनी बॉँबे प्लॅनमध्ये सांगितले. यातून दोन पर्याय निघाले. एक तर जादाचे उत्पन्न उद्योगात गुंतवताना आपल्याला खेड्यांचे शोषण करावे लागेल म्हणजे परकी गुंतवणुकीपासून मुक्तता होईल. दुसरे म्हणजे आपले आर्थिक सार्वभौमत्व जागतिक भांडवलाच्या चरणी अर्पण करून ग्रामीण विकासावर भर देता येईल.मोठ्या शहरांवर भर देण्यापेक्षा छोटी शहरे विकसित करणे हा एक मधला मार्ग निघतो. मोठ्या शहरात वीज, पाणी, बससेवा पुरवण्यापेक्षा याला जास्त खर्च येणार तरी ग्रामीण भागात या सेवा देणे अधिक महाग होते.वीस वर्षांपूर्वी मला राजस्थान सरकारची काही कागदपत्रे पाहता आली. त्यात असे म्हटले होते की, ग्रामीण भागात नळपाणी पुरवणे शहरी भागाच्या दहा पट खर्चिक आहे. छोट्या शहरात हेच पाणी पुरवण्यासाठी शहराच्या फक्त दुप्पट खर्च येईल.छोट्या शहरातून संगीत, कॉल सेन्टर्स, आॅनलाइन ट्युटोरियल्स, अनुवाद अशा सेवा घेता येतील. प्रदूषणमुक्त वातावरणासारख्या गुणवत्तापूर्ण राहणीमानाची उपलब्धता येथे असेल. राहिवाशात चांगला संवाद असेल. छोट्या ठिकाणी भाजीविक्रेता नावाने ओळखला जातो. प्रगत देशात याच कारणांनी मुख्य शहरातून उपनगरात मोठी येजा होते. मुळात शेती फार उत्पन्न देत नाही. मात्र नेदरलँड ट्युलिप्स पिकवतो, फ्रान्समध्ये उत्तम प्रतीची द्राक्षे तर इटलीत आॅलीव होतात, या सगळ्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळते. छोटी शहरे आणि खेड्यांना ऊर्जितावस्था देण्याचा मार्ग म्हणजे केरळसारख्या राज्यात मिरी, कुलूत सफरचंदावर संशोधनाची व्यवस्था करणे. उत्तर प्रदेशच्या छुटमलपूरमधून खूप भाजीपाला येतो, तो आसपास पिकलेला असतो. अशा छोट्या गावातूनच गुलाब, ग्लॅडिओलासारखी फुले येतात. ही छोटी शहरे विकसित केली पाहिजेत.